Saturday, July 27, 2024

The wedding function- attended or not attended?

The wedding function-attended or not attended?

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved

That time I was in India and lived in the suburb by name  Mira Road in Mumbai,  in the state of Maharashtra in India. I used to commute to  my office by office bus.

I used to meet a girl by name Joyce in the bus who also worked in my Company but not in my department (I worked in Finance). Joyce once told me her marriage was fixed. She said she would send me the wedding invitation soon. Joyce then went on wedding leave.

After a few days, I received wedding invitation from Joyce on my office e-mail. The wedding venue was given Ambadi, there were no other details. In Mumbai, two three stations ahead of Mira Road is another suburb  called Vasai, where Christian people live in substantial majority,  as earlier Vasai was ruled by Portuguese (Portuguese called the place Bassein).

I guessed, Ambadi was in Vasai from my past memory. The wedding was on Sunday. Before that, I happened to meet my brother-in-law who was Christian. He was a very knowledgeable person. I asked him if Ambadi was in Vasai and he casually confirmed it was in Vasai.

At 4.00 pm on Sunday afternoon I got ready, took an envelope with some cash as my wedding gift and took a Mumbai suburban local train going to Vasai. Before that, I do not remember to have ever visited Vasai. I got off at Vasai station, took an auto rickshaw and told the driver to take me to Ambadi. He took me to a place and told me that was my destination. It was evening time and I saw the place totally desolate. 

I asked a passer-by, if the place was Ambadi. He said it was Ambadi Road. I though since it was Ambadi Road, it had to go to a place by name Ambadi. I asked him if there was any church there. He showed me the way to go to a nearby Church. 

When I went to that Church, I did not find any wedding celebration, but a sermon was going on. To find about wedding Church, I sat in the sermon and asked a neighboring lady about the wedding Church. She told me that the Christians living in that areaa did not have wedding church and had approached the local government to set up a wedding church. She told me  there were  priests' residential quarters at a little distance, where I can check about wedding Church which I was looking for. 

Then I walked out of the sermon and found the priests' residential quarters , but I did not find anybody in the quarters . Probably they had gone for some event.

It was getting dark and I lost any hopes of finding any wedding church there. I decided to go back and took an auto rickshaw. The people who have lived in Mumbai  know how difficult it is in Mumbai to  get an auto rickshaw going to your destination. 

I talked to the  autorickshaw driver about wedding church with the last hope and he told me that there was a church near Vasai station. That place definitely was not Ambadi. Yet I decided to take a chance. The autorickshaw driver took me to the church. I entered the church but found a different couple getting married. I was tired and it was 10.00 o'clock at night. I took a return train and came back to Mira Road. 

The next day I went to office. Joyce was still on wedding leave. I happened to meet one person in payroll. He said to me that Joyce was a very funny girl not to have given a chance to anyone to attend her wedding. I asked him what he meant by that. He said that her wedding was in Karnataka. Then  my silly but innocent efforts  flashed in my mind to find the wedding church in Vasai in the state of Maharashtra, when the wedding function was actually taking place  750 kms away in Ambadi in the state of Karnataka.  

Joyce returned from her wedding leave and I asked her why she did not give the complete address in her wedding invitation and told her about my futile struggle to  find out the wedding church.

Joyce felt very sorry. She showed me pictures of her wedding function and also the bridegroom, then her life partner. Her husband was a preacher , not earning anything. I found Joyce a daring lady to marry a person who was not earning anything as it was a common practice for ladies to look for financial stability in their life partners.

Joyce told me that I had made sincere efforts to attend the wedding, which the God will recognize, because the God recognizes not success or failure, but sincere efforts.

It still remained a mystery why Joyce did not give complete address in the invitation for the most important event in life. If she had given complete address, I would not have moved out of house. Since there was no complete address in the invitation, I moved out of my house to attend a wedding which was happening 700 kms away.  Did I move out of house to attend a stranger couple's wedding at Vasai station. I remember the bride and bridegrooms' eyes fixed at me for a moment to guess if they had known.  I know marriages are made in heaven , but are guests also decided in heaven?

Sunday, July 21, 2024

मोनाचा डॉगी


सिडनीमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी कालिदास जयंती चा कार्यक्रम साजरा केला जातो. या वर्षीचा  कार्यक्रम २०/७/२०२४ ला साजरा झाला. कार्यक्रमामध्ये मी माझी 'मोनाचा डॉगी' ही कथा सादर केली. मला ही कथा सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळ, सिडनी, यांचा खूप आभारी आहे.

कै. चिं.वि. जोशी यांची अजरामर व्यक्तिरेखा चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत, अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. चिमणराव आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत ही कल्पनाच भन्नाट असल्याचे, तसेच कथा आवडल्याचे सर्वांनी सांगितले . सदर कथा येथे   दिली  आहे. 

मोनाचा डॉगी

-डॉ. हेमंत जुन्नरकर 

©Dr Hemant Junnarkar, All rights reserved


(मराठीतील अजरामर विनोदी लेखक कै. चिं.वि. जोशी  यांचे कथानायक चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. कै. चिं.वि. जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे  'मोनाचा डॉगी')

मी नुकताच ऑफीसमधून घरी येऊन सोफ्यावर आराम करीत होतो. काऊचा स्वयंपाक तयार झाला होता आणि ती मोबाइलवर मेसेजेस चेक करीत होती.

'अहो, ऐकलंत का?' काऊ म्हणाली,' महाराष्ट्रात म्हणे  'लाडकी बहीण, लाडका भाऊ' योजना सुरू केल्या आहेत. इथे का नाही अशी काही योजना करीत?'

मी काही उत्तर देणार एवढ्यात मोरू दुसऱ्या खोलीतून येऊन सोफ्यावर चढून माझ्या गळ्यात हात टाकून म्हणाला,

'लाडका डॉग अशी योजना का नाही?'

'का रे बाबा?' मी विचारलं.

'आपण डॉगी पाळू या का? मी एक डॉगी पाहून ठेवला आहे,' मोरू म्हणाला.

मोरूची लाडीगोडी माझ्या लक्षात आली. मोरूचा हात गळ्यातून काढून मी  उत्तर दिलं, 'हे पहा, कुत्रं वगैरे काही पाळायचं नाही.'

ते ऐकताच मोबाइल बाजूला ठेवून काऊ म्हणाली, 'अहो, इतरांच्या घरी पाहून मुलांनाही वाटतं, आपल्याकडे सुद्धा डॉगी असावा. आणि हे पहा, कुत्रं वगैरे असे गावठी शब्द वापरू नका, डॉगी म्हणा. इथे कुत्र्याबद्दल  आदराने बोलतात.'

'हे पहा,   डॉगी खूप महाग आहेत. पुन्हा त्यांचं खाणंपिणं, ट्रेनिंग, आजारपण या सर्वांवर अफाट खर्च होतो. आणि त्या डॉगीचं शी शू, अंघोळ-पांघोळ, त्याला फिरवून आणणं, हे सारं कोण करणार?'

