थायलंडमध्ये कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक सुसंवाद यांना मोठे महत्त्व आहे. राजघराण्याविषयी अत्यंत निष्ठा व आदरभाव राखला जातो. राजा किंवा राजघराण्याबद्दल अपमानास्पद बोलणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून बहुतेक थाई लोक मंदिरात जाणे, भिक्षूंना आदर देणे व दानधर्म करणे हे नियमित करतात.
“वाय” (Wai) हा पारंपरिक अभिवादनाचा प्रकार आहे — दोन्ही हात छातीपुढे जोडून थोडेसे मस्तक झुकवले जाते.
प्रौढ, भिक्षू आणि राजघराण्याच्या सदस्यांप्रती आदर व्यक्त करणे सामाजिक शिष्टाचाराचा महत्त्वाचा भाग आहे.
थाई समाजात संयम, हसतमुखपणा आणि मतभेद टाळणे हे चांगल्या वर्तनाचे चिन्ह मानले जाते.
🙏 थाई शिष्टाचार (Etiquette)
१. थायलंडमध्ये “चेहऱ्याचा सन्मान (Saving face)” ही कल्पना महत्त्वाची आहे — कोणावरही रागाने ओरडणे, उघडपणे टीका करणे किंवा वाद घालणे असभ्य समजले जाते.
२. डोक्याला पवित्र मानले जाते, त्यामुळे कोणाच्याही डोक्याला हात लावू नये — अगदी मुलांच्या डोक्यालाही नाही.
३. पाय अपवित्र मानले जातात; पायाने वस्तू दाखवू नयेत किंवा पाय कोणाच्या दिशेने ठेवू नयेत.
४. मंदिरात जाताना खांदे व गुडघे झाकतील अशी साधी वस्त्रे परिधान करावीत. पादत्राणे नेहमी मंदिराच्या बाहेर काढावीत.
५. भिक्षूंना आदराने नमस्कार करावा; स्त्रियांनी भिक्षूला थेट स्पर्श करू नये.
✅ करावयाच्या गोष्टी (Do’s)
१. “वाय” करून नमस्कार करा – विशेषतः वयस्कर किंवा अधिकारी व्यक्तींना.
२. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बूट/चप्पल काढा.
३. थाई लोक राजाविषयी फार संवेदनाशील आहेत. त्यामुळे राजघराण्याचा अनादर होईल असे काही करू नका. थाई ध्वजाचा मान राखा. ४. लोकांशी बोलताना हसतमुख आणि सौम्य रहा.
५. वस्तू दोन्ही हातांनी द्या किंवा घ्या.
६. भोजन करताना यजमान सुरुवात करेपर्यंत वाट पहा.
७. माथा झुकवून आदर दाखवणे हे नम्रतेचे चिन्ह मानले जाते.
❌ करू नयेत अशा गोष्टी (Don’ts)
१. राजघराण्याविषयी किंवा धर्माविषयी टीका करू नका.
२. रागाने बोलू नका किंवा ओरडू नका – ते अत्यंत अशिष्ट मानले जाते.
३. कोणाच्याही डोक्याला हात लावू नका.
४. पाय उंचावून बसू नका किंवा पायाने काहीही दाखवू नका.
५. मंदिरात उघडी वस्त्रे घालून जाऊ नका.
६. भिक्षूंना स्पर्श करू नका (विशेषतः स्त्रिया).
७. सार्वजनिक ठिकाणी प्रेमप्रदर्शन किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळा.
✈️ प्रवाशांसाठी टिप्स
१. थाई लोक अतिथीप्रिय असतात; थोडे थाई शब्द जसे सवद्दी का (नमस्कार) आणि खोब खुन का (धन्यवाद) वापरल्यास आपुलकी वाढते.
२. हसून प्रतिसाद देणे हे थायलंडमध्ये सभ्यतेचे चिन्ह आहे.
३. रस्त्यावर चालताना किंवा बाजारात व्यवहार करताना शांत, संयमी आणि नम्र राहा.
थाई शिष्टाचार
१. मंदिरामध्ये जाताना अशिष्ट पोषाख घालू नये. हात पाय झाकणारा पोषाख घालणे आवश्यक आहे.
२. एखादा धार्मिक विधी चालू असताना तुम्हाला त्याची माहिती नसेल तर त्यात भाग घेऊ नका. परंतु त्या विधीचा अनादर होईल असे काही करू नका.
३. राजा किंवा राजघराण्याचा अपमान होईल असे काही करू नका. राजा किंवा राजघराण्याचा अपमान करणे हा थायलंडमध्ये गुन्हा आहे.
४. सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता पार्क्स, रेल्वे स्टेशन्स, चित्रपटगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी राजगीत किंवा राष्ट्रगीत वाजविले जाते.या वेLee शांत उभे राहून राजगीत किंवा राष्ट्रगीताचा आदर राखा.
५. स्वागत करताना किंवा निरोप घेताना थाई लोक आपल्याप्रमाणेच दोन्ही हात जोडून नमस्कार करतात. यास ते 'वाई' असे म्हणतात.
बुद्धमंदिरांमध्ये जाताना पाळावयाचे शिष्टाचार: बुद्धमंदिरांमध्ये जाताना काही शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे. बुद्धमंदिरांमध्ये जाताना शॉर्ट् स्, स्लिपर्स, सँडल्स, गळा उघडे असलेले टॉप्स, स्लीव्हलेस टी शर्टस घालून जाऊ नये. आयत्या वेळी तुम्हाला मंदिरात जाण्याचा पोषाख Sarong भाड्याने मिळू शकतो. मंदिरांमध्ये बसताना मूर्तीकडे पाय करून बसू नये. हे शिष्टाचार पाळले नाहीतर तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
स्थान, विस्तार आणि सीमा:
थायलंडचा विस्तार साधारण ५° ते २०° उत्तर अक्षांश आणि ९७° ते १०५° पूर्व रेखांशांदरम्यान आहे.
थायलंडच्या पश्चिमेस अंदमान समुद्र, तर पूर्वेस थायलंडचे आखात (Gulf of Thailand) आहे.
थायलंडच्या उत्तरेस म्यानमार आणि लाओस, पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस मलेशिया, आणि पश्चिमेस म्यानमार व अंदमान समुद्र आहेत.
हवामान:
थायलंड भारताप्रमाणेच मोसमी पावसाच्या प्रदेशात येतो. त्यामुळे ऋतू जवळपास भारतासारखेच. त्यामुळे जाण्यास योग्य काळ ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारी -मार्च.
भौगोलिक विभाग:
भौगोलिक दृष्ट्या थायलंडचे, उत्तर, ईशान्य, मध्य आणि दक्षिण असे चार ठळक विभाग आहेत.
१. उत्तर थायलंड (Northern Thailand):
हा भाग प्रामुख्याने अरण्याच्छादित डोंगररांगा आणि दऱ्यांनी व्यापलेला आहे.
येथे पिंग, नान, यॉम आणि वांग या नद्या उगम पावतात आणि पुढे मध्य थायलंडमधील चाओ फ्राया (Chao Phraya) नदीला मिळतात, जी अखेरीस थायलंडच्या आखातास (Gulf of Thailand) जाऊन मिसळते.
या विभागात सुपीक दऱ्या, थंड हवामान आणि सुंदर पर्वतरांगांमुळे पर्यटनाला विशेष महत्त्व आहे.
थायलंडच्या ईशान्य दिशेला खोरातचे पठार (Khorat Plateau) आहे, जे उत्तर भागाच्या पुढे विस्तारलेले आहे.
२. ईशान्य थायलंड (इसान):
ईशान्य थायलंड हा भाग इसान म्हणूनही ओळखला जातो. हा भाग खोरात पठारावर (Khorat Plateau) वसलेला आहे — म्हणजेच तो इतर प्रदेशांपेक्षा उंचसखल आणि कोरडाच आहे. येथे मेकाँग नदी (Mekong River) ही मुख्य नदी असून ती थायलंड आणि लाओस यांच्या सीमारेषेवरून वाहते. या भागात पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. तरीसुद्धा येथे तांदूळ आणि कसावा (tapioca) मोठ्या प्रमाणावर पिकवले जातात. इसान प्रदेशातील लोकांची बोली आणि संस्कृती लाओसशी खूप साधर्म्य दर्शवते. येथे थाई आणि लाओ संस्कृतींचा सुंदर संगम दिसतो — त्यामुळे संगीत, खाद्यसंस्कृती, नृत्य या सर्वांमध्ये वेगळेपणा जाणवतो.
३. मध्य थायलंड
हा भाग मुख्यतः चाओ फ्रया (Chao Phraya) नदीच्या सुपीक खोऱ्याने व्यापलेला आहे.
चार फ्राया नदीच्या सुपीक खोऱ्यामुळे हा प्रदेश थायलंडचे “तांदळाचे कोठार” (Rice Bowl of Thailand) म्हणून ओळखला जातो.
चाओ फ्राया नदीच्या काठी राजधानी बँकॉक वसली आहे.
नदीकाठच्या प्रदेशात भाताच्या शेतांबरोबरच साखर, फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
४. दक्षिण थायलंड (Southern Thailand):-
हा भाग मले द्वीपकल्पाच्या अरुंद पट्ट्यावर पसरलेला आहे.
प्रदेश अरण्याच्छादित पर्वतरांगांनी व्यापलेला असून, अनेक नद्या छोट्या दऱ्यांतून वाहत थेट समुद्रात मिसळतात.
याच्या पूर्वेस थायलंडचे आखात (Gulf of Thailand) आणि पश्चिमेस अंदमान समुद्र (Andaman Sea) आहे.
दोन्ही बाजूंना शेकडो लहानमोठी बेटे पसरलेली असून, फुकेत, क्रबी आणि को समुई यांसारखी बेटे पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहेत.
या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोट्यवधी वर्षांपासून तयार झालेले विविध आकारांचे चुनखडीचे खडक (limestone formations) आणि त्यांतील अद्भुत गुहा. हे भूशिल्प थायलंडच्या नैसर्गिक सौंदर्याचा महत्त्वाचा भाग आहे.
दक्षिण भागातच क्रा संयोगभूमी (Isthmus of Kra) आहे. हा थायलंडचा सर्वात अरुंद भाग मानला जातो. (दोन मोठ्या भूप्रदेशांना जोडणाऱ्या अरुंद भागास isthmus म्हणतात.)
येथे अंदमान समुद्र आणि थायलंडचा आखात यांना जोडणारा कालवा (Kra Canal) (सुएझ किंवा पनामा कालव्यांप्रमाणे) खोदण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून चर्चेत आहे, कारण त्यामुळे आशियातील सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुलभ होईल.
इतिहास
थाई लोकांचे उत्पत्तिस्थान (इ.स.पू. १३००)
थाई लोकांच्या उत्पत्तिसंबंधी वेगवेगळी मते आहेत. एक मत असे आहे की थाई लोक मूळचे वायव्य चीनमधील सिचुआन प्रांतातील असून, ते दक्षिण चीनमार्गे थायलंडमध्ये स्थलांतरित झाले. या स्थलांतराचे निश्चित कारण ज्ञात नाही, परंतु चीनमधील हान लोकांच्या विस्तारामुळे किंवा नवीन शेतीयोग्य प्रदेशांच्या शोधामुळे हे स्थलांतर घडले असावे. त्यांच्या एक शाखेने उत्तर थायलंडमध्ये, तर दुसऱ्या शाखेने दक्षिणेकडे जाऊन स्थायिकता मिळवली.
हा सिद्धांत दीर्घकाळ सर्वमान्य मानला गेला. परंतु अलीकडील काळात थायलंडच्या नैऋत्येकडील बान चिअंग (Ban Chiang) या खेड्यातील उत्खननातून सापडलेल्या पुरातन वस्तूंवरून येथे इ.स.पू. ३६०० च्या सुमारासच प्रगत संस्कृती अस्तित्वात होती, असे दिसून आले. त्यामुळे काही विद्वानांचे मत आहे की थाई लोक मूळचे याच प्रदेशातील असावेत आणि पुढे ते चीन व आशियाच्या इतर भागांत स्थलांतरित झाले असावेत.
