IIश्रीसाईसच्चरित II
अध्याय ३२
गुरुमहिमावर्णनं
(ओवीसंख्या १७४)
अध्यायारंभ (१-३६)
बाबांनी सांगितलेली स्वानुभवाची
कथा- बाबांसह चार जण रानात गुरूचा शोध करतात, बाबांचे गुरू बाबांना
विहिरीत उलटे बांधून जातात. (३७-१२१)
शिमग्याच्या दिवशी उपवास करण्याच्या
इच्छेने बाबांकडे आलेल्या एका बाईंकडून बाबा पुरणपोळ्यांचे भोजन करवून
घेतात (१२२-१४८)
बाबांनी सांगितलेली गोष्ट - बाबा पोटापाण्यासाठी
बीड गावी जरीचे काम करतात आणि त्यांचे काम सर्वांत चांगले झाल्यामुळे मालक त्यांना
पागोटे-आणि शेला यांनी युक्त असा पोशाख
भेट देतो. अध्यायाचा समारोप. (१४९-१७४)
रानात देवाचा शोध
बाबांसह चार जण रानात देवाचा शोध करतात. बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात बाबांनी सांगितलेली स्वानुभवाची कथा-. (३७-१२१)
१.
बाबा आणि
त्यांचे तीन सहाध्यायी ब्रह्मनिरूपण करून स्वतः शोध घेण्यासाठी रानात हिंडत असतात. त्या वेळी त्यांना एक वणजारी भेटून कुठल्याही शोधास
जाताना रिकाम्या पोटी शोध न करण्याची आणि
बरोबर वाटाड्यास घेण्याची विनंती करतो. इतर तीन सहाध्यायी त्या वणजाऱ्याचे ऐकत नाहीत, परंतु
बाबा त्याचे ऐकून खाऊन घेतात. त्यांना गुरू भेटतात. बाबा गुरूला बरोबर घेऊन शोध चालू ठेवतात.
२.
बाबांचे
गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात. गुरू दहा-बारा घटिकांनंतर बाबांना येऊन बाहेर काढतात
आणि अनुभवाबद्दल विचारतात. बाबा सांगतात की तो अनुभव अतिशय सुखदायक
होता. अशा प्रकारे बाबांची गुरुकडे शाळा सुरू होते.
शिमग्याचा दिवस आणि पुरणपोळ्यांचे भोजन
शिमग्याच्या दिवशी उपवास करण्याच्या इच्छेने बाबांकडे आलेल्या गोखले बाईंकडून बाबा पुरणपोळ्यांचे भोजन करवून घेतात (१२२-१४८)
एकदा गोखले नावाच्या एक बाई शिमग्याच्या दिवशी येऊन बाबांच्या पायाशी राहून तीन दिवस उपवास करण्याच्या इच्छेने येतात. बाबा तिला उपवास न करण्याचा उपदेश करून दादा केळकरांच्या घरी जाऊन पुरणपोळ्यांचे भोजन करण्यास सांगतात. त्याप्रमाणे त्या बाई उपवास न करता पुरणपोळ्यांचे भोजन करतात.
बाबांनी केलेले जरीचे काम
बाबांनी सांगितलेली गोष्ट -बाबा पोटापाण्यासाठी बीड गावी जरीचे काम करतात आणि त्यांचे काम सर्वांत चांगले
झाल्यामुळे मालक त्यांना पागोटे-आणि शेला यांनी युक्त असा पोशाख
भेट देतो. अध्यायाचा समारोप. (१४९-१७४)
बाबा एकदा पोटापाण्यासाठी कामाच्या शोधात जातात
आणि बीड गावी त्यांना एक जरीचे काम मिळते. बाबांचे
काम इतर सर्वांपेक्षा चांगले होते आणि मालक त्यांना पागोटे आणि शेला यांनी युक्त पोशाख
देतात. बाबा तो न वापरता तसाच ठेवून देतात. बाबा सांगतात की, 'कोणाचे देणे कायम पुरत नाही.
परंतु माझे सरकार देतात ते कल्पान्तीही सरत नाही.'