'अप्पा तुम्ही,' मोरू आणि मैना  एका सुरात म्हणाले.

'मैना, ऑफीसमधल्या कामामुळे मला रोज घरी यायला उशीर होतो. मी डॉगचं  काही करू शकणार  नाही,' मी स्पष्ट सांगितलं.

'तुमची म्हणजे  प्रत्येक बाबतीत रडकथा.  बाला पहा, जानकीने सांगितलं,  डॉगी हवा  तर लगेच  आणला. डी आय वाय कोर्स करून डॉग ट्रेनिंग स्वतःच केलं. आता बालांचा डॉग त्यांच्याबरोबर योगासुद्धा करतो,' काऊ म्हणाली.

'हे पहा, बालांचा डॉगी योगा करो नाहीतर भरत नाट्यम करो, आपल्याकडे डॉगी नको,' मी कधी नव्हे ते ठामपणे सांगितले. कुणी काही बोललं नाही. काऊनं पानं मांडली. सारेजण चुपचाप जेवण करून झोपी गेलो.

दुस-या दिवशी कामावर गेलो तो आमच्या ऑफीसमधील  रिसेप्शनिस्ट मोनाने माझ्याजवळ येऊन सांगितलं की तिला ताबडतोब लंडनला जावं लागणार आहे, कारण तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. मोना एकटी राहत होती. तिने पोगो नावाचा कुत्रा पाळला होता. मोनाने ती परत येईपर्यंत पोगोला घरी घेऊन जाण्याची मला विनंती केली.  

लंच टाइममध्ये   रुस्तमजी  नावाचे पारशी कलीग बरोबर होते.  मी त्यांना म्हणालो ,

'रुस्तमजी, कालच मला घरच्यांनी कुत्रा आणण्याबद्दल विचारलं आणि मी सरळ नाही सांगितलं. आज मी कुत्रा घरी घेऊन आलो आणि तोही एका मुलीचा, तर माझी बायको मला सोलून काढील,' मी म्हणालो.

रुस्तमजी म्हणाले, 'अरे चिमण, तमने तो बहुज सरस चान्स मळ्यो छे.'

'सरस चान्स? तो कसा काय रुस्तमजी?' मी विचारलं.

'हे बघ, माझी बैरी- आमी गुजराती लोग वाइफला बैरी म्हणते बरं का- तर माझी बैरी एकसारखी  माझ्या पाठी भुणभुण करायची - कूतरा पाहिजे, कूतरा पाहिजे. मी आणला कूतरा. कूतराला वॉक करताना  एक दिवस मला माझी कॉलेजमधली गर्ल फ्रेंड भेटली. मग काय, दिला बैरीला डायव्होर्स. मी सांगते, तुला बी असाच कुणी भेटेल. मग हे खडूस बैरीला देऊन टाक डायव्होर्स. दे टाळी.'

मी रुस्तमजींना निमूटपणे टाळी दिली.

संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर मी मोनाबरोबर तिच्या घरी गेलो. मोनाने पोगोला  बरोबर घेतलं. महिनाभर ती परत येईपर्यंत माझ्याकडे शहाण्यासारखं राहायला पोगोला सांगितलं. पोगोने सुद्धा जणू काही सर्व समजल्यासारखं दाखवून माझ्याकडे पाहिलं. मोनाने मला घरी सोडलं. माझ्या गालाला गाल लावून मला निरोप दिला आणि  निघून गेली.

मी माझ्या गालाला हात लावून पाहत, सर्वांना तोंड कसं दाखवावं या विचारात दरवाज्यावरील बेल वाजवली.  माझ्याबरोबर पोगोला पाहताच सारी मुले आनंदाने पिटीत म्हणाली,' आई आई, अप्पांनी डॉगी आणला.'

ते ऐकून काऊ बाहेर आली आणि गरजली ,' अगं बाई, कुत्रं आणलं? कुणाचं हे कुत्रं?'

'कुत्रा ना? तो - तो आपल्या गुंड्याचा,' मी चाचरत म्हटलं.

'गुंड्याभाऊजींचा? गुंड्याभाऊजी कधीपासून कुत्रा पाळायला लागले?' काऊ संशयाने माझ्याकडे पाहत म्हणाली.

'हो, पण मला घरात तर येऊ देशील की नाही? ' मी घरात येऊन सोफ्यावर बसलो‌. पोगो माझ्या पाठी येऊन माझ्या पायाशी बसला.

'अगं त्याचं असं झालं, गुंड्या आला खरा आपल्याबरोबर सिडनीला, पण गेला आहे कंटाळून. बरं हा ब्रह्मचारी. इथे पाहिलं, सिंगल लोक सोबतीसाठी कुत्रा पाळतात, म्हणून आला कुत्रा घेऊन. पण कुत्र्याची सारी व्यवस्था तर करायला पाहिजे ना? म्हणाला, घेऊन जा तुझ्याकडे महिनाभर, मुलंसुद्धा खूष होतील,' मी एवढी थाप मारू शकतो यावर माझाच विश्वास बसेना.

एवढ्यात दारावरची बेल वाजली‌. काऊने जाऊन दार उघडलं, तर गुंड्याचाच आवाज,' काय वहिनी, आला आहे का चिमण घरी?'

अरे बाप रे, माझ्या छातीत धडकीच भरली. हा आताच कसा तडमडला?

'हो आले आहेत नं. कुत्रा छान आहे हं तुमचा,' काऊ म्हणाली.

'कुत्रा? आणि माझा?' बोलत बोलत गुंड्या आत आला आणि पोगोकडे पाहत म्हणाला,' अरे चिमण, तुझ्या ऑफीसमध्ये कुणी मोना आहे  म्हणत होतास, तिचा तर आणला नाहीस ना कुत्रा?'

झालं. या गुंड्याच्या एक थोतरीत मारावी असा मला राग आला.  मी थाप मारली, त्याचा गुंड्याने पुरेपूर वचपा काढला.

'वहिनी, मी आलो होतो, चहा घ्यायला, पण आता  येईन पुन्हा कधीतरी. हे कुत्रे दु:शासनाप्रमाणे माझ्या धोतराच्या पाठी लागतात,' असं म्हणून गुंड्या धोतरावरील पकड ठेवूनच निघून गेला.

गुंड्या गेल्यानंतर काऊ दरवाजा बंद करून आली आणि तावातावात म्हणाली,' आता खरं सांगा पाहू, कोण ही मोना?'

'आई, मला माहीत आहे, मोना कोण आहे. 'यादों की बारात' मध्ये अजित नाही का म्हणतो, 'मोना डार्लिंग,' मोरू म्हणाला.

'आता मोना डार्लिंगचा कुत्रा सांभाळायला वेळच वेळ असेल,'काऊ खोचकपणे म्हणाली.

'आई, मी सांभाळेन मोनाचा कुत्रा. किती छान आहे !' राघू म्हणाला.