काही संशोधकांच्या मते थाई लोक मंगोल वंशाचे नसून ऑस्ट्रोनेशिअन वंशाशी निगडित आहेत. काहीही असो, तेराव्या शतकापर्यंत थाई लोक थायलंडमध्ये स्थिर झाले आणि पुढे त्यांनी सुखोथाईसारख्या पहिल्या थाई राजवटीची स्थापना केली.
ख्मेर राजवट (इ.स. ८०० ते १३५३)
आग्नेय आशियामध्ये अनेक लहान-मोठी राज्ये अस्तित्वात असतानाच नवव्या शतकात एक प्रभावशाली साम्राज्य उदयास आले — ख्मेर साम्राज्य. हे साम्राज्य आजच्या कंबोडियामध्ये केंद्रित होते, परंतु त्याचा प्रभाव थायलंडच्या ईशान्य आणि मध्य भागांपर्यंत तसेच लाओसपर्यंत विस्तारला होता.
थायलंडमधील लोपबुरी, फिमाई (Phimai) आणि कांचनबुरी या प्रदेशांमध्ये आजही ख्मेर स्थापत्यकलेच्या आणि संस्कृतीच्या खुणा दिसतात. येथे त्या काळात बांधलेली पाषाणातील मंदिरे आजही या समृद्ध संस्कृतीची साक्ष देतात.
या कालखंडात आणखी एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे मॉन किंवा द्वारावती संस्कृती. या संस्कृतीवरही भारताचा ठसा स्पष्टपणे दिसतो. ख्मेर आणि द्वारावती या दोन्ही संस्कृतींमध्ये हिंदू आणि बौद्ध विचारांचा सुंदर संगम झाला होता. त्याच काळात थेरवाद बौद्ध धर्म थायलंडमध्ये दृढपणे स्थिरावला आणि संस्कृत भाषा व लिपी प्रचलित झाली.
ख्मेर साम्राज्याची राजधानी अंकोर (Angkor) येथे होती. येथे उभारलेले अंकोरवाट मंदिर आज जगातील सर्वात मोठ्या धार्मिक वास्तूंमध्ये गणले जाते आणि त्या वैभवशाली साम्राज्याची साक्ष देत उभे आहे.
इ.स. ८०२ मध्ये जयवर्मन दुसरा याने स्वतःला ख्मेर लोकांचा ‘देवराजा’ म्हणून घोषित केले. त्या नंतरचे सर्व ख्मेर राजे आपल्या नावामागे ‘वर्मन’ हे विशेषण लावत.
साम्राज्याचा विस्तार उत्तरेला फिमाई पर्यंत झाला होता आणि त्याचे थाई राज्यांशी वारंवार संघर्ष होत असत.
शेवटी, इ.स. १३५३ मध्ये थाई लोकांच्या आक्रमणानंतर ख्मेर साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि त्या भव्य संस्कृतीचा शेवट झाला. तथापि, तिचा सांस्कृतिक वारसा आजही थायलंडच्या कला, स्थापत्य आणि धार्मिक परंपरांमध्ये जिवंत आहे.
सुखोथाई राजवट (इ.स. १२३८ – १३५०)
तेराव्या शतकाच्या मध्यात मीकाँग नदीच्या खोऱ्यातील काही थाई राज्यांनी एकत्र येऊन ख्मेर साम्राज्याचा अंत केला आणि इ.स. १२३८ मध्ये पहिल्या स्वतंत्र थाई राजवटीची स्थापना केली. ही राजवट सुखोथाई राजवट म्हणून ओळखली जाते.
‘सुखोथाई’ या शब्दाचा अर्थ आहे — “सुखाची पहाट”.
सुखोथाईचा काळ थायलंडच्या सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.
त्या काळात असे म्हटले जाई की —
“पाण्यामध्ये मासे होते आणि शेतामध्ये भात होता,”
म्हणजेच लोकसमृद्धी आणि समाधानाचे प्रतीक.
सुखोथाई राजवटीचा विस्तार उत्तरेस लाओसपर्यंत आणि दक्षिणेकडे मले द्वीपकल्पापर्यंत झाला होता. या काळात थायलंडचे चीन, भारत, कंबोडिया आदी देशांशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले.
सुखोथाईच्या सर्वात प्रसिद्ध राजांपैकी एक म्हणजे राजा रामखामहंग (Ramkhamhaeng). त्यांच्या कारकीर्दीत आधुनिक थाई लिपीचा विकास झाला. त्यांनी लोकाभिमुख शासनपद्धती राबवली, तसेच कला, साहित्य, चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा मोठा विकास झाला.
सुखोथाई राजवट फार काळ टिकली नाही. चौदाव्या शतकात तिचा ऱ्हास होऊन पुढे अयुथया राजवटीचा उदय झाला. तरीही थायलंडच्या संस्कृतीत सुखोथाईचा वारसा आजही जिवंत आहे.
सुखोथाई राजवटीच्या काळातच, उत्तर थायलंडमध्ये मीकॉंग नदीच्या खोऱ्यात लन्ना राजवटीचा उदय झाला.
‘लन्ना’ या शब्दाचा अर्थ आहे — “दहा लाख भाताच्या शेतांचे राज्य”, ज्यावरून या प्रदेशाची संपन्नता आणि कृषीप्रधानता स्पष्ट होते.
राजा मेंग राय (King Mengrai) हा लन्ना राजवटीचा संस्थापक मानला जातो. इ.स. १२५९ मध्ये तो सिंहासनावर बसला आणि काही वर्षांनी त्याने चिअंग माय (Chiang Mai) येथे राजधानी स्थापन केली.
लन्ना राजवट सुमारे दोनशे वर्षे टिकली. या काळात राज्याने सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगती साधली.
पंधराव्या शतकात राजा तिलोकराय (King Tilokaraj) यांच्या काळात कला, साहित्य आणि धर्म यांचा मोठा उत्कर्ष झाला. बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला आणि लन्ना प्रदेश थायलंडमधील धार्मिक केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला.
तथापि, तिलोकरायनंतर अंतर्गत कलह आणि सुखोथाई व अयुथया राजवटींबरोबरच्या संघर्षांमुळे लन्ना राजवट कमजोर झाली. अखेरीस इ.स. १५५८ मध्ये ती म्यानमारच्या आधिपत्याखाली गेली आणि हळूहळू स्वतंत्र अस्तित्व हरवून बसली.
अयुथया राजवट (इ.स. १३५० – १७६७)
सुखोथाई राजवटीच्या ऱ्हासानंतर चौदाव्या शतकात अयुथया या नव्या आणि शक्तिशाली राजवटीचा उदय झाला.
ही राजवट रामा थिबोडी (Ramathibodi I) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. त्यांनी इ.स. १३५० मध्ये अयुथया शहरात राजधानी स्थापन केली.
रामा थिबोडी यांनी थेरवाद बौद्ध धर्म राज्याचा अधिकृत धर्म म्हणून घोषित केला आणि धर्मशास्त्रावर आधारित राजकीय व न्यायव्यवस्था प्रस्थापित केली. त्यांच्या राज्यकाळात अयुथयाने सुखोथाई राज्य आपल्या साम्राज्यात सामील केले आणि आपले क्षेत्र विस्तारले.
अयुथया राजवटीच्या काळात थायलंडचे युरोपीय देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले.
मनाम (किंवा चाओ फ्रया) नदीच्या खोऱ्यात वसलेले अयुथया शहर हे या राजवटीचे केंद्र होते. हे शहर तीन नद्यांच्या — चाओ फ्रया, पसक आणि लोपबुरी — त्रिवेणी संगमावर असलेल्या बेटावर वसले आहे. सुपीक भातशेती, कालव्यांचे जाळे आणि व्यापारासाठी समुद्राजवळ असलेले स्थान यामुळे अयुथया वेगाने समृद्ध आणि वैभवशाली शहर बनले.
त्या काळी त्याची तुलना “पूर्वेचे पॅरिस” अशी केली जाई.
चौदाव्या आणि पंधराव्या शतकांत अयुथया राजे अत्यंत प्रबळ झाले. त्यांनी यू-थोंग आणि लोपबुरी प्रदेश सामील केले.
रामाथिबोडी आणि त्यानंतरच्या राजांनी अयुथया साम्राज्याचा विस्तार उत्तर दिशेस सुखोथाईपर्यंत आणि पूर्वेस ख्मेर साम्राज्याची राजधानी अंगकोरपर्यंत केला. मात्र लन्ना राज्यावर विजय मिळवण्यात त्यांना यश आले नाही.
अयुथया राजवट तब्बल ४१७ वर्षे दक्षिण-पूर्व आशियातील एक प्रभावी सत्ता म्हणून टिकली.
शेवटी, इ.स. १७६७ मध्ये म्यानमारच्या आक्रमकांनी अयुथया राजधानीचा विध्वंस केला आणि या गौरवशाली राजवटीचा अंत झाला.
थाई लोक आपला देश ‘मुआंग थाई’ म्हणजे “स्वतंत्र लोकांचा देश” असे म्हणत असत, तर परदेशी लोक त्यांना ‘सयाम’ (Siam) आणि ‘सयामी लोक’ या नावांनी ओळखत.
चक्री राजघराणे (Chakri Dynasty)
इ.स. १७६७ मध्ये म्यानमारच्या (ब्रह्मदेशाच्या) सैन्याने थायलंडवर आक्रमण करून अयुथया राजधानीचा विध्वंस केला.
या संकटानंतर थाई सेनेचे नेतृत्व सेनापती थाकसिन याने हाती घेतले. त्याने देशाचे पुनरुत्थान केले आणि राजधानीचे शहर चाओ फ्रया नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील थोनबुरी (Thonburi) येथे नेले.
थाकसिन नंतर राजा म्हणून सिंहासनावर बसला, पण त्याची राजवट फार काळ टिकली नाही.
इ.स. १७८२ मध्ये, थाकसिनला पदच्युत करण्यात आले आणि त्याच वर्षी चक्री राजवंशाचा उदय झाला. या नव्या राजघराण्याचे संस्थापक होते राजा रामा पहिला (King Rama I). ते पूर्वीच्या लष्करप्रमुख पदावरून राजसिंहासनावर आले.
रामा पहिला यांनी राजधानी थोनबुरीवरून चाओ फ्रया नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हलवली, जेथे आजचे बँकॉक (Bangkok) शहर वसलेले आहे.
बँकॉक शहराच्या स्थानामुळे ते लष्करी आणि व्यापारी दृष्ट्या अत्यंत सुरक्षित व सोयीस्कर ठरले.
त्यांनीच चक्री राजघराण्याची स्थापना केली, आणि त्यानंतरपासून थायलंडवर या राजघराण्याचीच सत्ता चालू आहे.
चक्री वंशातील राजांना पारंपरिकरीत्या “रामा” हे नाव दिले जाते. उदाहरणार्थ, रामा पहिला, रामा दुसरा अशा क्रमांकाने त्यांचा उल्लेख होतो.
या वंशातील सर्वात प्रसिद्ध आणि दीर्घकाळ राज्य करणारे सम्राट म्हणजे राजा भूमिबल अदुल्यादेज (Rama IX), ज्यांनी इ.स. १९४६ पासून २०१६ पर्यंत राज्य केले.
त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र राजा महामह वजिरालोंगकॉन (Rama X) हे सध्याचे थायलंडचे सम्राट आहेत.
चक्री राजघराणे आजही थायलंडच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय जीवनाचे प्रतीक मानले जाते.
युरोपीय वसाहतवादाचे आग्नेय आशियात आगमन आणि थायलंडची स्वायत्तता
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात, युरोपीय वसाहतवादाचा प्रभाव संपूर्ण आग्नेय आशियामध्ये पसरत होता.
