Thursday, April 2, 2026

श्रीसाईसच्चरित, अध्याय २६


 श्रीसाईसच्चरित, अध्याय २६     

अपस्मारात्महत्त्यानिवारणं तथा निजगुरूपदस्थिरीकरणं   

(ओवीसंख्या १५६)

या अध्यायात काय आहे

चिंतन

मनोमन करिता बाबांचे स्मरण अंतश्चक्षूंनी घेता बाबांचे दर्शन II

सदैव गाता  बाबांचे गुणगान   I  होईल सार्थक जन्माचे II (स्वविचार)  

 

*      अध्यायारंभ; बाबांची आंतरिक पूजा करण्याविषयी श्री दाभोळकरांचे मार्गदर्शन  (- ३७)

*      बाबांशिवाय इतर व्यक्तीस गुरू मानणारे पंत नावाचे गृहस्थ बाबांच्या भेटीस गेले असता मूर्च्छित होऊन पडतात; बाबा त्यांस आपल्या गुरुशीच एकनिष्ठ राहण्याचा संकेत देतात (३८-५६)

*      हरिश्चंद्र पितळे  यांच्या मुलाचा अपस्मार बाबा बरा करतात व त्यांस तीन रुपये देऊन आधी दिलेल्या दोन रुपयांमध्ये हे तीन रुपये ठेवून त्यांची पूजा करण्यास सांगतात (५७-११२)

*      बाबांचे एक भक्त गोपाळ नारायण आंबेडकर दारिद्र्यामुळे आत्महत्त्येस जात असता एक खानावळवाले त्यांस अक्कलकोट स्वामींची पोथी वाचण्यास देतात; या पोथीतील आत्महत्त्येच्या निष्फळतेवरील अध्याय वाचून आंबेडकर आत्महत्त्येपासून परावृत्त होतात; अध्यायाचा समारोप (११३-१५६)


 बाबा आपल्या भक्तास आत्महत्त्येपासून परावृत्त करतात

 

श्री. गोपाळ नारायण आंबेडकर हे बाबांचे भक्त होते. ते आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्रस्त झाले होते. एकदा ते शिरडीला आले असताना विहिरीत उडी मारून आत्महत्त्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

 

तेथे समोरच एक खाणावळ होती. त्या खाणावळीचा सगुण नावाचा मालक बाबांचा भक्त होता. तो आंबेडकरांजवळ येऊन त्याने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची पोथी आंबेडकरांच्या हातात देऊन विचारले,'ही पोथी तुम्ही वाचली आहे का?'

 

आंबेडकरांनी पोथी हातात घेऊन चाळली असता योगायोगाने एक अध्याय त्यांच्या वाचण्यात आला. या अध्यायातील कथा अशी होती-

 

स्वामी समर्थांचे एक भक्त असाध्य रोगाने पीडित असल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्त्येचा विचार करीत असतात. त्याच वेळी स्वामी समर्थ त्याच्या समोर प्रगट होऊन त्याला उपदेश करतात की मनुष्याला सारे भोग त्याच्या कर्मांमुळे भोगावे लागतात आणि हे भोग त्याच जन्मात भोगले नाहीत तर दुसरा जन्म घेऊन भोगावे लागतात. या भक्ताने मग आत्महत्त्येचा विचार रहित केला.

ही कथा आंबेडकरांस मार्गदर्शक वाटली आणि बाबांचे आभार मानून त्यांनी आत्महत्त्येचा विचार रहित केला. आंबेडकरांनी ज्योतिषविद्येचा अभ्यास करून या विद्येवर उपजीविका सुरू केली. बाबांच्या कृपेमुळे यथावकाश त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

 

 

श्रीसाईसच्चरित अध्याय २७

 श्रीसाईसच्चरित अध्याय २७

दीक्षानुग्रहदानं     

(ओवीसंख्या २०२)

चिंतन

बाबांनी भक्तांना निरनिराळ्या पोथ्या, ग्रंथ वगैरे  वाचण्यास प्रवृत्त केले. यांमध्ये बऱ्याचशा पोथ्या, ग्रंथ असे असत की भक्तच बाबांकडे  घेऊन येत. त्यांची अशी श्रद्धा अशी असे की बाबांनी कृपास्पर्श करून हे ग्रंथ दिले तर त्यांचे वाचन निर्विघ्नपणे होईल. हे ग्रंथ कधी बाबा भक्तांस परत न देता शामाला ठेवून घेण्यास सांगत तर कधी दक्षिणेसह भक्तांस वाचण्यास परत देत. श्री दाभोळकरांच्या मते हासुद्धा बाबांच्या भक्तांवरील दीक्षानुग्रहाचाच प्रकार होता आणि भक्तांची कुवत पाहून केलेला होता.

*      अध्यायारंभ (- ३०)

*      काका महाजनींनी आणलेला श्री भागवत ग्रंथ बाबा शामाकडे ठेवण्यास देतात. पुढे काका महाजनी दुसरा श्रीभागवत ग्रंथ घेऊन येतात तो बाबा काकांस परत देतात . बऱ्याच भक्तांनी आणलेले ग्रंथ बाबांनी भक्तांना परत न देता शामाकडे ठेवण्यास दिले (३१-६१)

*      एका रामदासी बुवाची  विष्णुसहस्रनामाची पोथी बाबा शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस देतात- विष्णुसहस्रनामाची बाबांनी सांगितलेली महती (६२ -१३० )

*      बापूसाहेब जोगांना बाबा लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्यास प्रोत्साहन देतात (१३१-१३८)

*      दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नीने आणलेला प्रसाद ग्रहण करून बाबा त्या पूर्वजन्मी एक गाय असल्याचे शामाला सांगतात (१३९-१६८)

*      अध्यायाचा समारोप (१६९-२०२)

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...