'राघू, आपल्याला आजीने काय शिकवल़ंय, मोठ्या माणसांना नावाने हाक मारू नये. मोना आंटी म्हणावं,' मैनानं राघूला उपदेश केला.

'मैना, खबरदार त्या सटवीला आंटी म्हणशील तर,'  काऊने बजावलं .

'आई, पण असं पहा, अप्पांनी मोना आंटीला जर आमची सेकंड मदर म्हणून घरी आणली तर आम्हाला तिला रिस्पेक्ट द्यावा लागेल नं. माझी मैत्रीण ज्युली तिच्या सेकंड मदरला खूप रिस्पेक्ट देते,' मैना म्हणाली.

'अगं मैना, काय ही बाष्कळ बडबड चालवली आहे?' मी म्हणालो. 

आमचं बोलणं चालू असताना पोगो घरातील सर्वांकडे आळीपाळीने पाहत सर्वांना जज करीत होता.

'बाष्कळ  नाही, मैना बरोबर बोलते आहे. मीताच्या घरी तिच्या नव-याच्या ऑफीसमधील रिसेप्शनिस्ट कुत्रा घेऊन यायची. होता होता एक दिवस नव-यानं मीताला डायव्होर्स की दिला आणि रिसेप्शनिस्ट बरोबर लग्न केलं,' काऊ म्हणाली.

'तू काय सुतावरून स्वर्ग गाठते आहेस? मी  डायव्होर्स वगैरे काही  देणार नाही,' मी म्हणालो.

'नाही ना? मग जा आणि आताच्या आता त्या भवानीचा कुत्रा परत देऊन या,' काऊ म्हणाली.

'आता कसा परत करणार? ती बिचारी पॅकिंगच्या गडबडीत असेल,' मी म्हणालो.

'बिचारी? वा ! इतकी वर्षं  राबराबून बायकोच्या नशिबाला नाही कधी हा शब्द आला?' काऊ म्हणाली.

'ऑफीसमध्ये काम खूप असतं म्हणे. हेच काम असतं वाटतं, मोनाची कुत्री सांभाळण्याचं?' काऊचा तोंडाचा पट्टा चालूच होता.

'ऑफीसमध्ये मोना कशी आणेल कुत्रा? तुला कळतंय का काही?' मी म्हणालो.

'हो बाई, मला बापडीला काय कळतंय? मी आपली घर सांभाळते, नवरा कुणा मोनाची कुत्री सांभाळतो,' काऊ म्हणाली.

आमचं हे सारं बोलणं चालू असताना पोगोला बहुतेक कळत होतं की आपल्यामुळे आपल्या मालकावर ही आफत ओढवली आहे. तरीसुद्धा आपला मालक काही मार्ग काढेल या  विश्वासानं तो माझ्याकडे पाहत माझ्या पायाशी बसून होता.

इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. मैनानं दरवाजा उघडला तर चक्क मोना आत आली आणि म्हणाली,

'हाय चिम, माय प्लॅन इज कॅन्सल्ड. माय ब्रदर टोल्ड मी मॉम इज ओके अँड देअर इज नो नीड टू रश. आय ॲम टेकिंग पोगो विद मी. थँक्यू सो मच. सून वी विल कॅच अप गाइज. बाय,' मोना म्हणाली.

मोनानं हात करताच पोगो शेपूट हलवीत आणि माझ्याकडे कृतज्ञपणे पाहत मोनाकडे गेला. मोना पोगोला घेऊन निघून गेली.

मी 'हुश्श' म्हणून सुस्कारा सोडला आणि मोरूला म्हणालो,' मोरू, तू जो डॉगी पाहिला आहेस तो घेऊन ये.'

सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. 

'आणि डॉगीचं सारं करणार कोण?' काऊनं विचारलं.

'मी करीन,' मी म्हणालो.

'का? एकदम असा निर्णयात बदल?' काऊनं विचारलं.

'माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नाही तर डॉगी निश्चित विश्वास ठेवील,' मी म्हणालो.

काऊ माझ्याकडे पाहतच राहिली.

******

Whats app वर आलेल्या प्रतिक्रिया:

गोष्ट खुप छान आहे.-देवेंद्र पाटील २२/७/२०२४

मस्त कथा वाचताना मजा आली. 👌-अविनाश ताम्हाणे २२/७/२०२४

Khupch sunder Jijaji, mast maja Ali - वैशाली चित्रे २४/७/२०२४

Fantastic write up!! Comfort read. -अपर्णा रामटेके २३/७/२०२४

😃😃😀   great  I enjoyed it. The memories of C V J sir were fresh.-सतीश चित्रे - २२/७/२०२४

गोष्ट छान आहे. 👍👍👌👌😃😃😃😃-उमा गुप्ते २२/७/२०२४

Aprateem Kalpana ahe. 

चि वि जोशी सिडनी हि सिरीज फार पुढे जाईल. त्यांच्या प्राचीन आणि प्रगतशील विविधतेचा गंध नसलेल्या चिमणरावांच्या नजरेतून सिडनी बघायला आवडेल.

वरील कथा अजून वाचली नाही पण तुमच्या आवाजात असेल तर ऐकायला आवडेल. 

असेच लिहीत, सादर करीत राहा. लोकरंजन आणि अंजन दोन्ही फार गरजेचे आहे.

तुमची कल्पकता तुमच्या शांत स्वभावाला आणि अचूक निरीक्षणात आहे .

संगीता रॉड्रिग्ज २२/७/२०२४

छानच - सचिन चिटणीस २२/७/२०२४

Wow this is great👌🏻👏🏻👏🏻👏🏻 गौरी भिवंडकर २१/७/२०२४

फ़ारच छान -शेखर केतकर २१/७/२०२४

Ohh. Wow congratulations Sir.. Nuntan Vahini vachala..khup chan ahe.. उल्का गावकर २१/७/२०२४

A re masta 👏👏 -रेखा पेडलीकर २१/७/२०२४

कथा खूप छान 👌👌👏👏-कौस्तुभच्या आई

👌🙂 Abhinandan Hemant khup chan Katha Kathan..👏🏻 -राजेश












 



















 






















Saturday, July 13, 2024

मार्कंडेय ऋषि की कथा


मार्कंडेय ऋषि की कथा

(C) Dr Hemant Junnarkar, All rights reserved

यह बहुत साल पुरानी कथा है | मृकंदु नाम के एक ऋषि थे | उन के पत्नी का नाम मरुदमति था | मृकंदु और मरुदमति दोनों वन में सादगी का जीवन जीते थे |

मृकंदु ऋषि और मरुदमति एक ही कमी महसूस करते थे | उन की कोई संतान नहीं थी | दोनों शिव के भक्त थे और नित्य भगवान शिव जी की उपासना करते थे |

उन की उपासना से  भगवान शिव जी प्रसन्न हुए | एक रात मृकंदु और मरुदमती,  दोनों ने एक ही सपना देखा | भगवान शिव जी ने उन्हें सपने में कहा कि वह दोनों की उपासना से प्रसन्न हैं और पूछा  कि वे क्या चाहते है | तब दोनों ने कहा कि वे संतान चाहते हैं |

