श्रीसाईसच्चरित अध्याय २७
दीक्षानुग्रहदानं
(ओवीसंख्या २०२)
चिंतन
बाबांनी भक्तांना
निरनिराळ्या पोथ्या, ग्रंथ वगैरे वाचण्यास प्रवृत्त केले. यांमध्ये बऱ्याचशा
पोथ्या, ग्रंथ असे असत की भक्तच बाबांकडे घेऊन येत. त्यांची अशी श्रद्धा
अशी असे की बाबांनी कृपास्पर्श करून हे ग्रंथ दिले तर त्यांचे वाचन निर्विघ्नपणे होईल. हे ग्रंथ कधी बाबा
भक्तांस परत न देता शामाला ठेवून घेण्यास सांगत तर कधी दक्षिणेसह भक्तांस वाचण्यास
परत देत. श्री दाभोळकरांच्या मते हासुद्धा
बाबांच्या भक्तांवरील दीक्षानुग्रहाचाच प्रकार होता आणि भक्तांची कुवत पाहून केलेला
होता.
अध्यायारंभ (१- ३०)
काका महाजनींनी आणलेला श्री भागवत ग्रंथ बाबा शामाकडे ठेवण्यास देतात. पुढे काका महाजनी दुसरा श्रीभागवत ग्रंथ
घेऊन येतात तो बाबा काकांस परत देतात . बऱ्याच भक्तांनी आणलेले
ग्रंथ बाबांनी भक्तांना परत न देता शामाकडे ठेवण्यास दिले (३१-६१)
एका रामदासी बुवाची
विष्णुसहस्रनामाची पोथी बाबा शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस
देतात- विष्णुसहस्रनामाची बाबांनी सांगितलेली महती (६२ -१३० )
बापूसाहेब जोगांना बाबा लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्यास प्रोत्साहन देतात (१३१-१३८)
दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नीने आणलेला प्रसाद ग्रहण करून बाबा त्या पूर्वजन्मी
एक गाय असल्याचे शामाला सांगतात (१३९-१६८)
अध्यायाचा समारोप (१६९-२०२)
No comments:
Post a Comment