१. क्षणभर थांबा 🛑, श्वास घ्या 👃
जर आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर ध्वनी आवश्यक आहे. परंतु जगाच्या गोंगाटात, कोलाहलात, आपल्यापैकी बहुतेकांना आतून शून्यता किंवा असंतोष जाणवतो. कारण आपण आंतरिक जीवनाच्या अनुभवासाठी तहानलेले असतो. एखाद्या गोष्टीपर्यंत पोहचण्यासाठी, काहीतरी जाणून घेण्यासाठी किंवा काहीतरी बनण्यासाठी एखादे सूत्र शोधण्याची अवर्णनीय भावना असते. हे सूत्र शोधण्यासाठी, एक सोपा मार्ग आहे. एक शांत जागा शोधा, शांत बसा आणि शांतपणे श्वास घ्या. या शांत जागृत अवस्थेत स्वतःला शोधण्याचा एक वेगळा आनंद आहे.
२. मनाचे नियंत्रण तुमच्याकडे घ्या

विचार अत्यंत शक्तिशाली असतात. साधारणपणे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात दररोज छत्तीस हजार विचार येतात आणि दिवस जसजसा तणावपूर्ण जातो तसतशी ही संख्या वाढत जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवता तेव्हा तुम्ही सुंदर, शक्तिशाली आणि शुद्ध विचार निर्माण करू शकता.
आपण स्वतः आणि आपले मन यांच्यातील अंतर्गत वाद हा ब्रह्मबाबांना सतत भेडसावणारा विषय होता. त्यांचे मुख्य ध्येय म्हणजे मनाला दररोज सकाळी 🌅 आणि संध्याकाळी वीस मिनिटे शांततेने अलिप्त ठेवणे 🤐. मौनाचा सराव करून, आपण मनावर नियंत्रण मिळवू शकतो आणि त्याच्या बंडखोर विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो.
३. पहिल्या पावलाचे आव्हान स्वीकारा

जेव्हा तुम्ही शांततेचा सराव करण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुमचे मन लगेचच विचलित होईल आणि तुम्हाला सांगेल, 'ही आध्यात्मिक गोष्ट खरी नाही.'
तरीही तुम्ही पहिले पाऊल उचलले पाहिजे आणि शांततेची नवीन भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन भाषा म्हणजे भावना आणि दृष्टिकोनांची भाषा. तुमच्या मनाशी बोला, ते शांती आणि स्थिरतेकडे निर्देशित करा आणि त्याला व्यत्यय आणू देऊ नका. 'मी एक शांत आत्मा आहे' असा विचार करा.
४. शांततेचा ओनामा शिका

जेव्हा तुम्ही कोणतीही नवीन भाषा शिकता तेव्हा त्याची सुरुवात तिच्या मूलभूत गोष्टी शिकण्यापासून होते, म्हणजे भाषेचा ओनामा. शांततेच्या भाषेलाही स्वतःचा ओनामा असतो. त्याचे तीन टप्पे असतात:
४.१. आत्मपरीक्षण
आनंदपूर्ण चिंतनात स्थिरावण्यासाठी, प्रथम तुमची नैसर्गिक आंतरिक शांतता शोधा. खरे चिंतन आणि एकाग्रता जबरदस्तीने करता येत नाही; तुम्ही आतून शांत झाल्यावर ते नैसर्गिकरित्या येतात.
४.२. एकाग्रता