ब्रिटिशांनी म्यानमारवर तर फ्रेंचांनी लाओस आणि कंबोडियावर नियंत्रण मिळवले होते.
पण या दोन्ही सामर्थ्यशाली वसाहतवादी राष्ट्रांमध्ये थायलंड हे एक स्वतंत्र बफर राष्ट्र (buffer state) म्हणून टिकले. याची प्रमुख कारणे अशी-
१. भौगोलिक स्थिती व सामरिक वास्तव —
थायलंडच्या पश्चिमेला ब्रिटिशांचा प्रभाव असलेला ब्रह्मदेश (म्यानमार) तर पूर्वेला फ्रेंचांचा इंडोचायना प्रदेश होता. दोन्ही साम्राज्यांमध्ये थायलंड एक "बफर स्टेट" (Buffer State) बनला होता.
थायलंडच्या पर्वतीय व दलदलीच्या प्रदेशांमुळे कोणत्याही साम्राज्याला संपूर्ण देश ताब्यात घेणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे थेट संघर्ष झाल्यास दोघांचंही नुकसान होणार हे ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनाही स्पष्ट झालं.
२. करार व राजनैतिक तोलामोल —
या सामरिक वास्तवाची जाणीव असल्याने ब्रिटन आणि फ्रान्स यांनी थायलंडशी स्वतंत्र करार केले आणि देशाला स्वतंत्र ठेवून त्याला तटस्थ प्रदेशाचा दर्जा दिला.
३. थायलंडची अगतिकता
थायलंडने या परिस्थितीचा राजनैतिक फायदा घेतला असला तरी, हा निर्णय पूर्णतः स्वातंत्र्याचा नव्हता. दोन वसाहती शक्तींमध्ये सापडलेल्या या देशाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही प्रदेश सोडावे लागले आणि काही सवलती द्याव्या लागल्या. त्यामुळे ही भूमिका दूरदृष्टीपेक्षा परिस्थितिजन्य अगतिकतेतून आलेली होती.
इ.स. १८९६ मध्ये ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात “अँग्लो-फ्रेंच करार (Anglo-French Accord)” झाला.
या करारानुसार थायलंड हा दोन्ही देशांमध्ये “तटस्थ क्षेत्र” (Neutral Zone) राहील,
त्यामुळे कोणताही देश त्यावर थेट कब्जा करणार नाही, असे ठरले.
अशा प्रकारे थायलंडवर कधीच थेट युरोपीय वसाहतीचे राज्य झाले नाही.
बोवरिंग करार (Bowring Treaty), १८५५
इ.स. १८५५ मध्ये, ब्रिटिश राजदूत सर जॉन बोवरिंग बँकॉकला आला. त्यावेळी थायलंडचा राजा होता मोंकुट (King Rama IV). दोघांमध्ये झालेल्या कराराला बोवरिंग करार (Bowring Treaty) असे म्हणतात.
या करारानुसार ब्रिटिशांना थायलंडमध्ये व्यवसाय, व्यापार आणि जंगलातून लाकूड कापण्याचे अधिकार मिळाले. ब्रिटिश माल करमुक्त विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्याच्या बदल्यात ब्रिटिशांनी थायलंडचे स्वातंत्र्य आणि भौगोलिक अखंडता अबाधित ठेवण्याची हमी दिली.
या काळात ब्रिटिशांनी सुरू केलेले लाकूडतोडीचे मोठे प्रकल्प, तसेच भात निर्यात केंद्रित शेती, यांमुळे थाई ग्रामीण समाजात मोठे आर्थिक आणि सामाजिक बदल घडले.
युरोपीय वसाहतवादाच्या आगमनानंतर थाई समाजाचे जागतिकीकरण सुरू झाले. थाई विद्यार्थी शिक्षणासाठी युरोपात जाऊ लागले. त्यांनी फ्रान्समधील लोकशाही, संसदीय शासनव्यवस्था आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला. याच प्रेरणेने पुढे थायलंडमध्ये राजकीय आणि सामाजिक सुधारणांचे आंदोलन सुरू झाले.
घटनात्मक राजेशाहीची स्थापना: (इ.स. १९३२)
इ.स. १९३२ मध्ये थायलंडच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण राजकीय क्रांती घडली.
या क्रांतीतून देशातील संपूर्ण राजेशाहीचा अंत झाला आणि घटनात्मक राजेशाही (Constitutional Monarchy) या नव्या शासनपद्धतीची स्थापना करण्यात आली.
ही क्रांती "पीपल्स पार्टी" (Khana Ratsadon) या गटाच्या नेतृत्वाखाली झाली.
राजा राम सातवा (Rama VII) यांच्या कारकीर्दीत या क्रांतीनंतर संविधान तयार झाले आणि राजाची सत्ता मर्यादित होऊन संविधान आणि संसदेस प्रमुख स्थान मिळाले.
या काळात देशात अनेक सार्वजनिक संस्था आणि प्रशासकीय विभागांची स्थापना करण्यात आली.
उदाहरणार्थ — शिक्षण, वाहतूक, आणि न्यायव्यवस्था यांसाठी स्वतंत्र मंत्रालये तयार झाली.
त्या वेळी देशाचे अधिकृत नाव अजूनही ‘सयाम (Siam)’ असेच होते.
नंतर २४ जून १९३९ रोजी, सयामचे नाव बदलून ‘थायलंड (Thailand)’ असे करण्यात आले.
त्याच सुमारास चिअंग माय (Chiang Mai) या उत्तर भागातील प्रांताला सयामचा (थायलंडचा) अधिकृत भाग म्हणून समाविष्ट करण्यात आले.
दुसरे महायुद्ध: (१९३९–१९४५)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात थायलंडने अत्यंत कठीण राजनैतिक परिस्थितीचा सामना केला. जपानचे वाढते सामर्थ्य पाहता थायलंडने ओळखले की थेट विरोध केल्यास आपला निभाव लागणार नाही. म्हणून थायलंडने जपानबरोबर राजकीय समझोता केला आणि ब्रिटिश ब्रह्मदेश (म्यानमार) आणि मलाया (मलेशिया) वर आक्रमण करण्यासाठी जपानला आपल्या भूमीतून प्रवेश देण्याची परवानगी दिली.
या समझोत्यामुळे थायलंडला असा फायदा झाला की जपानने काही भूभाग थायलंडला परत दिले. वास्तवात थाई लोकांसाठी जपानी राजवट अत्यंत जुलमी ठरली. जपानचे सुमारे दीड लाख सैनिक थायलंडमध्ये तैनात होते आणि ते मित्रदेशाप्रमाणे नव्हे तर विजेत्या सत्तेसारखे वागत होते.
या काळात थायलंडची आर्थिक प्रगती ठप्प झाली. मित्रराष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांमध्ये बँकॉक आणि इतर शहरांचे प्रचंड नुकसान झाले; असंख्य निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. या सगळ्या परिस्थितीमुळे पंतप्रधान फिबुन सोंगक्रम यांच्या राजवटीविरुद्ध लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि १९४४ मध्ये त्यांना सत्ता सोडावी लागली.
दुसऱ्या महायुद्धानंतर:
यानंतर प्रथमच थायलंडमध्ये खऱ्या अर्थाने नागरी सरकार सत्तेवर आले. हेच थायलंडच्या आधुनिक लोकशाही प्रवासाचे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
महत्त्वाच्या घटना:
१२३८: सुखोथाई या पहिल्या थाई राजवटीची स्थापना
१२९६: उत्तर थायलंडमध्ये लन्ना राजवटीचा उदय. मेंग राय राजाकडून चिअंग माय शहराची स्थापना.
१३५०: राजा रामाथिबोडी यांच्या अधिपत्याखाली अयुथयामध्ये पहिल्या संयुक्त थाई राज्याची स्थापना
१३७८: अयुथया राजवटीचे सुखोथाई राज्यावर आक्रमण. सुखोथाई राज्य अयुथया राज्याचे मांडलिक राज्य.
१५४५: अयुथयाचे लन्ना राज्यावर आक्रमण. लन्ना राज्य अयुथयाचे मांडलिक
१५६४: अयुथयावर ब्रह्मी आक्रमण. अयुथयाचा पराभव आणि मानहानीकारक तह.
१६८८: अयुथयामध्ये राजकीय उठाव. पाश्चिमात्य धार्जिणा नाराई राजा पदच्युत. अयुथयाचे पश्चिमी देशांबरोबर संबंध संपुष्टात.
१७६७: अयुथयावर ब्रह्मी आक्रमण. अयुथयाचा आक्रमकांकडून विध्वंस. अयुथया राज्य संपुष्टात.
१७८२: चक्री राजवंशाचा उदय. थाकसिन यास पदच्युत करून रामा पहिला सत्तेवर.
१८९६: ब्रिटिश-फ्रेंच कराराद्वारे थायलंडला स्वातंत्र्याची हमी
१९३२: थायलंडमध्ये रक्तशून्य राज्यक्रांती. घटनात्मक राजेशाहीची स्थापना.
२४.६.१९३९ सयामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले.
१९४१: दुसर्या महायुद्धामध्ये जपानी सैन्याचा थायलंडमध्ये प्रवेश. थायलंडवर जपानच्या बाजूने लढण्याची सक्ती.
१९४४: थायलंडकडून अमेरिका आणि ब्रिटनविरुद्ध लढण्याचा जाहीरनामा मागे. थायलंड अमेरिकेचा साथीदार.
१९४६: थायलंडला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ५५ वा सदस्य म्हणून प्रवेश
१९६०-७०: कंबोडिया आणि व्हिएटनाममधील युद्धामध्ये थायलंडचा हस्तक्षेप. व्हिएटनाम युद्धामध्ये अमेरिकेचा थायलंडमध्ये लष्करी तळ.
१९९७: शेअर बाजारामध्ये मोठा उतार होऊन थाई अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम. बाथच्या किमतीमध्ये मोठी घट.
२००४: थायलंडला सुनामीचा मोठा फटका.
२००६: लष्करी क्रांती.
२००८: थायलंडमध्ये सरकारविरोधी निदर्शने. आणीबाणी जाहीर.
आजचा थायलंड
प्रशासकीय विभाग:
थायलंडची विभागणी एकूण ७६ प्रांतांमध्ये (Provinces) करण्यात आली आहे. प्रत्येक प्रांताला त्याची स्वतःची राजधानी (Provincial Capital) आहे. या प्रांतांची विभागणी जिल्ह्यांमध्ये (Districts / Amphoe) करण्यात आली आहे.
थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) ही एक विशेष प्रशासकीय विभाग (Special Administrative Area) मानली जाते. ती कोणत्याही प्रांताचा भाग नाही, परंतु तिला प्रांताच्या समान दर्जाचा दर्जा दिला आहे.
सन २०१० मध्ये थायलंडमध्ये एकूण ८७८ जिल्हे होते तर बँकॉकमध्ये स्वतंत्रपणे ५० जिल्हे (Districts) आहेत.
शासनपद्धती :
थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही (Constitutional Monarchy) शासनपद्धती आहे. या पद्धतीमध्ये राजा घटनात्मक प्रमुख असून राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो.
या शासनपद्धतीचे तीन प्रमुख विभाग आहेत —
१. कार्यकारी,
२. वैधानिक, आणि
३. न्याय विभाग.
१. कार्यकारी विभाग :
या विभागामध्ये राजा आणि पंतप्रधानांचा समावेश होतो.
राजा हा देशाचा घटनात्मक प्रमुख असून राष्ट्राच्या एकतेचे प्रतीक मानला जातो.
सध्याचे राजा महा वजिरालोंगकोर्न (Maha Vajiralongkorn) असून ते रामा दहावे (Rama X) म्हणून ओळखले जातात.
सरकारचे नेतृत्व पंतप्रधान करतात. २०२४ च्या अखेरीस थायलंडचे पंतप्रधान स्रेत्था थाविसिन (Srettha Thavisin) आहेत.
२. वैधानिक विभाग :
वैधानिक विभाग द्विशाखी (Bicameral) असून त्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधींचे सभागृह (House of Representatives), आणि
नियुक्त तसेच निवडून आलेले सदस्य असलेले सिनेट (Senate) यांचा समावेश होतो.
दोन्ही सभागृह मिळून राष्ट्रीय सभा (National Assembly) तयार होते, जी कायदे बनवते आणि सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते.
३. न्याय विभाग :
न्यायमंडळामध्ये घटनात्मक न्यायालय (Constitutional Court), सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तसेच प्रशासकीय आणि विशेष न्यायालये यांचा समावेश होतो.
हे न्यायालये स्वतंत्र असून न्यायदान आणि घटनात्मक व्याख्या करण्याचे अधिकार राखतात.
राजकीय पक्ष:
थायलंडची लोकशाही बहुपक्षीय (Multi-party) स्वरूपाची आहे.
साम्यवादी पक्षांवर पूर्वी बंदी होती, परंतु आज बहुतेक राजकीय पक्ष लोकशाही चौकटीत कार्य करतात.
राजकारणात लष्करी हस्तक्षेप व सत्ता-बदल अनेकदा झाले असले तरी आजचे थायलंड घटनात्मक आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित राष्ट्र म्हणून ओळखले जाते.
Office of the Election Commission of Thailand च्या ताजी माहितीप्रमाणे, थायलंडमध्ये एकूण ८२ राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत.
सध्या सत्तेत असलेला प्रमुख पक्ष म्हणजे Bhumjaithai Party (ภูมิใจไทย) आहे. याचा नेता म्हणजे Anutin Charnvirakul ज्यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये लोकसभेत ३११ मतांसह थायलंडचे पंतप्रधान म्हणून निवडले.
याचा संक्षिप्त परिचय पुढीलप्रमाणे:
Bhumjaithai पक्ष मुख्यतः उत्तरेकडच्या ईशान्य भागात प्रभावशाली असून हे क्षेत्र या पक्षाचे घनिष्ट अभियान क्षेत्र आहे.
या पक्षाने काही महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, जसे कॅनाबिस पुनर्नियमन (decriminalisation) आणि पर्यटन उभारणी यावर लक्ष दिले आहे.
तथापि, या सरकारला अनेक आव्हाने आहेत — समावेशक राजकारणाची मागणी वाढली आहे आणि पुढील निवडणुकीची वेळ लवकर येण्याची शक्यता आहे.
थायलंडचे सध्याचे राजे:
वजिरालोंकोर्न :- रामा दहावे, राजे भूमिबल अदुल्यादेज आणि राणी सिरिकित यांचे एकमेव पुत्र, २०१६ पासून राजपथावर.
थायलंडचे सध्याचे पंतप्रधान:
अनुतिन चर्नविराकुल :- २०२५ पासून पदावर.
🇹🇭 थायलंडचा राष्ट्रध्वज (ธงไตรรงค์ – Thong Trairong)
थायलंडचा सध्याचा ध्वज “थोंग त्रिरॉंग” (अर्थ: त्रिवर्ण ध्वज) या नावाने ओळखला जातो. तो २८ सप्टेंबर १९१७ रोजी राजा राम सहावा (वजिरावुध) यांच्या कारकिर्दीत स्वीकारण्यात आला.
रचना:
ध्वज पाच आडव्या पट्ट्यांचा असतो –
🔹 लाल – राष्ट्र आणि जनता
🔹 पांढरा – धर्म (बौद्धधर्म)
🔹 निळा – राजसत्ता
मध्यभागी असलेला निळा पट्टा इतर दोन्ही रंगांपेक्षा दुप्पट रुंद आहे. या तिन्ही रंगांमुळे “राष्ट्र, धर्म आणि राजा” या थाई परंपरेतील तीन आधारस्तंभांचे प्रतीक ध्वजात दिसते.
🇹🇭 थाई राष्ट्रगीत:
नाव: Phleng Chat Thai (เพลงชาติไทย)
अर्थ: “थाई राष्ट्रगीत” म्हणजेच देशभक्तीचे गीत.
संगीत: Phra Chenduriyang (फ्रा चेंदुरीयांग) यांनी 1932 मध्ये संगीतबद्ध केले. ते जर्मन वंशाचे संगीतकार होते, परंतु थाई संस्कृतीत दीर्घकाळ काम केले.
गीत: 1939 मध्ये Luang Saranupraphan यांनी याचे शब्द लिहिले.
इतिहास:
1932 च्या क्रांतीनंतर थायलंडमध्ये राजेशाहीतून घटनात्मक लोकशाहीकडे संक्रमण झाले.
त्या वेळी नवीन राष्ट्रभावनेचे प्रतीक म्हणून हे गीत स्वीकारले गेले.
राष्ट्रगीताचा सध्याचा शब्दप्रयोग 1939 मध्ये निश्चित करण्यात आला (जेव्हा देशाचे नाव सियाम वरून थायलंड ठेवण्यात आले).
अर्थ:
या गीतात थायलंडची स्वातंत्र्य, धर्मनिष्ठा, शौर्य आणि जनतेचा अभिमान व्यक्त केला आहे.
“थायलंड हे स्वतंत्रांचे राष्ट्र आहे, ज्याला कोणीही गुलाम बनवू शकत नाही” — हे त्याचे मध्यवर्ती तत्त्व आहे.
प्रसंग:
हे गीत दररोज सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता रेडिओ, दूरदर्शन, व सार्वजनिक ठिकाणी वाजवले जाते.
त्या वेळी सर्वजण उभे राहून राष्ट्रगीताला आदर दर्शवतात.
कालावधी: सुमारे १ मिनिट १५ सेकंद.
⚜️ रोचक बाब
राष्ट्रगीताशिवाय राजगीत (Royal Anthem) सुद्धा आहे — “Sansoen Phra Barami”, जे केवळ राजघराण्याच्या सन्मानार्थ वाजवले जाते.
🇹🇭 थाई राष्ट्रगीत — मराठी भावार्थरूप अनुवाद
हे थायलंडचे राष्ट्र स्वतंत्रतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
थाई भूमी ही जनतेच्या धैर्याने व निष्ठेने टिकून आहे.
ज्यांनी तिचे रक्षण केले, त्यांच्या रक्ताने तिची माती पवित्र झाली आहे.
थायलंडचे नागरिक हे एकजुटीचे, निडर आणि देशासाठी बलिदानास तत्पर आहेत.
शत्रू जेव्हा सीमा ओलांडेल, तेव्हा प्रत्येक नागरिक रणांगणात उभा राहील.
आपला ध्वज, जो राष्ट्राचे आणि जनतेचे प्रतीक आहे,
तो सदैव फडफडत राहो —
आम्ही सर्व थाई लोक, राष्ट्राच्या गौरवासाठी
आपले जीवन अर्पण करू.
या गीतात थायलंडच्या स्वातंत्र्यप्रेम, राष्ट्रनिष्ठा, एकता आणि बलिदानभावनेचा गौरव आहे.
ते ऐकताना थाई नागरिक अत्यंत आदराने उभे राहतात —
हे केवळ औपचारिक राष्ट्रगीत नसून, “राष्ट्राचा आत्मसन्मान” म्हणून अनुभवले जाते.
अर्थव्यवस्था :
थायलंडची अर्थव्यवस्था आग्नेय आशियातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून ती या प्रदेशातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक मानली जाते.
थायलंडला “एशियन टायगर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवउद्योगशील अर्थव्यवस्थांच्या समूहात स्थान दिले जाते.
थायलंडची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यातीवर आधारित आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के उत्पन्न निर्यातीमधून येते.
थायलंडचे आर्थिक प्रारूप (Economic Model) मुक्त व्यापार आणि परकीय गुंतवणुकीवर आधारित आहे.
थायलंडमध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
येथे उत्पादित होणाऱ्या वस्तूंमध्ये —
कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहननिर्मिती, फर्निचर, कपडे, पादत्राणे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू, जडजवाहीर, आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे यांचा समावेश होतो.
इंटिग्रेटेड सर्किट्स, मोटारगाड्या, आणि आधुनिक विजेची उपकरणे या निर्यातीनं थायलंडच्या अर्थव्यवस्थेला विशेष बळ दिले आहे.
थायलंडमध्ये मुक्त परकीय गुंतवणूक धोरण (Open Foreign Investment Policy) अवलंबिले गेले आहे.
२०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, थेट परकीय गुंतवणुकीचा देशाच्या एकूण उत्पादनातील वाटा सुमारे ३० टक्क्यांच्या आसपास आहे.
तरीसुद्धा ऊर्जा उत्पादन, दूरसंचार आणि परिवहन यांसारखे काही महत्त्वाचे उद्योग सरकारी नियंत्रणाखाली आहेत.
थायलंड हा अजूनही कृषिप्रधान देश आहे.
सुमारे ४०% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे.
मुख्य पिकांमध्ये भात, ऊस, रबर, मका, कसावा (टॅपिओका) आणि फळांची निर्यात यांचा समावेश होतो.
थायलंड जगातील भात निर्यातीमध्ये अग्रगण्य देशांपैकी एक आहे.
थायलंडच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्तंभ —
१. औद्योगिक उत्पादन
२. पर्यटन उद्योग (Tourism)
३. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग
४. परकीय गुंतवणूक आणि निर्यात क्षेत्र
थायलंडचे चलन (Currency of Thailand):
थायलंडचे चलन बाथ (Baht – THB) असे आहे. एक बाथ = १०० सतांग (Satang).
💵 नोटा (Banknotes):
थायलंडमध्ये सध्या पुढील मूल्यांच्या नोटा प्रचलित आहेत –
२०, ५०, १००, ५०० आणि १००० बाथ.
सर्व नोटांवर थायलंडचे सध्याचे राजे महामहाज चक्रि वंशाचे राजा महामहाज वजिरालोंगकोर्न (King Maha Vajiralongkorn – Rama X) यांचे चित्र असते.
जुन्या नोटांवर राजा भूमिबल अदुल्यादेज (King Bhumibol Adulyadej – Rama IX) यांचे चित्र आढळते, त्या अजूनही वैध आहेत.
नोटा आकार आणि रंगानुसार सहज ओळखता येतात.
🪙 नाणी (Coins):
प्रचलित नाणी अशी आहेत –
२५ सतांग, ५० सतांग, १, २, ५ आणि १० बाथ.
सर्व नाण्यांवरही राजांचे चित्र असते.
१०-बाथचे नाणे द्विवर्णीय (बाहेरून चांदीसारखे, आतून सोनसळी) असल्याने सहज लक्षात राहते.
रत्ने आणि जवाहिरांचा व्यवसाय :
थायलंडची आणखी एक विशेष प्रसिद्धी म्हणजे तेथील रत्ने आणि जवाहिरांचा व्यवसाय. थायलंडमध्ये विशेषतः माणिक (Ruby) आणि इंद्रनील (Sapphire) यांच्या खाणी आहेत.
थायलंडने कुशल कारागीर, स्वस्त पण प्रशिक्षित मनुष्यबळ, आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून या उद्योगाला जागतिक पातळीवर नेले आहे.
आजच्या घडीला थायलंड हा आशियातील रत्ने व जवाहिरांच्या घडाईचा आणि व्यापाराचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे.
चांताबुरी (Chanthaburi) आणि बँकॉक ही दोन प्रमुख केंद्रे रत्नशुद्धीकरण, कटिंग आणि घडाईसाठी प्रसिद्ध आहेत.
थायलंडमध्ये केवळ स्थानिक रत्नांची प्रक्रिया होत नाही, तर आफ्रिका, श्रीलंका आणि म्यानमारमधूनही मोठ्या प्रमाणावर रत्ने आयात करून ती येथे घडवली जातात.
थायलंडच्या एकूण निर्यातीत या उद्योगाचा वाटा सतत पहिल्या दहा उद्योगांमध्ये राहिला आहे.
२०२४ मधील आकडेवारीनुसार, रत्ने व जवाहिरांच्या निर्यातीचे मूल्य सुमारे १२ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या आसपास होते.
या क्षेत्रामध्ये रत्नांची घडाई, सोने-चांदीची दागदागिने निर्मिती, आणि मौल्यवान धातूंचा व्यापार हे सर्व समाविष्ट आहे.
रत्ने व जवाहिरे उद्योग हा थायलंडच्या परकीय चलन उत्पन्नाचा आणि रोजगार निर्मितीचा एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो.
हा उद्योग केवळ आर्थिक दृष्ट्या नव्हे तर थायलंडच्या पारंपरिक कलाकौशल्याचा आणि जागतिक व्यापारातील प्रतिष्ठेचा द्योतक आहे.
लोकजीवन, संस्कृती आणि शिष्टाचार
थायलंडला “हसरा देश (Land of Smiles)” असे म्हणतात. थाई लोक आपुलकी, आदर आणि संयम यांना फार मोठे स्थान देतात. त्यांची संस्कृती बौद्ध धर्मावर आधारित असल्याने शांतता, संयम आणि नम्रता हे त्यांच्या जीवनाचे प्रमुख आधार आहेत.
थाई किक बॉक्सिंग (मुआय थाय):
थायलंडचा राष्ट्रीय खेळ मानला जाणारा मुआय थाय (Muay Thai) हा फक्त एक क्रीडा प्रकार नसून थाई संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याला “आठ अवयवांची कला (Art of Eight Limbs)” असे म्हणतात, कारण या लढाऊ कलेत हात, कोपर, गुडघे आणि पाय — या आठ अवयवांचा उपयोग केला जातो.
मुआय थायचा उगम प्राचीन सियाम साम्राज्यात झाला. त्या काळात हा सैनिकांना आत्मसंरक्षणासाठी शिकवला जाणारा युद्धकला प्रकार होता. पुढे हळूहळू तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला आणि आजच्या आधुनिक बॉक्सिंगच्या स्वरूपात विकसित झाला.
मुआय थायच्या प्रत्येक सामन्यापूर्वी खेळाडू “वाय ख्रू राम मुआय” (Wai Khru Ram Muay) नावाची पारंपरिक नृत्यसदृश विधी करतात. यात ते आपल्या गुरु, कुटुंब आणि राष्ट्राला वंदन करतात. सामन्याच्या वेळी थाई वाद्यांचे पारंपरिक संगीत सतत वाजत असते, ज्यामुळे खेळ अधिक उत्साही वातावरणात रंगतो.
आज मुआय थाय फक्त थायलंडमध्येच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. अनेक देशांत या कलेचे प्रशिक्षण दिले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. तरीसुद्धा थायलंडमध्ये तो केवळ क्रीडा नाही तर थाई आत्म्याचे प्रतीक मानला जातो.
(थाई किक बॉक्सिंग कसे असते हे समजून घ्यायचे असेल तर लाहोर हा २०१० मध्ये येऊन गेलेला हिंदी चित्रपट पहावा.)
कॅबरे शो:
थायलंडमधील “कॅबरे शो” ही देशाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे. अशा शोमध्ये “लेडी बॉइज” म्हणून ओळखले जाणारे कलाकार थाई संगीत, नृत्य, वेशभूषा आणि रंगसंगती यांचा अप्रतिम मेळ सादर करतात. हे शो अत्याधुनिक प्रकाशयोजना, ध्वनीप्रणाली आणि भव्य मंचसज्जेसह सादर केले जातात.
त्यांपैकी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत पटायातील Alcazar Cabaret, Tiffany’s Show, आणि फुकेटमधील Simon Cabaret. या कार्यक्रमांनी थायलंडला जागतिक पर्यटन नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे.
सोंक्रान उत्सव (Songkran Festival):
थायलंडमधील हा सर्वात प्रसिद्ध आणि आनंदमय सण आहे. तो थाई नववर्ष म्हणून साजरा केला जातो आणि दरवर्षी १३ ते १५ एप्रिल या काळात साजरा होतो.
“सोंक्रान” हा शब्द संस्कृतमधील “संक्रमण” या शब्दावरून आला आहे, म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो — विशेषतः मेष संक्रांती.
या काळात लोक एकमेकांवर पाणी उडवतात — हा शुद्धीकरण आणि नवसुरुवातीचा प्रतीकात्मक भाग आहे. सुरुवातीला पाणी शिंपडणे हे केवळ शुभेच्छा देण्याचे धार्मिक कर्म होते; आता ते मोठ्या जलयुद्धासारख्या खेळात रूपांतरित झाले आहे.
लोक वाट (बुद्धमंदिर) मध्ये जाऊन बुद्धमूर्तींवर सुगंधी पाणी अर्पण करतात, भिक्खूंना दान देतात आणि पालक-वरिष्ठांच्या हातांवर पाणी ओतून आशीर्वाद घेतात.
बँकॉकमधील खाओ सान रोड आणि सिलॉम रोड, तसेच चिअंग माई शहरात सोंक्रान अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो.
हा सण म्हणजे आनंद, मैत्री आणि नवीन सुरुवातीचा उत्सव — *“थाई स्माईल्स”*चा सर्वात सुंदर अविष्कार! 😄
लोई क्राथॉन्ग उत्सव:
थायलंडमध्ये दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला (नोव्हेंबर महिन्यात) साजरा होणारा लोई क्राथॉन्ग हा देशातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय उत्सव आहे. “लोई” म्हणजे तरंगविणे आणि “क्राथॉन्ग” म्हणजे केळीच्या पानांपासून बनवलेली छोटी नौका. या नौकेत फुले, अगरबत्त्या, मेणबत्ती आणि नाणे ठेवून ती पाण्यावर तरंगवली जाते. हे कृत्य म्हणजे पाण्याच्या देवीप्रती (फ्रा मे खोंखा) कृतज्ञता व्यक्त करणे* आणि गतकर्मांचे शुद्धीकरण* असे मानले जाते.
या दिवशी नद्यां, तलावां व कालव्यांवर दिव्यांची उजळण होते. रात्रीचे नजारे अप्रतिम दिसतात आणि वातावरण भक्तिभाव, आनंद व सौंदर्याने भारून जाते. लोई क्राथॉन्गला थायलंडमध्ये प्रेम आणि कृतज्ञतेचा उत्सव असेही म्हटले जाते.
थाई नृत्यकला:
थाई नृत्य (Thai Dance) हे थायलंडच्या संस्कृतीचे अत्यंत सुंदर आणि अभिव्यक्तीपूर्ण रूप आहे. त्यात कला, धर्म, संगीत आणि साहित्य यांचा अप्रतिम संगम दिसतो. थाई नृत्य मुख्यतः दोन प्रकारचे मानले जाते — शास्त्रीय (Classical) आणि लोकनृत्य (Folk Dance).
🎭 १. शास्त्रीय थाई नृत्य (Classical Thai Dance)
हे नृत्य थायलंडच्या राजदरबारात विकसित झाले. यात अंगविक्षेप, हातांची हालचाल, डोळ्यांची अभिव्यक्ती आणि संगीत यांचे अप्रतिम संयोजन दिसते. प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे —
(ก) खोन (Khon) —
मुखवटे घालून केले जाणारे नाट्यनृत्य. यातील कथा रामायणवर (थायलंडमध्ये “रामाकियन”) आधारित असतात. कलाकार बोलत नाहीत; संवाद वाचन बाहेरून केले जाते.
(ख) लाखॉन (Lakhon) —
स्त्रियांनी सादर केलेले नृत्यनाटक. यातील कथा जाटक, लोककथा किंवा प्राचीन प्रेमकथांवर आधारित असतात.
(ग) फॉन थाई (Fon Thai) —
हे मंद, नाजूक आणि भावपूर्ण नृत्य आहे. हातांच्या नाजूक हालचाली आणि लयबद्ध पावले यामुळे त्याला नजाकतीची छटा मिळते.
🌾 २. लोकनृत्य (Folk Dance)
थायलंडच्या विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळी लोकनृत्ये आढळतात.
फॉन लेब (Fon Leb) — लांब नखांची सजावट करून स्त्रिया करत असलेले पारंपरिक नृत्य.
रॅम वोंग (Ram Wong) — पुरुष आणि स्त्रिया मिळून सादर करतात; सण-उत्सवात लोकप्रिय.
फॉन थियान (Fon Thian) — हातात मेणबत्त्या घेऊन केले जाणारे आकर्षक नृत्य.
💠 वैशिष्ट्ये
प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण असते; हातांच्या मुद्रा आणि शरीरभाषेतून कथा सांगितली जाते.
पोशाख रंगीत, सोन्याच्या कापडांनी सजवलेले असतात.
पार्श्वसंगीत पारंपरिक थाई वाद्यांवर (जसे रनाट, खॉंग वोंग, सॉउ) दिले जाते.
थाई नृत्य हे केवळ मनोरंजन नसून धार्मिक श्रद्धा, इतिहास आणि थाई ओळखीचे प्रतीक आहे.
ते बघताना प्रेक्षकाला जणू थायलंडच्या प्राचीन मंदिरांचा आणि राजदरबाराचा सुवर्णकाळ अनुभवास येतो.
-----------------------------------------------------------
👑 थाई मुकुटांचा विशेष आकार — कारणे आणि अर्थ
१. 🕉️ मेरू पर्वताचे प्रतीक
थाई राजमुकुट (ज्याला Phra Maha Phichai Mongkut พระมหาพิชัยมงกุฎ म्हणतात) चा वरचा सुळक्यासारखा भाग म्हणजे माउंट मेरूचे प्रतीक आहे.
हिंदू-बौद्ध ब्रह्मांडरचनेनुसार मेरू पर्वत हा विश्वाचा मध्यस्तंभ (axis mundi) मानला जातो — देव, मानव आणि ब्रह्मांड यांना जोडणारा केंद्रबिंदू.
म्हणून मुकुटाचे टोक वरच्या दिशेने जात असते, म्हणजे राजा हा देवत्वाशी जोडलेला आहे, हे दर्शवते.
२. ☀️ दैवी तेज आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक
थाई सम्राटाला देवराजा (देव-राजा) मानले जाते — ही संकल्पना भारतातील देवराज परंपरेतूनच आली आहे.
मुकुटाचे सुळक्यासारखे टोक सूर्यकिरण, प्रकाश किंवा तेज (Aura) सूचित करते.
त्यामुळे राजाचे तेज जगभर पसरते, असा अर्थ यात आहे.
३. 🪷 थेरवाद बौद्ध प्रभाव
थायलंड बौद्ध राष्ट्र असल्यामुळे, मुकुटाचा आकार बोधिवृक्षाखालील शिखर किंवा स्तूपाच्या टोकासारखा बनविला जातो.
याने राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे ऐक्य दर्शवले जाते.
४. ⚜️ शैली आणि पारंपरिक कारागिरी
थाई मुकुटांचा आकार ख्मेर आणि अयुथया काळातील (१४व्या–१८व्या शतकातील) शिल्पकलेतून विकसित झाला.
हा टोकदार भाग प्रांग (Prang) — म्हणजे थाई मंदिरांच्या शिखरासारखा — बनविला जातो.
त्यामुळे मुकुट हा फक्त राजचिन्ह नसून मंदिरशिखरासारखा पवित्र रूपक आहे.
५. 🪶 भौतिक कारण — संतुलन आणि रचना
मुकुटाच्या आत धातूची चौकट असते आणि सुळका हा केवळ सजावट नसून संपूर्ण रचनेचे वजन संतुलित ठेवतो.
म्हणून तो कारागिरीच्या दृष्टीनेही आवश्यक घटक आहे.