इस बात पर भगवान शिव जी सोच में पड़ गये और उन्हें बताया कि उन के भाग्य में संतान नहीं हैं | परंतु भगवान शिव जी ने अपनी  कृपा से उन्हें दो विकल्प दिये | एक विकल्प था कि उन का पुत्र दीर्घायु परंतु बुद्धिहीन और उपद्रवी होगा | दूसरा विकल्प यह था कि उन का पुत्र बडा़ ज्ञानी होगा, परंतु उस की आयु केवल सोलह वर्ष की होगी |

इस बात पर दोनों ने तुरंत उत्तर दिया कि उन्हें ऐसा ही पुत्र चाहिये जो बडा़ ज्ञानी हो, भले उस की आयु कम क्यूं न हो | भगवान शिव जी 'तथाSस्तु ' कहकर अंतर्धान हुए |

मृकंदु ऋषि और  मरुदमति, दोनों की जब नींद खुल गई, तब उन्हों ने एक दूसरे को अपना सपना बताया | दोनों का एक ही सपना सुनकर वे चकित हो गये | मनोमन उन्हों ने भगवान शिवजी को धन्यवाद दिया |

भगवान शिव जी की कृपा से मरुदमति को पुत्र हुआ | उस पुत्र का नाम उन्हों ने मार्कंडेय रखा | मार्कंडेय बचपन से बहुत तेज़ दिमाग का था | उस की सब बहुत प्रशंसा करते थे | मृकंदु ऋषि और मरुदमति खुषी से पुत्र के साथ अपना समय बिताते थे | 

मार्कंडेय की आयु जब पंद्रह वर्ष की हुई तब उस की सोलह वर्ष की आयु के बारे में भगवान शिव जी ने जो भविष्यवाणी की थी वह याद करके मृकंदु ऋषि और मरुदमति बहुत दुखी हो गये | मार्कंडेय ने जब उस का कारण जाना, तब उस ने दोनों को आश्वस्त किया कि वे चिंता न करे | मार्कंडेय  फिर घर का त्याग करके भगवान शिवजी के मंदिर में बैठकर भगवान शिव जी की तपस्या करने लगे |

इस तरह से एक साल बीत गया और मार्कंडेय का प्राण   हरण करने के लिये भगवान यमराज आ गये | उन्हे देखकर मार्कंडेय शिवलिंग से लिपट गये | भगवान यमजी  ने अपना फंदा मार्कंडेय पर डाला | हालाकि मार्कंडेय शिवलिंग से लिपटे हुए थे, फंदे में शिवलिंग भी फस गया | इस से क्रोधित होकर  भगवान शिव जी प्रगट हुए और भगवान यमजी से युद्ध करने लगे | अंत में भगवान यम जी ने अपनी हार मान ली |   

तब भगवान यमजी ने भगवान शिव जी को प्रणाम करके   कहा कि वह भगवान शिव जी के ही नियम का पालन कर रहे हैं | भगवान शिव जी सोच में पड़ गये | आखिर उन्हों ने ऐसा निर्णय दिया कि मार्कंडेय की मृत्यु नहीं होगी , परंतु उस की आयु हमेशा के लिये सोलह वर्ष की ही रहेगी |

इस तरह भगवान शिव जी ने सृष्टि के नियम  का भंग भी नहीं किया और मार्कंडेय की तपस्या का भी सम्मान किया |

मार्कंडेय ऋषि ने जिस स्थान पर भगवान शिव जी की उपासना की वह स्थान वाराणसी में गोमति नदी के किनारे स्थित हैं और वहॉं पुराना मार्कंडेय मंदिर हैं |  ऐसा भी कहा जाता हैं कि उन्हों ने जहॉं तपस्या की थी वह स्थान केरल में त्रिप्रगोंड में हैं|

मार्कंडेय ऋषि ने मार्कंडेय पुराण की रचना की | इस पुराण में उन्हों ने बहुत सारी बातोंपर ज्ञान दिया हैं | मार्कंडेय ऋषि  की कथाऍं भागवत पुराण और महाभारत में भी हैं |

मार्कंडेय ऋषि की गणना आठ चिरंजीवों में होती हैं | आठ चिरंजीवों का प्रात:स्मरण करने से मनुष्य व्याधिमुक्त होता हैं और उसे दीर्घ आयु की प्राप्ति होती हैं |

मार्कंडेय ऋषि ने भगवान शिवजी की उपासना करने के लिये महामृत्युंजय मंत्र की रचना की |  इसी मंत्र के जाप से भगवान शिवजी मार्कंडेय ऋषि पर प्रसन्न हुए और उन्हे चिरंजीव किया | महामृत्युंजय मंत्र का नित्य जाप करने से मनुष्य मृत्यु के भय से मुक्त होता हैं और भगवान शिव की कृपा उस पर नित्य बनी रहती हैं | महामृत्युंजय मंत्र यह हमें मार्कंडेय ऋषि की सब से बड़ी देन हैं |







 

 

  





Friday, July 5, 2024

अमावस्या, नवीन जीवनाचा आरंभ

© Dr Hemant Junnarkar

अमावस्या हा दिवस आपण सामान्यतः अशुभ मानत आलो आहो. आज आपण दैनंदिन जीवनात एवढे व्यस्त असतो की अमावस्या वगैरे पाहण्यासाठी आपल्याला वेळ नसतो.

माझे वडील नित्य पंचांग पाहत. ते आज अमावस्या आहे. आज कुठे जाऊ नका, असे सांगत. मी लहानपणी भुतांच्या गोष्टी वाचत असे. पूर्वी सकाळ दैनिकाचे स्वराज्य म्हणून एक साप्ताहिक असे. त्यामध्ये 'भूतसृष्टीचे अनुभव' म्हणून एक सदर असे. त्यातील बऱ्याच अनुभवांची सुरुवात अशी असे-

मला तातडीच्या कामासाठी बाहेर जावयाचे होते. आजी सांगत होती, आज जाऊ नकोस. आज अमावस्या आहे. पण मी काम तातडीचे असल्याने निघालो. मग पुढे जो काही अनुभव आला तो---.

अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही. आता याचे वैज्ञानिक कारण आपल्याला माहीत आहे की या दिवशी चंद्राची अंधारातील बाजू आपणासमोर असते. 

परंतु आपल्या पुराणांमध्ये अमावस्येच्या दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही अशा आहेत:-

१. भगवान विष्णूचा बलीवर विजय:
भगवान विष्णूंनी या दिवशी वामन अवतार घेऊन असुरराज बलीला पाताळात पाठवले. हा दिवस दिवाळी म्हणून हिंदूंचा सर्वांत मोठा सण मानला जातो.

२. राजा हरिश्चंद्राने केलेला श्राद्ध विधी:-
मार्कंडेय पुराणातील कथेप्रमाणे अमावस्येच्या दिवशी राजा हरिश्चंद्राने अमावस्येला श्राद्धविधी केला. त्यामुळे हरिश्चंद्र राजाचे पितर संतुष्ट होऊन राजाला मोक्ष मिळाला.

आषाढ महिन्यातील अमावस्या दिव्यांची अमावस्या म्हणून तर भाद्रपद महिन्यातील अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यांच्यापाठी अशाच कथा आहेत

हिंदू ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्राचा संबंध मन आणि भावना यांच्याशी जोडला आहे. यादिवशी मानसिक ऊर्जा कमी पातळीवर असल्याने हा दिवस नवीन कार्यासाठी अशुभ मानला आहे.

परंतु याचीच दुसरी बाजू म्हणून बाह्य जगापासून दूर होऊन आध्यात्मिक प्रगती करण्यास हा दिवस योग्य आहे. म्हणून या दिवशी हिंदू धर्मशास्त्रात बहुत करून श्राद्ध , पितरांचे स्मरण, तीर्थ स्नान, दानधर्म असे विधी सांगितले आहेत.

अमावस्या आणि पौर्णिमेचा संबंध जीवनमृत्यूच्या चक्रासारखा आहे. अमावस्येनंतर नवीन महिना सुरू होतो. त्यामुळे अमावस्या गतजीवनाचा अंत आहे तर नवीन जीवनाची सुरुवात आहे. ज्या गोष्टीस आरंभ आहे तिचा अंत निश्चित आहे आणि ज्या गोष्टीचा अंत झाला आहे, तिला आरंभ निश्चित आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत म्हणतात,

'जातस्य हि ध्रुवो मृत्यु:
ध्रुवो जन्म मृतस्य च' (अ.२, श्लोक.२७)

अमावस्या हा नव्या जीवनाचा आरंभ आहे.






Tuesday, June 25, 2024

नलकुबेर और मणिग्रीव की कहानी


नलकुबेर और मणिग्रीव की कहानी


(c) Dr Hemant Junnarkar, All rights reserved


यह कहानी भगवान श्रीकृष्ण के बचपन की है | भगवान श्रीकृष्ण का अवतार सिर्फ दुष्टों को दंड देने के लिये नहीं, परंतु पतितों की मुक्ति के लिये भी था | बचपन में उन्हों ने की हुई मामुली हरकतों के पीछे कोई गहन अर्थ दिखाई देता हैं | यह कहानी इस बात को साबीत करती हैं | कहानी संक्षेप में कुछ इस तरह हैं |




भगवान श्रीकृष्ण बचपन में अपने पिता नंद बाबा और यशोदा  मैया के साथ रहते थे | एक दिन सुबह−सुबह माता यशोदा दही मथ रही थीं और नंद बाबा गौशाला में बैठकर गायों का दूध दुहवा रहे थे | तभी भगवान श्रीकृष्ण जाग गए और माता यशोदा से दुग्ध पान की जिद करने लगे। किंतु काम में व्यस्त होने के कारण यशोदा को थोड़ी देर  हो गई। भगवान श्रीकृष्ण  रूठ गए और गुस्से में यशोदा मैया के हाथ की मथनी  तोड़ डाली। यशोदा मैया को भी क्रोध आ गया। उन्होंने एक रस्सी से भगवान श्रीकृष्ण को  बांध दिया और रस्सी  आंगन में रखे हुए एक ऊखल को बांध दी।

यह कहानी कुछ इसी तरह से भी कही जाती हैं | भगवान श्रीकृष्ण बचपन में बहुत शरारतें करते थे | गोपिया न सोच सकी कि इस का कैसे हल किया जाये | उन की शरारतों से तंग आकर सब गोपिया मिलकर यशोदा  मैया के पास आई और भगवान श्रीकृष्ण की काफ़ी शिकायतें करने लगी | 

एक गोपी ने कहा कि भगवान श्रीकृष्ण और उन के साथी उस गोपी के घर में घुस गये और दस घड़ों में भरा हुआ दही और घी खा गये | दूसरे गोपी ने कहा कि भगवान श्रीकृष्ण और  साथियों ने उस गोपी के घर आकर घड़ों और छीकों में रखा हुआ मक्खन खाकर घड़े फोड़ दिये और छीके तोड़ डाले | तीसरे गोपी ने कहा कि भगवान श्रीकृष्ण ने उस गोपी के घर के गौ और बछडे़ जंगल में हांक दिये | इस तरह की कई और शिकायतें करके गोपियों ने कहा कि ऐसा ही होते रहा, तो उन्हे वह जगह छोड़कर और कही रहने के सिवा दूसरा कोई चारा नहीं रहेगा |

गोपियों की बातें सुन कर यशोदा ने हर किसी को समझाया | उन का जो कुछ नुकसान हुआ था, वह पूरा करने का आश्वासन उन्हे दिया और उन्हें यह भी कहा कि वह लडके को अभी ऐसे काबू करेगी कि फिर कभी वह ऐसा काम नहीं कर पायेगा | 

इस तरह से गोपियों को आश्वस्त करके भेजकर यशोदा मैया ने कृष्ण को बुलाया और उसे बहुत डॉंटकर उस की बॉंह पकडकर गाडी के पास ले गई | बड़े ओखल से एक रस्सी बॉंधकर उस के कमर में उस ने बॉंध दी |   फिर एक बेत लेकर कहा, 'अगर तुम यहॉं से हिले तो देखना क्या करती हूॅं',  और   ऐसा कहकर वह अपने घर के कामों में लग गई  |


 कुछ समय बीता | कृष्ण ने रस्सी को पकड़कर ओखल अपनी ओर घसीट लिया |

पशुओं के छप्पर के पास दो पेड़ थे | कृष्ण ओखल पहियेवाले खिलौने की तरह घसीटता घसीटता उन दोनों पेड़ के बीच में ले गया | फिर उस ने ओखल यूॅं ज़ोर से खींचा कि दोनों पेड़ फड़फड़ाते नीचे गिर गये |




वृक्षों के गिरने से  भारी शोर हुआ | कई गोप  गोपिया भागी भागी आई | क्या हुआ था उन्होंने  भी देखा | कुछ गोपिकाओं ने यशोदा के पास जाकर कहा,

'तेरा लड़का भी क्या राक्षस हैं | उसे भी कहीं ओखल से बॉंधा जाता हैं? वह बड़े बड़े पेड़ उखाड़कर अपने ऊपर डाल रहा हैं | सोच रही हो तुम ने बड़ा अक्लमंदी का काम किया हैं | जाकर देखो कही लड़के पर आफ़त न आ पड़े | '

यह सुनते ही यशोदा का दिल धड़का | वह कॉंप उठी | वह तेज़ी से भागने लगी , न उसे चोटी की फ़िक्र थी , न ऑंचल की ही, उबड़ ताबड़ भागी |

नंद बाबा और सब    पड़ोसी  भी वहाँ दौड़ते हुए पहुँचे। तब सभी ने एक चमत्कार देखा। उन वृक्षों में से दो सुंदर दिव्य युवक, भगवान  श्रीकृष्ण के सामने  खड़े थे। उन्हों ने  भगवान श्रीकृष्ण के सामने लीन होकर उन्हे प्रणाम किया | अपनी  मुक्ति के लिये उन्हों ने भगवान श्रीकृष्ण को धन्यवाद दिया |  फिर वे अंतर्धान होकर अपने लोक को चले गए।




अब वह दिव्य युवकों की कहानी समझ लेते हैं | देवों का कोष सम्हालने वाले  देव कुबेर के दो पुत्र थे,  एक का नाम नलकूबर था और दूसरे का मणिग्रीव। कुबेर के ये दोनों बेटे अपने पिता की धन−सम्पत्ति के प्रमाद में घमंडी और उद्दंड हो गए थे। राह चलते लोगों को छेड़ना, उन पर व्यंग्य कसना, ग़रीब लोगों का मखौल उड़ाना उन दोनों की प्रवृत्ति बन गयी थी। 

एक दिन दोनों भाई नदी में स्नान कर रहे थे। तभी आकाश मार्ग से आते हुए उन्हें देवर्षि नारद दिखाई दिए। उनके मुख से ‘नारायण−नारायण’ का स्वर सुनकर नदी पर स्नान के लिए पहुँचे लोग उन्हें प्रणाम करने लगे, लेकिन नलकूबर और मणिग्रीव तो अपने पिता के धन के कारण दंभ में भरे हुए थे। उन्होंने नारद को प्रणाम करने के स्थान पर उनकी ओर मुँह बिचकाया और उनका उपहास उड़ाया।

उन दोनों का व्यवहार नारद को बहुत अखरा। क्रोध में भरकर उन दोनों को शाप दे दिया कि वह दोनों मर्त्यलोक में  वृक्ष बनकर रहेंगे |  शापवश वह दोनों मर्त्यलोक में, गोकुल में नंद बाबा के द्वार पर पेड़ बन कर खड़े हो गए। भगवान कुबेर को अपने पुत्रों की दुर्दशा की ख़बर मिली तो वह बहुत दुःखी हुआ और महर्षि नारद से बार−बार क्षमा याचना करने लगे। नारद जी को उन पर दया आ गई। उन्होंने अपने शाप का परिमार्जन करते हुए कहा, ‘  द्वापर  युग में भगवान विष्णु भगवान श्रीकृष्ण के रूप में वहाँ अवतरित होंगे और दोनों वृक्षों का स्पर्श करेंगे तब उन्हें मुक्ति मिल जाएगी।’

इस तरह से भगवान श्रीकृष्ण की अद्भुत लीला से नलकूबर और मणिग्रीव को मुक्ति मिल गई |

इस कहानी से हमें कई  सीखें  मिलती हैं | एक सीख ऐसी है  कि जो लोग वासनाविवश होकार अपने इंद्रियों पर काबू नहीं कर पाते हैं, उन्हें नलकूबर और मणिग्रीव जैसे वृक्षरूप बन गये उसी तरह वृक्ष की गति मिलती हैं | ऐसी स्थिति में वह हलचल भी नहीं कर पाते | 

दूसरी सीख यह हैं कि अपनी वासनाओं पर काबू पाने के लिये हमें भगवान श्रीकृष्ण की शरण में जाना चाहिए और उन की भक्ति में लीन रहना चाहिये |

Tuesday, June 18, 2024

मृत्युंजय महामंत्र - एक अर्थबोध

©Dr Hemant Junnarkar, All rights reserved

मृत्युंजय महामंत्र:

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनात्
मृत्योर्मुक्षीय माSमृतात्


बहुतेक संकेतस्थळांवर असणारा अर्थ:

तीन नेत्र असणाऱ्या त्र्यंबकाचे, शिवाचे , जो सुगंध देणारा, पोषण करणारा आहे, आम्ही यजन करतो. काकडी ज्याप्रमाणे आपल्या बंधनापासून (=वेलाशी असणाऱ्या संलग्नतेपासून) मुक्त होते त्या प्रमाणे आम्हाला अमरत्वापासून नाही तर मृत्यूपासून मोक्ष किंवा मुक्ती मिळू दे.

वरील अर्थ ओढून ताणून काढलेला आणि संस्कृत व्याकरणाचे नियम न पाळणारा आहे. या अर्थातील चुका थोडक्यात खाली दिल्या आहेत-

शिवास सुगंध देणारा किंवा पुष्टी देणारा म्हणण्यात चूक नाही. पण पुढे जो 'उर्वारुकासारखा' म्हटले आहे, ते कुणाला असा प्रश्न राहतो. मग उर्वारुक (काकडी ) जसा बंधनातून मुक्त होतो, असा अर्थ काढावा लागतो. या अर्थामध्ये मग बरेच पदरचे शब्द टाकावे लागतात. शिवाय मृत्यूपासून मुक्त कर, अमरत्वापासून नाही, यातील सर्वांत मोठी चूक म्हणजे मा या शब्दाचा अर्थ नको असा केला आहे. मा चा नकारार्थी उपयोग फक्त आज्ञार्थामध्ये केला जातो.

संस्कृतमध्ये प्रत्यय शब्दाला जोडले जातात, त्यामुळे शब्दांचा क्रम बदलला तरी अर्थामध्ये फरक पडत नाही. वृत्ताची बंधने पार पाडण्यासाठी शब्दांचा क्रम बदलला जातो. अशा वेळी अर्थबोधासाठी खालील पद्धत उचित ठरेल.

१. प्रथम अन्वय तयार करावा. म्हणजे गद्यामध्ये शब्द ज्या क्रमाने असतात, तसे म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा क्रमाने मांडावे.

२. विशेषणे नामाजवळ तर क्रियाविशेषणे क्रियापदाजवळ आणावी. संस्कृतमध्ये नाम ज्या विभक्तीमध्ये असते, त्याच विभक्तीमध्ये विशेषण असते. त्यामुळे कुठल्या नामाचे कुठले विशेषण आहे ते ओळखणे सोपे जाते. 

३. संधींचा आणि समासांचा विग्रह करावा. आता तुम्हाला अर्थ स्पष्ट होऊ लागेल.

याप्रमाणे मी मृत्युंजय मंत्राचा खालीलप्रमाणे अर्थ केला आहे-

अन्वय/सन्धि/समासविग्रह: 
ॐ , उर्वारुकम् इव सुगन्धिं, पुष्टिवर्धनम् त्रि+अम्बकम् ( वयम्) यजामहे |
(स: त्र्यम्बक:) मा मृत्यो: अमृतात् बन्धनात् मुक्षीय |
शब्दार्थ:
उर्वारुक (ना. नपुं)= या शब्दाचा अर्थ स्पष्ट नाही. ही काहीतरी हिरवी , रसयुक्त वनस्पती असावी. बऱ्याच संकेतस्थळावर या शब्दाचा अर्थ काकडी असा दिला आहे.
सुगन्धि (वि)=सुगंधी.
पुष्टिवर्धन (वि)=पोषक, पुष्टिकारक 
त्र्यम्बक (ना.पुं)=तीन नेत्र असलेला, शिव
यजामहे = यज् धातु आ.प. वर्तमानकाळ प्र.पु.ब.व.=यजन करतो
मुक्षीय=मला मोक्ष मिळू दे, मला मुक्ती मिळू दे. मुच् धातूचे आशिर्वादार्थी प्रथम पुरुषी एकवचनी रूप.
मुच् धातू गण ७, उ.प.
आशिर्वादार्थी आत्मनेपदी रूपे
आशिर्लिङ्लकार
पुरुष एकवचन द्विवचन बहुवचन
प्रथम मुक्षीष्ट मुक्षीयास्ताम् मुक्षीरन्
मध्यम मुक्षीष्ठा: मुक्षीयास्ताम् मुक्षीध्वम्
उत्तम मुक्षीय मुक्षीवहि मुक्षीमहि

अर्थ: ॐ, उर्वारुकाप्रमाणे सुगंधी आणि पुष्टिकारक अशा त्र्यंबकाचे (=तीन नेत्र असणाऱ्या शिवाचे ) (आम्ही) यजन करतो. 
(तो त्र्यंबक) मला मृत्यूच्या अमृत (=मृत्यू न पावणाऱ्या, नष्ट न होणाऱ्या) बंधनापासून मला मोक्ष, मुक्ती देवो.

श्लोकाचे सौंदर्य:
त्र्यम्बक=शिवास अनेक नावे असूनसुद्धा येथे त्र्यम्बक, म्हणजे तीन नेत्र असलेला या नावाची निवड केली आहे. कारण मंत्राच्या पुढील चरणामध्ये मृत्यूच्या बंधनातून मुक्त करण्याची प्रार्थना केली आहे.

सर्व जीवांस दोन नेत्र आहेत. केवळ शिव हेच असे दैवत आहे, ज्यास तीन नेत्र आहेत. म्हणजे दोन नेत्र असणाऱ्यांना जे दिसते, त्यापेक्षा अधिक शिवाला दिसते. दोन नेत्र असणारा केवळ जन्म आणि मृत्यूपर्यंत असणारा प्रवासच जाणू शकतो. परंतु यापेक्षा अधिक तिसरा नेत्र असणारा शिव या दोन्ही ध्रुवांपलिकडे पाहण्याची क्षमता असला पाहिजे. जसे श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

Tuesday, June 4, 2024

कालिया मर्दन


कालिया मर्दन




भगवान श्रीकृष्ण और कालिया नाग की कथा श्रीमद्भागवतपुराण के दसवें स्कंध के सोलहवें अध्याय में कथन की है। यह कथा में भगवान श्रीकृष्ण ने अपने बचपन में की हुई प्रमुख लीला का वर्णन है, जो 'कालिया मर्दन' नाम से प्रसिद्ध  हैं |  यह कहानी संक्षिप्त रूप में इस तरह हैं-

उस समय भगवान श्रीकृष्ण छोटे  थे और अपने बडे भाई बलराम के साथ पिता    नंद बाबा और माता यशोदा मैया के साथ वृंदावन में रहते थे |

वृंदावन में भगवान श्रीकृष्ण अपने भाई और गोपालकों के साथ पशुओं  को लेकर उन को चराते, गाते नाचते, बॉंसुरी बजाते अपना समय खुशी से बीताते थे |

वृंदावन के पास यमुना नदी का एक पोखर था | जब नदी का पानी किसी बडे गड्ढे में जम जाता है, तब उसे पोखर कहते हैं | यह पोखर इतना बडा़ था, कि उस में समुद्र की तरह पानी उफनता हुआ  दिखता था | 

एक दिन उस पोखर में  कालिया नाम का एक नाग अपने परिवार के साथ रहने को आया | कालिया एक विषैला और पांच फन वाला नाग था | उस के मुॅंह से ज्वालाए निकलती थी |   यमुना के पोखर में रहने से पहले वह   रमणक द्वीप में रहता था । लेकिन नागों के शत्रु गरुड़ के डर से उसे वहां से भागना पड़ा। गरुड़ को वृंदावन में रहने वाले योगी सौभरि ने श्राप दिया था कि  गरुड  वृंदावन आयेंगे तो गरुड की  मृत्यु हो जायेगी | यह जानकर कि यही एकमात्र स्थान है जहाँ गरुड़ नहीं आ सकते, कालिया ने वृंदावन में वास करने का निर्णय लिया।

एक दिन, भगवान श्रीकृष्ण और उनके बाल सखा यमुना नदी के किनारे  खेल रहे थे। उस समय भगवान श्रीकृष्ण का ध्यान यमुना नदी के पोखर पर गया |  यमुना  का  पानी   कालिया के विष के प्रभाव से एकदम काला हो गया था। किनारे पे जो पेड़ और लताए थी, वह भी कालिया के विष के प्रभाव से  सूख गई थी | उस जगह पे कोई पशु या पक्षी जीवित नहीं रह सकता था |

भगवान श्रीकृष्ण ने सोचा कि उसे पोखर में उतर कर उस महासर्प के अभिमान को चूर करना होगा | उस से पोखर में पशुओं और लोगों के लिये पानी की सुविधा भी हो जाएगी |  उस से और भी एक लाभ होता | कालिया के परिवार में और भी असंख्य सॉंप थे , जो वृंदावन में जहॉं तहॉं घूमा करते थे और उस प्रदेश को अपने अस्तित्व से भयंकर बनाते थे | यदि कालिया को मार दिया गया तो वे स्थल भी सुरक्षित हो जायेंगे |

यमुना नदी के किनारे एक कदंब वृक्ष था, जो अकेला जीवित था | उस का कारण यह कहा जाता है, कि जब गरुड  अपनी  मॉं की मुक्ति के लिये अमृत ले जा रहा था, तब अमृत की कुछ बूंदे गरुड ने भविष्य में भगवान श्रीकृष्ण की सहायता के लिये जान बूझकर गिरायी थी | कोई और लोग ऐसा भी कहते हैं कि भगवान श्रीकृष्ण के पदस्पर्श से कदंब वृक्ष जीवित हो गया |

भगवान श्रीकृष्णने उस कदंब वृक्षपर चढकर  पानी में कूदने का निश्चय किया | उस ने किसी से कुछ नहीं कहा | अपने बाल बाॅंध लिये |  धोती कसकर  बाॅंध ली  | आपनी बॉंसुरी कमर में बॉंध दी | चप्पल उतार दी |  अपने हाथ की रस्सी वगैरह दूर फेक दी | एक ही क्षण में भगवान श्रीकृष्ण    कालिया को सबक सिखाने के लिए नदी में कूद पड़े |