एकदा तुम्ही स्थिर आणि चिंतनशील झालात की, स्मृतीच्या सौम्य आणि उपचारात्मक अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कोण आहात यावर चिंतन करा आणि तुम्ही ज्या शांत आत्म्याचे अस्तित्व आहात त्याचे चिंतन करा. मग तुमच्यात एकाग्रता येईल.
४.३. अनुसंधान
मनाची एकाग्र स्थिती आध्यात्मिक अस्तित्व म्हणून स्वतःशी आणि आपल्या अस्तित्वाचा स्रोत असलेल्या ईश्वराशी एक स्वयंचलित संबंध निर्माण करते.
५. शांततेसाठी तुम्हाला हव्या असलेल्या क्षणांची निर्मिती करा
एका सेकंदासाठी शांत राहून सुरुवात करणे चांगले. एकदा तुम्हाला एका सेकंदाची शांती मिळाली की, अनुभव अखंडपणे दुसऱ्या सेकंदाकडे जातो आणि नंतर तिसऱ्या सेकंदाकडे आणि लवकरच ते सेकंद एक मिनिट किंवा अगदी एक तासात बदलतात. आपल्यापैकी प्रत्येकजण त्या शांततेच्या स्थितीत कधी आणि किती वेळ राहायचे हे निवडू शकतो.
६. ठराविक जागा निश्चित करा
जर तुम्ही तुमच्या शांततेच्या सरावासाठी एक ठराविक जागा निश्चित करू शकलात तर तुमचा सराव अधिक चांगला होत जातो असे तुम्हाला दिसून येईल. कारण जर तुम्ही दररोज एकाच ठिकाणी बसलात तर त्या ठिकाणी हळूहळू शांततेची स्पंदने निर्माण होतात. अर्थात, तुम्हाला तुमच्या सरावाद्वारे तुमच्या आत ती जागा निर्माण करावी लागेल कारण ती भौतिक जागा नेहमीच उपलब्ध नसेल. तुम्ही तुमची शांत जागा म्हणून कुठलीही जागा निवडा, घरात किंवा घराबाहेर आणि अशा जागी नियमित सराव सुरू करा.
७. दिवसातील वेळ निश्चित करा

शांततेच्या सरावासाठी दिवसातील ठराविक वेळ निश्चित केल्यास तुम्हाला शक्य तितकी शांतता अनुभवण्यास मदत होईल. दिवसाची सुरुवात आणि शेवट हे शांततेच्या सरावासाठी चांगले काळ आहेत. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी तुम्ही शांततेचा सराव करू शकता. जेव्हा तुम्ही दिवसभराचे काम उरकून घरी परतता तेव्हासुद्धा स्वतःला रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला शांततेचा एक छोटासा सराव करायला आवडेल.
८. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा
शांतता मनाला स्थिर करते आणि बुद्धीला विश्लेषण आणि वर्गीकरण करण्यापासून थांबवते. त्यामुळे तुमच्या विचारांना स्पष्टता येते. आपल्याला आपली विचारप्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजते. कुठल्या संकल्पनांनी आपल्या वर्तनाला कंडिशन्ड केले आहे ते कळते. आपल्या समजुतींचा आरसा समोर येताच, आध्यात्मिक विकासासाठी आपल्याला काय करावे लागेल हे आपण त्या आरशात पाहू शकतो.
आपण विचार करणे थांबवतो आणि शांततेत विश्रांती घेतो तेव्हा आपण जे शोधत आहोत ते सत्य आपल्यासमोर येऊ लागते. शांत प्रकाशाचे असे क्षण आपल्याला उन्नत करतात आणि सांसारिक आणि नकारात्मक गोष्टींपासून समाधान आणि मुक्ततेची एक प्रचंड भावना निर्माण करतात. आपण जे शोधत होतो ते सापडल्याची भावना उत्पन्न होते. अशा आध्यात्मिक प्रकाशामुळे एक प्रचंड आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण होतो. अशा उच्च मन:स्थितीत तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा.
९. खऱ्या ज्ञानाची निवड करा
ज्ञानाचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल- प्राथमिक ज्ञान, दुय्यम ज्ञान आणि अनावश्यक ज्ञान. या प्रकारच्या ज्ञानांचे थोडक्यात वर्णन खाली दिले आहे:
९.१. प्राथमिक ज्ञान
प्राथमिक समजण्यास सोपे आहे आणि कोणीही कधीही ते आचरणात आणू शकतो. हे ज्ञान स्वतःला ओळखण्यास, सत्य अनुभवण्यास शिकवते. समाजाशी संबंध ठेवताना स्वतःमध्ये काय बदल घडवून आणले पाहिजे ते आपल्याला या ज्ञानामुळे कळते. त्यामुळे समाजातील आपले स्थान अधिक आदरणीय होते. ज्यांच्याकडे प्राथमिक ज्ञान आहे आणि या ज्ञानाचा जे वापर करतात, ते सर्वांत हुशार किंवा राजकीयदृष्ट्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतात असे नाहीत. प्राथमिक ज्ञान असणारे लोक समाजात शांतता आणि सहिष्णुता निर्माण करण्याचे कार्य करतात.
९.२. दुय्यम ज्ञान