✨ थोडक्यात
थाई मुकुटाचे टोक हे मेरू पर्वत, दैवी तेज आणि धर्मसत्ता यांचे प्रतीक आहे.
भारतात मुकुट गोलाकार आणि रत्नजडित असतो, तर थाई मुकुट वर निमुळता होतो — म्हणजे राजसत्ता देवत्वाशी जोडलेली असल्याचे दर्शन घडविणे, हा त्यामागचा उद्देश आहे.
-----------------------------------------------------------
थाई मसाज:
थाई मसाज (Thai Massage), ज्याला "नुआद बो-रान" (Nuad Bo-Rarn) असेही म्हणतात, हा थायलंडचा एक पारंपरिक उपचारपद्धतीचा भाग आहे. तो केवळ आराम देणारा मसाज नसून एक प्राचीन वैद्यकीय प्रणाली आहे जी शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलनावर आधारित आहे.
उत्पत्ती:
थाई मसाजचा उगम सुमारे २,५०० वर्षांपूर्वी बुद्धाच्या काळात झाला मानला जातो. त्याचे मूळ भारतातील आयुर्वेद आणि योग प्रणालींमध्ये आहे. बुद्धाचे वैद्य जीवक कुमार भच्छ हे या पद्धतीचे प्रवर्तक मानले जातात.
पद्धत:
थाई मसाजमध्ये तेलाचा वापर केला जात नाही. मसाज घेताना व्यक्तीला पातळ सैल कपडे (loose clothes) घालावे लागतात.
हा मसाज शरीराच्या उर्जारेषांवर (Sen lines) दाब देऊन, वळणे, ताण, आणि योगासारख्या आसनांद्वारे केला जातो.
उद्दिष्ट:
शरीरातील रक्ताभिसरण सुधारावे, स्नायूंतील ताण कमी करावा, आणि मानसिक शांतता लाभावी हे या उपचाराचे प्रमुख उद्देश आहेत.
कालावधी:
पारंपरिक थाई मसाज साधारण ६० ते १२० मिनिटांचा असतो.
प्रसिद्ध केंद्रे:
बँकॉकमधील वॉट फो (Wat Pho) मंदिर हे थाई मसाज शिक्षणाचे प्राचीन केंद्र मानले जाते. येथे आजही पारंपरिक प्रशिक्षण दिले जाते.
मान्यता:
२०१९ मध्ये UNESCO ने "Traditional Thai Massage" ला मानवतेच्या Intangible Cultural Heritage म्हणून मान्यता दिली.
थाई पाकसंस्कृती आणि पाककला:
थाई पाककला (Thai Cuisine) ही थायलंडच्या समृद्ध इतिहासाची, भौगोलिक विविधतेची आणि सांस्कृतिक आदानप्रदानाची एक चविष्ट अभिव्यक्ती आहे. ती केवळ अन्नपद्धती नसून, थाई लोकांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे.
१. थाई पाककलेचा इतिहास आणि विकास
थायलंडमधील पाककला ही शतकानुशतके विकसित झालेली परंपरा आहे.
सुरुवातीला ती स्थानिक भातावर आधारित कृषिसंस्कृती होती. कालांतराने थाई साम्राज्यांच्या संपर्कात चीन, भारत, कंबोडिया, लाओस, मलेशिया यांसारख्या देशांच्या पाकपरंपरांचा प्रभाव पडला.
भारतीय प्रभाव: मसाल्यांचा वापर, नारळाचे दूध, आणि करी (Curry) या संकल्पना भारतातून गेल्या.
चिनी प्रभाव: नूडल्स, स्टर-फ्राय आणि सूप बनवण्याची पद्धत.
मलय आणि इंडोनेशियन प्रभाव: मसाल्यांची झणझणीतता आणि समुद्री खाद्याचा वापर.
पण या सर्व प्रभावांना थाई लोकांनी आपल्या चवीच्या, हवामानाच्या आणि जीवनशैलीच्या अनुषंगाने रुपांतरित करून स्वतंत्र थाई ओळख निर्माण केली.
२. थाई पाककृतींचे वैशिष्ट्य आणि जागतिक लोकप्रियता
प्रत्येक थाई डिशमध्ये हे पाचही घटक एकमेकांना पूरक ठरतात.
यामुळे ती ना फक्त स्वादिष्ट तर संतुलित आणि आरोग्यदायी ठरते.
थाई पाककलेत ताज्या भाज्या, औषधी वनस्पती, लिंबू, लेमनग्रास, गळंगळ, आणि मिरच्या यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
ही पाककला ताजेपणा आणि सुगंधावर आधारित असल्याने ती जगभर लोकप्रिय झाली.
जगातील बहुतांश चायनीज किंवा मलेशियन पदार्थ तेलकट आणि जड असतात, पण थाई पदार्थ हलके, सुगंधी आणि रंगीबेरंगी असतात — हेच त्यांचे वेगळेपण टिकवून ठेवणारे मुख्य कारण आहे.
३. बौद्ध धर्मीय समाजात मांसाहाराचे प्राबल्य
थायलंडमध्ये सुमारे ९४% लोकसंख्या बौद्ध धर्मीय असली तरी, बहुतेक थाई लोक थेरवाद बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
थेरवाद परंपरेत मांसाहारावर कठोर धार्मिक बंदी नाही. बुद्धांनी स्वतःही "जर भिक्षूने स्वतःहून प्राणी मारलेला नसल्यास किंवा त्याच्यासाठी कोणी मारले नाही, तर ते मांस निषिद्ध नाही" असे सांगितले होते.
याशिवाय —
थायलंडचे हवामान आणि भूगोल मांस, मासे, आणि समुद्री खाद्य मिळवण्यासाठी अनुकूल आहेत.
प्रथिनांचा स्रोत म्हणून पारंपरिक थाई आहारात मासे, कोळंबी, कोंबडी, आणि डुकराचे मांस यांचा वापर सर्वसाधारण आहे.
भिक्षू वगळता सर्वसामान्य थाई लोक धर्माच्या पालनापेक्षा चवी आणि पोषणावर भर देतात.
या सर्व कारणांमुळे थाई पाककृतींमध्ये मांसाहाराचे प्राबल्य दिसून येते, तरीही शाकाहारी पर्यायांचीही विपुलता आहे — विशेषतः बौद्ध उत्सवांच्या काळात.
🇹🇭 थाई पाककलेवर भारतीय, चायनीज आणि इतर प्रभाव
🍛 १. भारतीय प्रभाव
थायलंडमध्ये भारतीय व्यापारी आणि बौद्ध भिक्षू प्राचीन काळी गेले.
त्यांनी मसाले, करीची कल्पना, आणि नारळाच्या दुधात शिजवलेले पदार्थ थायलंडला परिचित केले.
“Kaeng Kari (Yellow Curry)” हा शब्दच संस्कृत ‘कऱ्ही’ किंवा ‘करी’ वरून आला आहे.
हळद, जिरे, धणे, दालचिनी यांसारखे मसाले भारतीय प्रभावाचेच उदाहरण आहेत.
🥢 २. चायनीज प्रभाव
स्टर-फ्राय तंत्र, नूडल्स, सूप, सोया सॉस, आणि टोफू — हे सर्व चीनकडून आले.
“Pad Thai” हा सर्वात प्रसिद्ध थाई पदार्थ प्रत्यक्षात चायनीज पद्धतीचा नूडल स्टर-फ्राय आहे, ज्याला थाई चव दिली गेली आहे.
🌶️ ३. मलेशियन आणि इंडोनेशियन प्रभाव
थायलंडचा दक्षिण भाग मलय द्वीपकल्पाशी जोडलेला असल्यामुळे येथे मलेशियन आणि इस्लामिक पाककलेचा प्रभाव आहे.
या भागात करीत वापरले जाणारे मसाले अधिक तिखट आणि सुगंधी असतात (उदा. मिरची, जायफळ, लवंग, दालचिनी).
🥬 ४. व्हिएतनामी आणि कंबोडियन प्रभाव
ईशान्य थायलंड (इसान) मध्ये लाओस आणि व्हिएतनामच्या सीमेजवळ असल्यामुळे येथे आंबट, आंबवलेल्या चवीचे पदार्थ आढळतात.
“Som Tum (पपई सलाड)” आणि Sticky Rice हे लाओसच्या पाककलेतून थायलंडमध्ये आले.
🌏 प्रदेशानुसार थाई पाककलेतील बदल
थायलंडचा विस्तार उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम असा मोठा असल्यामुळे हवामान, उपलब्ध अन्नपदार्थ, धार्मिक परंपरा यांमुळे पाककलेत वेगवेगळे रंग दिसतात👇
प्रदेश वैशिष्ट्य उदाहरणे
उत्तर थायलंड (Chiang Mai, Chiang Rai) हलकी, कमी तिखट करी, नारळाचे दूध कमी वापरतात. बर्मी (म्यानमार) प्रभाव. Khao Soi (नूडल करी सूप), Sai Oua (हर्ब सॉसेज)
ईशान (Isan) लाओ आणि व्हिएतनामी प्रभाव, आंबट आणि आंबवलेल्या चवी, स्टिकी राईस. Som Tum, Laab (मांस सलाड), Nam Tok
मध्य थायलंड (Bangkok) सर्व प्रदेशांचा मिलाफ, समतोल मसाले, नारळ दूध आणि साखरेचा वापर. Pad Thai, Tom Yum Goong, Green Curry
दक्षिण थायलंड मलेशियन प्रभाव, अतितिखट पदार्थ, समुद्री अन्न मुबलक, नारळ दूध जास्त वापरतात. Massaman Curry, Khao Yam, Fish Curry
-----------------------------------------------------------
🥢 थाई पीनट नूडल्स (Thai Peanut Noodles)
(एक झटपट, स्वादिष्ट आणि शाकाहारी थाई डिश)
🍜 साहित्य (२ व्यक्तींसाठी)
नूडल्स — 150 ग्रॅम (मैद्याचे किंवा राईस नूडल्स चालतील)
तेल — १ टेबलस्पून
लसूण — २ पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
गाजर — १ (लांब कापलेले)
ढोबळी मिरची — १ (चिरलेली)
कोबी / स्प्रिंग अनियन — थोडे (ऐच्छिक)
भाजलेले शेंगदाणे — २ टेबलस्पून (थोडे कुटलेले)
कोथिंबीर — थोडी (सजावटीसाठी)
🥣 सॉससाठी
शेंगदाणा कूट (Peanut butter) — २ टेबलस्पून
सोया सॉस — १ टेबलस्पून
लिंबाचा रस — १ टीस्पून
साखर किंवा मध — १ टीस्पून
थोडे पाणी — २-३ टेबलस्पून (सॉस पातळ करण्यासाठी)
लाल तिखट / चिली फ्लेक्स — चवीनुसार
👩🍳 कृती
1. नूडल्स शिजवून गाळून घ्या आणि थंड पाण्याने धुवून ठेवा.
2. एका कढईत तेल गरम करून लसूण, गाजर, ढोबळी मिरची हलकी परतून घ्या.
3. दुसऱ्या वाटीत सॉसचे सर्व घटक मिसळून एकसंध करा.
4. भाज्यांमध्ये शिजलेले नूडल्स घालून सॉस ओतावा आणि चांगले मिक्स करावे.
5. शेवटी भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
💡 गमतीशीर भाग:
थाई लोक हा पदार्थ “आरामात आणि हसत-खिदळत खातात” — म्हणून तो अनेकदा family bonding dish मानला जातो. हलका गोड, थोडा तिखट आणि नटाळ स्वाद असलेला हा पदार्थ भारतीय जिभेलाही अगदी भावतो!
-----------------------------------------------------------
🇹🇭 थायलंडमधील खाण्याचे शिष्टाचार
🍽️ १. बसण्याची आणि खाण्याची पद्धत
जेवण साधारणतः कुटुंबाने किंवा गटाने एकत्र घेतले जाते.
सर्व पदार्थ टेबलावर ठेवलेले असतात, आणि प्रत्येकजण थोडे-थोडे घेऊन खातो.
स्वतःसाठी थाळी (plate) मध्ये छोटे भाग घेणे आणि बाकीचे अन्न शेअर करणे हीच सभ्यता मानली जाते.
🥄 २. खाण्याची साधने
चमचा (spoon) — मुख्य खाण्याचे साधन.
काटा (fork) — चमच्यावर अन्न ढकलण्यासाठी वापरला जातो.
चॉप्स्टिक्स — फक्त नूडल्ससाठी.
हाताने खाणे — क्वचित, पारंपरिक पदार्थांसाठी (विशेषतः इसान भागात).
🙏 ३. सुरुवातीचा आणि शेवटचा सन्मान
जेवण सुरू करण्यापूर्वी वयाने मोठ्या व्यक्तीने खायला सुरू केल्यावरच इतरांनी खायला सुरू करावे.
जेवण संपल्यावर चमचा-काटा नीट ठेवून हलकेसे "खोब खुन" (धन्यवाद) म्हणतात.
🍛 ४. अन्न वाया घालवणे अनुचित
थाई लोकांना अन्न वाया घालवणे अशुभ आणि अनादराचे लक्षण वाटते.
थोडे घेऊन संपवणे हेच सभ्यपणाचे लक्षण.
💧 ५. पाणी व मद्यपान
पाण्याचा ग्लास नेहमी भरलेला ठेवणे आदराचे मानले जाते.
धार्मिक प्रसंगी मद्यपान टाळले जाते.
🪷 थोडक्यात सांगायचे तर
> “थाई भोजन म्हणजे फक्त अन्न नाही, तर आदर, सौजन्य आणि सामूहिक आनंद यांचा उत्सव आहे.”
थाई कालगणना परंतु चांद्र–सौर (lunisolar) पद्धतीवर आधारित आहे. म्हणजेच :
बौद्ध कालगणनेचा वर्ष क्रम (B.E.) — म्हणजे ५४३ वर्षांचा फरक ग्रेगोरियन वर्षाशी — हा सौर कालगणनेवर (solar year) आधारित आहे.
उदा. २०२५ AD = २५६८ BE.
मात्र थायलंडमधील पारंपरिक सण-उत्सव, जसे सोंक्रान (थाई नववर्ष), लोई क्रेथॉंग, माखा बुचा, विसाखा बुचा इत्यादी — हे चांद्र मासानुसार ठरतात.
म्हणून सणांचे दिनांक दरवर्षी थोडेफार बदलतात.
थायलंडमधील सार्वजनिक सुट्टीचे दिवस:
१ जानेवारी- नवीन वर्ष दिवस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी.
३ मार्च- माखा बुचा (Makha Bucha) बौद्ध धर्मातील महत्त्वाचा दिवस — बुद्धांचे उपदेश स्मरण.
६ एप्रिल- चक्री मेमोरियल डे (Chakri Day) Chakri dynasty च्या स्थापनेचा स्मरणदिन.
१३–१५ एप्रिल- सांग्क्रान महोत्सव (Songkran) थाई नववर्षसमारंभ — पाण्याचा उत्सव, घर परती जाण्याची वेळ.
१ मे- मजूर दिन (Labour Day) आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन आणि सार्वजनिक सुट्टी.
४ मे- राज्याभिषेक दिवस (Coronation Day) सध्याच्या राजाचं राज्याभिषेक आठवण.
३ जून- राणी सुतिदा यांचा वाढदिवस राणी सुतिदा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सक्रिय सुट्टी.
२८ जुलै- राजा महा वजिरालोंगकोर्न यांचा वाढदिवस थायलंडच्या वर्तमान राजाचा वाढदिवस.
१२ ऑगस्ट- राणी मातेचा वाढदिवस / मातृदिन थाई मध्ये मातृदिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस.
१३ ऑक्टोबर- राजा भुमिबोल यांचे स्मरणदिन पूर्व राजाची आठवण ठेवण्याचा दिवस.
२३ ऑक्टोबर- राजा चुलालोंगकोर्न स्मरणदिन थायलंडच्या राजघराण्याला समर्पित स्मरणदिन.
५ डिसेंबर- राजा भुमिबोल यांचा जन्मदिवस / पितृदिन राष्ट्रीय दिवस, पितृदिन म्हणूनही मानला जातो.
१० डिसेंबर- संविधान दिवस (Constitution Day) थायलंडचे वर्तमान संविधान स्वीकारलेले दिवस.
🗣️ थाई भाषा आणि लिपी (Thai Language and Script – ภาษาไทย)
थाई ही थायलंडची अधिकृत भाषा असून ती ताई-कदाई (Tai–Kadai) भाषाकुलात येते.
ती सुमारे ७० दशलक्ष लोकांची मातृभाषा आहे आणि संपूर्ण देशात प्रशासन, शिक्षण, माध्यमे आणि दैनंदिन संभाषण यांत वापरली जाते.
🔤 लिपी
थाई लिपी ही अबुगिडा (Abugida) प्रकारातील लिपी आहे, म्हणजे प्रत्येक व्यंजनासोबत एक अंतर्निहित स्वर असतो.
ती ख्मेर (कंबोडियन) लिपीवरून विकसित झाली असून, तिचा उगम प्राचीन ब्राह्मी लिपीत आहे.
अक्षरसंख्या:
44 व्यंजने (Consonants)
32 स्वर चिन्हे (Vowel signs)
4 स्वर-चढउतार (Tone marks)
विरामचिन्हांचा फारसा वापर होत नाही.
🗣️ स्वर आणि टोन प्रणाली
थाई ही स्वरत्मक भाषा (Tonal language) आहे — म्हणजेच शब्दाचा अर्थ उच्चारातील स्वरावर (टोनवर) अवलंबून बदलतो.
थाई भाषेत ५ टोन आहेत:
1. मध्यम (mid)
2. नीच (low)
3. उच्च (high)
4. उतरता (falling)
5. चढता (rising)
उदा.:
maa (มา) = येणे
màa (หมา) = कुत्रा
हे दोन्ही शब्द उच्चारानुसार भिन्न अर्थ देतात.
📚 लिपीची वैशिष्ट्ये
थाई भाषेत अक्षरांदरम्यान जागा (space) साधारणपणे वापरली जात नाही.
जागा केवळ वाक्य किंवा वाक्प्रचार संपल्यावर वापरतात.
अंकांसाठी स्वतःचे थाई अंक आहेत, पण आधुनिक व्यवहारात अरबी अंकच प्रचलित आहेत (0–9).
🌏 इतर तथ्ये
थाई भाषेच्या अनेक प्रादेशिक बोली आहेत — त्यांत सेंट्रल थाई (बॅंकॉक क्षेत्रातील बोली) ही राजभाषा मानली जाते.
थायलंडमधील काही भागांत लान्ना (उत्तर थाई), ईसान (ईशान्य बोली) अशा स्थानिक रूपांतील भाषाही बोलल्या जातात.
थाई रामायण – रामाकिन (Ramakien):
रामायणाची कथा भारतातून थायलंडमध्ये पोहोचली आणि तेथील स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाली. थायलंडमध्ये या महाकाव्याला ‘रामाकिन’ (Ramakien) असे म्हटले जाते.
रामाकिनची कथा भारतीय रामायणाशी साधारणत: समान आहे, परंतु काही ठिकाणी तिच्यात स्थानिक थाई सांस्कृतिक घटकांचे मिश्रण आढळते.
भारतीय रामायणात राम हा श्रीविष्णूंचा अवतार मानला जातो, तर रामाकिनमध्ये रामाला भगवान बुद्धांचा अवतार मानले जाते — हे दोन्ही देशांतील धार्मिक पार्श्वभूमीचे प्रतीक आहे.
रामायणातील सीता येथे ‘सिदा’, आणि रावण ‘तोसाकन’ (Totsakan) म्हणून ओळखला जातो. लंका ‘लोंग्का’, सुग्रीव ‘सुक्रीप’, आणि लक्ष्मण ‘लक’ या नावांनी येतात.
हनुमान रामाकिनमध्येही पराक्रमी आणि बुद्धिमान आहे, परंतु तो भारतीय परंपरेप्रमाणे ब्रह्मचारी नसून प्रणयरसात रमणारा योद्धा म्हणून चित्रित केला आहे.
कथानकात रामाचा वनवास, तोसाकनने सिदेचे अपहरण, आणि रामाने वानरसेनेच्या सहाय्याने तोसाकनचा पराभव करून सिदेला परत आणणे — हे प्रसंग रामायणासारखेच आहेत.
मात्र काही घटनांचा शेवट थोडा वेगळा आहे —
वनवासानंतर रामाला सिदेच्या पवित्र्याबद्दल शंका येते. तो आपल्या भावाला लकला गर्भवती सिदेचा वध करण्यास सांगतो.
परंतु जेव्हा लक तलवार उगारतो, तेव्हा ती फुलांच्या माळेत रूपांतरित होऊन सिदेच्या गळ्यात पडते, आणि तिचा प्राण वाचतो. सिदा मग वनात निघून जाते आणि नंतर तिला पुत्र होतो.
काही वर्षांनी देवांना संपूर्ण सत्य समजते. ते राम आणि सिदेला पुन्हा एकत्र आणतात आणि त्यांच्या गैरसमजांवर टीका करतात — रामाला अविश्वासासाठी आणि सिदेला हट्टीपणासाठी दोष देतात.
अखेरीस दोघे एकत्र येतात आणि रामाकिनचा शेवट सुखांत (happy ending) होतो. त्यामुळे भारतीय रामायणाप्रमाणे शोकांत न होता थाई कथा आनंदी शेवटाकडे झुकते.
धर्म:
थायलंडमध्ये सुमारे ९४% लोकसंख्या बौद्धधर्मीय असून बौद्ध धर्म हा थायलंडचा अधिकृत धर्म आहे. थायलंडमधील बौद्ध धर्म हा थेरवाद पंथाचा आहे.
थायलंडमधील बौद्ध धर्माचा प्रसार:
थायलंडमध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रभाव फार प्राचीन काळापासून आढळतो. येथे सापडलेल्या विष्णू, शिव आणि बुद्ध यांच्या प्राचीन मूर्तींवरून हे स्पष्ट होते.
अनेक थाई लोकांचा विश्वास आहे की इ. स. पू. तिसऱ्या शतकात भारताचा सम्राट अशोक याने आपल्या धर्मदूतांना थायलंडमध्ये पाठवून बौद्ध धर्माचा प्रसार घडवून आणला. हे शक्य असले तरी याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत.
त्याऐवजी भारतातून सातशे वर्षांपर्यंत सुरू असलेल्या व्यापारी व स्थलांतरितांच्या संपर्कामुळे म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड आणि कंबोडिया या प्रदेशांमध्ये बौद्ध धर्म हळूहळू रुजला असावा ही अधिक शक्यता मान्य केली जाते.
इ. स. सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म थायलंडमध्ये स्थिरावला होता. त्या काळात महायान पंथ, तांत्रिक बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे प्रमुख धार्मिक प्रवाह होते.
परंतु तेराव्या-चौदाव्या शतकांदरम्यान श्रीलंकेतून आलेल्या भिक्खूंनी थेरवाद पंथाचा प्रसार केला, आणि आजपर्यंत थेरवाद बौद्ध धर्मच थायलंडचा प्रमुख धर्म आहे.
थायलंडच्या सुदैवाने या देशावर कधीही युरोपीय वसाहतवादी सत्ता आली नाही. त्यामुळे ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या धार्मिक आक्रमणांपासून थायलंड वाचला, आणि म्हणूनच आज येथील सुमारे ९४% लोकसंख्या अभिमानाने स्वतःला बौद्ध म्हणवते.
पर्यटन
थायलंडमधील बुद्धमंदिरे
ग्रामीण भागात गेल्यावर गवताने शाकारलेल्या घरात राहून पाहा.
रसनातृप्ती:
थाई आचारी असे म्हणतात 'मसाल्याचा घमघमाट येईपर्यंत शिजवत राहा.'
३. परिशिष्टे
थाई भाषा
थाई वर्णमाला सुमारे सातशे वर्षांपूर्वी मोन आणि ख्मेर लिपीतून तयार झाली. मोन आणि ख्मेर लिपीचे मूळ संस्कृत आहे.थाई भाषेमध्ये शब्दवेधीशब्दावर निरनिराळ्या पद्धतीने जोर देऊन शब्दाचे अर्थ बदलतात. नीच, मध्यम , उच्च, पड़ता आणि चढ़ता असे पाच प्रकारचे ज़ोर थाई भाषेमध्ये आहेत.
|
क्र. |
शब्द |
उच्चार |
अर्थ |
|
|
Chiang |
चिअंग |
शहर |
|
|
Doi |
दोई |
पर्वतशिखर |
|
|
Khao |
खाव |
पर्वत |
|
|
Koh |
को |
बेट |
|
|
Mae |
मै |
आई |
|
|
Mai |
माय |
नवीन |
|
|
Seua |
सिया |
वाघ |
|
|
Soi |
सोई |
मुख्य रस्त्याला काटकोनामध्ये मिळणारा गल्लीवजा छोटा रस्ता |
|
|
Tham |
थम |
गुहा |
थायलंडविषयी उपयुक्त संकेतस्थळे
www.thailandhighlight.com
गौतम बुद्धांचा जीवनकाळ साधारणत: इ. स पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ हा मानला जातो. त्यांचे लहानपणचे नाव सिद्धार्थ असे होते. सिद्धार्थच्या वडिलांचे नाव शुद्धोदन असून ते नेपाळमधील कोशल प्रांतावर राज्य करीत होते. सिद्धार्थची आई महामाया प्रसूतीसाठी माहेरी जाताना वाटेत लुंबिनी येथे शालवृक्षाखाली प्रसूत झाली आणि तिने सिद्धार्थला जन्म दिला. सिद्धार्थच्या लहानपणीच त्याच्या आईचा मृत्यू झाला आणि सिद्धार्थचा सांभाळ त्याच्या मावशीने गौतमीने केला. शुद्धोदन राजाने सिद्धार्थला अतिशय सुखात ठेवले आणि त्याला कुठल्या प्रकारची उणीव भासू दिली नाही. सिद्धार्थ सोळा वर्षांचा झाल्यावर शुद्धोदन राजाने सिद्धार्थचे लग्न यशोधरा नावाच्या सुस्वरूप राजकन्येशी लावून दिले. सिद्धार्थास एक मुलगाही झाला. त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले.
एकदा आपला सारथी आणि मित्र चन्न याच्याबरोबर नगरात फिरत असताना सिद्धार्थला एक आजारी मनुष्य, एक वृद्ध मनुष्य आणि एक प्रेतयात्रा यांचे दर्शन झाले. प्रत्येक माणसाची हीच अवस्था होते असे चन्नने सांगितल्यावर सिद्धार्थ अस्वस्थ झाला. मनुष्याच्या दु:खावर विजय मिळविण्याचा मार्ग शोधण्याचा तो सतत विचार करू लागला. अखेर वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी सिद्धार्थने सर्वसंगपरित्याग करावयाचे ठरविले. एक दिवशी रात्री यशोधरा आणि राहुल झोपले असताना सिद्धार्थ चन्नला बरोबर घेऊन निघाला. आपली राजवस्त्रे चन्नकडे सुपूर्द करून सिद्धार्थ नगराबाहेर पडला. मगधराज्याच्या सैनिकांनी सिद्धार्थास ओळखले आणि त्यास मगधनरेश बिंबिसार याच्याकडे नेले. बिंबिसार राजाने सिद्धार्थचा सत्कार करून आपले राज्य त्यास अर्पण केले. परंतु सिद्धार्थने त्यास नकार देऊन ज्ञानप्राप्ती झाल्यावर प्रथम बिंबिसारची भेट घेण्याचे वचन दिले.
ज्ञानप्राप्तीच्या शोधात फिरत असताना त्याने एकापाठोपाठ एक दोन गुरुंचे शिष्यत्व पत्करले. सिद्धार्थची योग्यता पाहून दोघांनी आपला वारसा पुढे चालविण्यासाठी त्याची निवड केली. परंतु सिद्धार्थास आत्मोन्नातीपेक्षा सर्व जनांच्या मुक्तीचा मार्ग हवा होता. त्यामुळे या गुरूंना नकार देऊन सिद्धार्थ आपल्या मार्गाने निघाला. पुढे त्यास पाच संन्यासी भेटले. या सर्वांनी आत्मक्लेशाचा मार्ग निवडला होता आणि ते अन्नग्रहण करीत नव्हते. सिद्धार्थने त्यांच्याबरोबर साधना सुरू केली. परंतु अन्नग्रहण न केल्यामुळे सिद्धार्थास अतिशय अशक्तपणा आला. सुजाता नावाची स्त्री वनामध्ये आपला नवस फेडण्यास खीर घेऊन आली होती. ही खीर तिने सिद्धार्थाच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्यास अर्पण केली. ही खीर सिद्धार्थने ग्रहण करताच हे त्याचे अध:पतन आहे असे मानून त्याचे सहसंन्यासी त्यास सोडून निघून गेले. सिद्धार्थने एका पिंपळाच्या झाडाखाली बसून आपली साधना पुढे चालूच ठेवली. एकूणपन्नास दिवसांच्या अखंड साधनेनंतर त्याला ज्ञानप्राप्ती झाली. सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले. यावेळी त्यांचे वय पस्तीस वर्षे होते. यापुढील काळामध्ये बुद्धांनी भारतभर भ्रमण करून आपल्या शिकवणीचा प्रसार केला.
बौद्ध तत्त्वज्ञान
बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांचा उपदेश त्रिपिटक (तिपिटक) या ग्रंथामध्ये सूत्रबद्ध केला गेला. हा ग्रंथ पाली भाषेमध्ये लिहिला आहे. पिटकचा अर्थ पेटी. बुद्धांचा उपदेश तीन विभागांमध्ये ग्रथित केला आहे. म्हणून यास त्रिपिटक असे नाव दिले आहे.
प्रतीत्यसमुत्पाद:-बौद्ध धर्मामध्य अनेक सिद्धांत असून त्यांमध्ये ‘प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धांत आहे. या सिद्धांताप्रमाणे या विश्वातील कुठलीही घटना स्वतंत्र नसून अनेक घटनांचा भाग आहे. या घटनांचा एकमेकांशी कार्य-कारण संबंध आहे. विश्वाचे चक्र हे कर्म आणि कर्मविपाक, म्हणजे कर्माचा परिणाम, यांवर चालू आहे. विश्वातील सर्व गोष्टी अशाश्वत आहेत. मनुष्य त्याची शक्ती निरनिराळ्या कामनापूर्तीमध्ये व्यर्थ दवडीत असतो. हीच शक्ती ध्यानासाठी वापरून, ज्ञान प्राप्त करून मनुष्य निर्वाणस्थिती प्राप्त करू शकतो.
बौद्ध धर्मामध्ये चार आर्य सत्ये सांगितली आहेत, ती खालीलप्रमाणे आहेत.
१.दु:ख:-या जगामध्ये दु:ख आहे. जन्म, वार्धक्य, आजारपण, मृत्यू, प्रिय जनांचा वियोग, आपल्याला नकोशा गोष्टी घडणे, आपल्याला हवी ती गोष्ट न घडणे अशा सर्व गोष्टींमध्ये दु:ख आहे.
२. दु:ख कारण:- माणसाचा लोभ किंवा कामना दु:खाचे कारण असून हा लोभ किंवा ही कामना मनुष्यास पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतात.
३.दु:ख निवारण:-मनुष्य लोभापासून मुक्त होऊ शकतो.
४.दु:खनिरोधाचा मार्ग:- आर्य अष्टांग मार्गाचा अवलंब हा दु:खनिरोधाचा मार्ग आहे.
दु:खनिरोधाचा आर्य अष्टांग मार्ग खालीलप्रमाणे आहे:-
१. सम्यक दृष्टि : चार आर्य सत्यांवर विश्वास ठेवणे.
२. सम्यक संकल्प : मानसिक आणि नैतिक विकासाचा संकल्प करणे
३. सम्यक वाक : हानिकारक किंवा खोटे न बोलणे
४. सम्यक कर्म : हानिकारक कर्में न करणे.
५. सम्यक जीविका : उघडपणे किंवा गुप्तपणे कुठलेही हानिकारक कृत्य न करणे.
६. सम्यक प्रयास : स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करणे.
७. सम्यक स्मृति : यथार्थ ज्ञानाने कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याची मानसिक पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करणे.
८. सम्यक समाधि : निर्वाण प्राप्त करून स्वत:चा लोप करणे.
बौद्ध धर्मातील आणखी काही प्रमुख गृहीतके खालीलप्रमाणे आहेत:-
१. क्षणिकवाद:-या विश्वामधील प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर किंवा नश्वर आहे.
२. अनात्मवाद:- आत्मा नावाची कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही. लोक ज्यास आत्मा मानतात, तो केवळ चैतन्याचा अविच्छिन्न प्रवाह आहे.
३. अनीश्वरवाद:- हे विश्व प्रतीत्यसमुत्पादाच्या तत्त्वाने नियंत्रित असल्याने बुद्धांनी ईश्वराची सत्ता नाकारली आहे. परंतु बुद्धांनी सर्वोच्च सत्याचे अस्तित्व मानले आहे.
बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धर्म आणि संघ यांस त्रिरत्न म्हटले आहे.
बौद्ध धर्मातील पंथ
बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्मामध्ये निरनिराळे संप्रदाय निर्माण झाले. यांमध्ये थेरवाद आणि महायान हे दोन प्रमुख पंथ आहेत. या पंथांची खाली थोडक्यात माहिती दिली आहे.
१. थेरवाद पंथ:-थेरवाद शब्दाचा अर्थ आहे थोरांच्या आज्ञेचे पालन करणे. बौद्ध धर्माच्या या शाखेमध्ये पाली भाषेतील प्राचीन त्रिपिटक ग्रंथातील सूत्रांच्या पालनास महत्त्व दिले आहे. बौद्ध धर्माचे पालन केवळ आपण मूळ स्वरूपात करतो आहोत असे थेरवाद पंथाचे म्हणणे आहे. थेरवाद पंथ असे मानतो की बुद्ध हे एक महापुरुष आहेत, पण देव नाहीत. त्यामुळे थेरवाद पंथामध्ये बुद्धांची पूजा होत नाही. थेरवाद पंथामध्ये युवकांनी भिक्खू बनणे शभ मानले जाते. एवढेच नव्हे तर युवकांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याआधी काही काळ भिक्खू म्हणून जीवन व्यतीत करण्याची पद्धत आहे. बौद्ध धर्मातील हीनयान पंथ व थेरवाद पंथ एकाच आहेत असे पूर्वी समजत. परंतु हे दोन्ही पंथ वेगवेगळे आहेत असे विद्वानांचे मत आहे. श्रीलंका, म्यानमार , कंबोडिया , व्हिएटनाम, थायलंड आणि लाओस या देशांमधील बौद्द्ध परंपरा थेरवाद पद्धतीची आहे.
२. महायान पंथ:- महायान पंथामध्ये बोधिसत्वांची हजारो रूपे मानण्यात आली आहेत आणि त्यांचा दर्जा देवतांच्या बरोबरीचा आहे. बौद्ध धर्माची महायान परंपरा चीन, जपान, कोरिया, तैवान, तिबेट, भूतान, मंगोलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये प्रचलित आहे.
No comments:
Post a Comment