भगवान श्रीकृष्ण के यमुना में कूदते ही ऐसी उथल पुथल आ गई मानो क्षीर सागर में मंदर पर्वत  गिर पडा हो | वह उथल पुथल पाताल तक पहुॅंच गई |

यमुना के पानी में अचानक हुई यह उथल पुथल देखकर कालिया को बड़ा क्रोध आ गया | उस ने अपने काले और बड़े बड़े  पॉंच फण खोले और भगवान श्रीकृष्ण पर हमला बोल दिया | फिर कालिया ने अपने विशाल शरीर से कृष्ण को पकड़ लिया,उस ने अपना मुख इस तरह से खोला ताकि उस के बड़े बड़े दॉंत दीखे | वह विषयुक्त ज्वालाए उगल रहा था | मुड़नेवाले अपने शरीर को उस ने फैला दिया |भगवान श्रीकृष्ण को उस ने जगह जगह काटा | उस के शरीर को लपेटकर वह दबाने लगा |  यह देख  कालिया के बन्धु, स्त्री, बच्चे, आदि महासर्पोंने भगवान श्रीकृष्ण को घेर  लिया और लपटें उगलते उसे काटा | भगवान श्रीकृष्ण मूर्च्छित हो गये |

गोपकुमार, जो यह सब देखते थे, डर गये | वे  भागे भागे वृंदावन गये और यशोदा मैया को ऑंखों देखा हाल बताया | यह सुनकर यशोदा  मैया और नंद बाबा सब गॉंववालों के साथ यमुना की पोखर की ओर दौड पडे |

सब यमुना के किनारे, भगवान श्रीकृष्ण को देखकर पसीना पसीना हो गये | भगवान श्रीकृष्ण सॉंप के चुॅंगल में फॅंसकर बडे दयनीय स्थिती में थे | ऐसा लगता था, जैसे कोई कुछ भी न कर सकता हो | नंद बाबा और यशोदा मैया मूर्च्छित हो गये | बाकी लोगों ने उन पर पानी छिडक कर उन को होश में लाया |

सब दुःखी हो उठे | यह सोच कर कि यशोदा का पुत्र मर गया , हर किसी ने तरह तरह की बातें की,

'चलो हम सब पोखर में उतर कर उस सॉंप से युद्ध करे | आओ, कृष्ण को छुडाये | नहीं तो इस कालिया की विषाग्नी में हम भी मर जायेंगे | बिना कृष्ण के हम कैसे गॉंव जाये?'

बलराम सब देख रहा था और सब की बातें सुन रहा था | आखिर उस ने भगवान श्रीकृष्ण से यूॅं कहा, 'अरे कृष्ण, लोकहित की भावना भूलकर इस कम्बख्त साॅंप की चुॅंगल में आ फसे | देखा, हमारे सब लोग किस दयनीय स्थिति में हैं | इस ज़हरीले कीडे को मारकर हम सब को संतुष्ट करो |'

यह सुनते ही भगवान श्रीकृष्ण होश में आ गये और तुरन्त सांप की चुॅंगल से निकल आये |  उन्हों ने  कालिया की पूंछ पकड़ी और कूदकर उसके फन पर  जाकर खड़े रह गए। भगवान श्रीकृष्ण ने मानो पूरे ब्रह्मांड का भार अपने सर पर  लिया था | वह कालिया के सभी सिरों को अपने पैरों से जोर जोर पीटने लगे ताकि उसके अंदर का सारा विष बाहर निकल जाए। भगवान‌ श्रीकृष्ण अपने हाथ में बांसुरी लेकर कालिया के सिर पर नृत्य करने लगे। कालिया के सिर पर नृत्य करते हुए कृष्ण धीरे-धीरे यमुना के पानी की सतह पर आ गए।

वह कालिया की पूॅंछ हाथ में लेकर उस के सिर पर उछल कूद करने लगे | यमुना की लहरें मानो ताल दे रही हो | भगवान श्रीकृष्ण को  सुरक्षित देखकर सारे गोकुलवासी खुशी से झूम उठे , गाने लगे | भगवान कृष्ण को कालिया के फणों पर नृत्य करते , आकाश में से देवताओं ने देखा |

फनों पर श्रीकृष्ण के लगातार वार से कालिया के मुंह से रक्त प्रवाह शुरू हो गया और वह धीरे-धीरे मरने लगा। लेकिन तभी कालिया की पत्नियां प्रकट हुईं और हाथ जोड़कर श्री कृष्ण से प्रार्थना करने और अपने पति के जीवन के लिए दया मांगने लगीं।

कालिया के सिर चूर हो गये | उस की नाकों से खून की धारा बहने लगी | उस के दॉंत टूट गये | लपटों के साथ उस के मुॅंह से विष निकला | वह कुॅंचल जाने पर कमल डॅंडी हा हो गया | मरने को ही था | तब उस ने दीन स्वर में कहा,' देव, यह बिना जाने कि तुम सर्वेश्वर हो, मैं ने अपने तुच्छ कोप में तुम्हारे शरीर पर प्रहार किया | तुम ने मुझे उचित दण्ड दिया | मुझ पर दया करो | मुझे क्षमा करो | मेरा विष चला गया | मेरी बुद्धि ठिकाने पे आ गई हैं | मैं तुम्हारा दास बनकर रहूॅंगा | जो तुम कहोगे वह करूंगा | तुम्हारे चरण छूकर मैं पवित्र हो गया हूॅं | तुम्हारा कोप मेरे लिये तुम्हारा अनुग्रह हैं |

भगवान श्रीकृष्ण को कालिया पर दया आ गई और उन्हों ने कहा ,' इस के  आगे तुम यमुना नदी में नहीं रह सकते | तुम अपने लोगों को इकट्ठा करके समुद्र में चले जाओ | जब तुम्हारा विष चला जायेगा , तो नदी का पानी साफ हो जायेगा और लोगों के काम आयेगा | तुम्हारे सिर पर मेरे पैरों के चिह्न देखकर गरुड तुम्हारा कुछ नहीं बिगाडेगा | यही तुम्हे मेरा वर हैं | '

कालिया अपने परिवार को लेकर समुद्र की ओर निकल पड़ा | भगवान श्रीकृष्ण नदी में से किनारे पे आ गये | यशोदा  मैया ने उसे गले लगाया | भगवान श्रीकृष्ण ने नंद बाबा को नमस्कार किया | नंद बाबा ने उसे आशिर्वाद दिया | गोप कुमारों ने भगवान श्रीकृष्ण को घेर दिया और उस की प्रशंसा करने लगे | उस पर आश्चर्य करने लगे | उस के बाद भगवान श्रीकृष्ण की प्रशंसा करते हुए सब वृंदावन लौट पड़े |

भगवान श्रीकृष्ण ने 'कालिया मर्दन' की इस कहानी को ऐसा वर दिया है कि जो कोई इस कहानी का पाठ या श्रवण करेगा उसे सॉंपों से भय नहीं रहेगा |


  










































































China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...