प्राथमिक ज्ञान आचरणात आणण्यासाठी आवश्यक असणारे तत्त्वज्ञान, सिद्धांत, संकल्पना, या सर्वांचा दुय्यम ज्ञानामध्ये समावेश होतो. हे ज्ञान अयोग्य व्यक्तींच्या हातात पडल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.
९.३. अनावश्यक ज्ञान

खूप विचार करणे, खूप विश्लेषण करणे, खूप पुस्तके वाचणे आणि खूप जास्त माहिती हे सारे अनावश्यक ज्ञान.
आज, प्राथमिक ज्ञान दुय्यम ज्ञानाने मोठ्या प्रमाणात व्यापलेले आहे आणि अनावश्यक ज्ञानाने ते अधिकच अस्पष्ट झाले आहे. मौन हे आपल्याला प्राथमिक ज्ञानापर्यंत पोहोचण्यास मदत करणारे एक उत्तम उत्प्रेरक आहे.
१०. भ्रमांपासून स्वतःला मुक्त करा

भ्रम म्हणजे खोटा विश्वास. हा खोटा विश्वास आपण खरा मानतो आणि त्यानुसार जगतो. या भ्रमांमुळे आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होतो आणि आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो असे आपल्याला वाटते. पैसा, प्रतिष्ठा किंवा पद मिळवल्याने समाजात आपली किंमत वाढते असे मानणे हे या भ्रमाचे एक उदाहरण आहे. अशा भ्रमांची एक नशा निर्माण होते. या भ्रमांमुळे आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची विशेषतः इतरांच्या नजरेत. असे भ्रम आपल्याला अवलंबित्वात 'नशा' करतात, विशेषतः मान्यतेच्या गरजेवर, अशा भ्रमांची पूर्तता झाली नाही तर ते भीती, मत्सर, नैराश्य अशा नकारात्मक भावनांना कारणीभूत ठरू शकते. असे भ्रम आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या मुळांपर्यंत पोहचण्याची आपली क्षमता कमी करतात.
शांततेमध्ये एकाग्रतेत असताना स्वत:चा शोध घ्या आणि खालील गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करा:-
१०.१ वाईट सवयींपासून मुक्त होणे
१०.२ स्वत:ला बदलणे
१०.३ नकारात्मकता कमी करणे.
११. क्रोधावर मात करा
क्रोध फक्त वरवरचा असतो. जेव्हा तुम्ही शांततेत खोलवर जाता तेव्हा तुम्हाला अशा वरवरच्या गोष्टींची व्यर्थता तुम्हाला पटते आणि अशा गोष्टींच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न तुम्ही करता.
१२. ज्ञानेंद्रियांचे शुद्धीकरण

तुमच्या शरीरात विषारी पदार्थ साचलेले असतात. त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानेंद्रियांतही काही विषारी पदार्थ साचलेले असतात. यांमध्ये व्यर्थ आणि अनावश्यक विचार, अहंकार, क्रोध, दोष, अन्यायाच्या स्मृती अशा गोष्टींचा समावेश होतो.
तुमचे शरीर ज्याप्रमाणे तुम्ही शुद्ध किंवा डिटॉक्स करता, त्याप्रमाणे तुमची ज्ञानेंद्रियेसुद्धा शांततेमध्ये डिटॉक्स किंवा शुद्ध करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक दुर्मिळ ताजेपणाचा अनुभव येईल.
१३. शुद्धीकरणाची प्रक्रिया
ज्ञानेंद्रियांचे शुद्धीकरण असे करा :-
१३.१ जीभ👅: तुमच्या शब्दांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवण्याचे रहस्य म्हणजे शांत राहणे, स्वाभिमान बाळगणे आणि इतरांच्या स्वाभिमानाची जाणीव ठेवणे. असा प्रयत्न तुम्ही केलात तर तुमचे सर्व शब्द गोड आणि विचारशील असतील. तुमचे शब्द अर्थ, परोपकार आणि सेवेच्या विचारांनी भरा.
१३.२ कान👂:-फक्त चांगल्या गोष्टी ऐका आणि आत्मसात करा. जेव्हा आपण सत्य आत्मसात करता तेव्हा इतरांच्या हितासाठी स्वत:मध्ये काय बदल करता येतील, ते आपल्याला समजते.
१३.३ दृष्टी 👁️:- इतरांचे गुण पाहण्यासाठी दृष्टीचा वापर करा.
१३.४ अंत:करण ❤️: तुमच्या अंत:करणात व्यर्थ विचार तुम्ही येऊ दिले नाहीत तर तुमच्याकडून अनावश्यक शब्दांचा वापर होणार नाही आणि तुमच्यावरसुद्धा कुणी अनावश्यक शब्दांचा मारा कुणी करणार नाही .
१४. जागृत व्हा आणि सजग रहा

जेव्हा तुम्ही जागृत 👁️ व्हाल, तेव्हा जगात 🌎 जा आणि शांतीचे साधन बना. कारण सर्व जीवात्म्यांना खऱ्या शांतीची खूप गरज असते. जेव्हा तुम्ही शांततेकडे लक्ष देता, तेव्हा ईश्वराशी संधान साधण्याचा मार्ग 🛣️ नेहमी खुला असतो. मग तुमचा उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रवास करताना कुठलीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही.
१५. स्वत:ची क्षमता वाढवा
शांततेमुळे आपल्याला एक क्षमता प्राप्त होते. या क्षमतेचा आपण आदर केला पाहिजे. शांततेद्वारे आपण एकाग्रतेची कला शिकतो आणि नंतर आपण स्वतःला शांती आणि आध्यात्मिक प्रेमाने सक्षम करायला शिकतो. शांततेत, आपण ईश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी मनाच्या उर्जेचा पूर्णपणे वापर करतो आणि म्हणून आपण ईश्वराच्या शांती, प्रेम आणि प्रकाश या गुणांचे दीपस्तंभ बनतो. असे वैयक्तिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी खूप कमी विचार करणे आवश्यक आहे. आपल्याला अंतरात्म्याशी आणि त्याच्या मूळ संसाधनांशी जोडण्याची आणि प्रत्येक गोष्टीचा स्रोत असलेल्या ईश्वराशी प्रेमाने जोडण्याची आवश्यकता आहे. आपल्या जाणीवेत अनुसंधानाचा हा एकच विचार ठेवून, आपण अहंकार आणि स्वामित्वाने विचलित न होता स्वतःला सामर्थ्यशाली करतो. हळूहळू आपल्याला हे समजते की, आपल्याला जीवनात प्रयत्न करावे लागले तरी, सर्व गोष्टी घडायच्या आहेत तशा घडतील आणि योग्य मार्गाने घडतील.
१६. शांत जीवन
मनाची शांती, सर्वांविषयी आदर, नि:स्वार्थता या गोष्टींनी विश्वकल्याण अबाधित राहते. याच गुणांनी ईश्वराशी संबंध प्रस्थापित करता येतो. अशी काही मार्गदर्शक तत्वे येथे सांगितली आहेत:-
१६.१ सध्याचा क्षण जगा
अपराधीपणा, पश्चात्ताप किंवा जुन्या आठवणींचा त्याग करा आणि तुमचा सध्याचा क्षण जगा.
१६.२ आंतरिक बलस्थानांची जाणीव ठेवा:
तुम्ही आतून खूप बलशाली आहात हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही उत्साहाने आणि शांततेने कार्य करीत राहाल आणि सर्वत्र नकारात्मकता दूर करून आशावादाचा प्रसार कराल.
१६.३ उदारता बाळगा
तुम्ही 'मी' आणि 'माझे' या मर्यादित, संकुचित दृष्टिकोनांतून स्वतःला मुक्त करता तेव्हा तुम्हाला खऱ्या उदारतेचा अनुभव येतो. या उदारतेमुळे मग तुमचे सारे गुण गुणाकार केल्याप्रमाणे वाढत जातात आणि तुम्हाला जीवनात एक विपुलतेच्या प्रवाहाचा अनुभव येतो.
१६.४ गुणांचा समूह आत्मसात करा
एकच गुण अंगी आणण्यापेक्षा गुणांच्या समूहावर लक्ष केंद्रित करा. जसे, संयम आणि लवचिकता. एका गुणाबरोबर दुसरा गुण आपोआप येईल.
१६.५ तुमचेही एक मूल्य आहे

जीवनात अपयशाचा सामना करावा लागला की असे वाटते की आपल्यामध्ये काही गुण नाहीत. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. शांततेच्या सरावातून तुम्हाला जाणवेल की तुमचे स्वत:चे एक मूल्य आहे जे नष्ट करता येत नाही.
१६.६ संवाद साधा
इतरांशी संवाद साधा. हा संवाद तुम्हाला संतुलित ठेवील आणि तुमचे जीवन आनंदी राखण्यास मदत करील.
१६.७ प्रत्येक नव्या क्षणाबरोबर सूर जुळवा
परंपरा, सामाजिक रीतिरिवाज किंवा वैयक्तिक भावनांमुळे 'योग्य' आणि 'चुकीचे' या कोणत्याही सूत्रात अडकून पडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. योग्य प्रतिसाद समजण्यासाठी निर्णय घेण्यापेक्षा विवेकाची आवश्यकता असते. निर्णय धोकादायक असतात; ते मानसिक आणि भावनिक अडथळे अधिक मजबूत करतात.
१६.८ पेराल ते उगवेल

आपण विश्वात जे काही पेरतो ते लवकरच किंवा नंतर पुन्हा निर्माण होईल.
१६.९ वेळेत घातलेला एक टाका नंतरचे नऊ टाके वाचवतो

जेव्हा आपण एखादा विचार किंवा चूक ओळखतो आणि संकोच किंवा भीती न बाळगता त्यावर लगेच कृती करतो, तेव्हा जीवन चांगले होते.
१६.१०-सकारात्मकतेवर भर द्या
चांगल्या संगतीत राहा आणि नकारात्मक गप्पा मारणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
१६.११- अवकाश + शांतता=पुनरुज्जीवन

सृष्टीत विनाशापाठी पुनरुज्जीवन येतेच. स्वतःसाठी पुरेसा अवकाश मिळवला आणि शांततेचा सराव करीत राहिला तर तुमच्या आंतरिक जीवनाचे पुनरुज्जीवन नक्कीच होईल.
Seeking Silence:
ॲंथनी स्ट्रॅनो यांच्या Seeking Silence या पुस्तकाचा हा थोडक्यात सारांश आहे. पुस्तकाबरोबर एक सी डी सुद्धा असून त्यामध्ये Guided Meditation आहे.
Anthony Strano:
(ॲंथनी स्ट्रॅनो यांचा पुस्तकात दिलेला परिचय)
या पुस्तकाचे लेखक ॲंथनी स्ट्रॅनो तज्ज्ञ व्याख्याते असून ग्रीसमधील ब्रह्माकुमारी संस्थेचे राष्ट्रीय संचालक आहेत. ती तीस वर्षांपासून सराव करीत आहेत आणि शिकवीत आहेत. Slaying the three dragons या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. ते जगभर प्रवास करून, व्याख्याने देऊन, कार्यशाळा आणि परिसंवाद यांतून आध्यात्मिक कल्पनांच्या व्यावहारिक अंमलबजावणीचे शिक्षण देतात)
Blog post Copyright:
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved