Thursday, April 9, 2026

श्रीसाईसच्चरित - अध्याय २८

 IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २८         

दृष्टांतकथनं       

या अध्यायात काय आहे

*      अध्यायारंभ (- १०)

*      लाला लक्ष्मीचंद या मुंबईच्या गृहस्थांस स्वप्नामध्ये एका वृद्ध व्यक्तीचे दर्शन होते. पुढे लाला लक्ष्मीचंद दासगणूंच्या कीर्तनास जातात तेथे साईबाबांची प्रतिमा पाहतात. ही प्रतिमा स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीशी मिळती जुळती असते. यावरून लक्ष्मीचंदांस कळते की ते स्वप्नातील गृहस्थ साईबाबा होते. (११-९८) 

*      बऱ्हाणपूरच्या एका बाईस बाबा स्वप्नात खिचडी मागतात आणि ती बाबांना खिचडीचा नैवेद्य दाखवण्यासाठी शिरडीत येते. बाबा सर्व पदार्थांतून त्या बाईंनी आणलेली खिचडी निवडतात  (९९-११५)

*      शिवभक्त मेघाच्या कथा आणि अध्यायाचा समारोप (११६-२१७)

. मेघा बाबांस मुसलमान समजत असतो. त्यामुळे मेघा मशिदीत येताच बाबा त्याला दगड मारून जाण्यास सांगतात. (११७-१५०)

. खंडोबाच्या मंदिराचे दार बंद असल्याने मेघा खंडोबाची पूजा करताच परत येतो. बाबा त्याला दार उघडे असल्याचे सांगतात. (१५१-१६३)

. मेघा बाबांस गंगास्नान घालतो. बाबांचे फक्त डोके ओले होते, बाकी शरीर कोरडे राहते. (१६४- १८६)

. बाबा स्वप्नात येऊन मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगतात. नंतर एका रामदास भक्तांकडून आलेलं  शिवलिंग मेघास देतात (१८७-२१४)


लाला लक्ष्मीचंद या मुंबईच्या गृहस्थांस स्वप्नामध्ये एका वृद्ध व्यक्तीचे दर्शन होते. पुढे लाला लक्ष्मीचंद दासगणूंच्या कीर्तनास जातात तेथे साईबाबांची प्रतिमा पाहतात. ही प्रतिमा स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीशी मिळती जुळती असते. यावरून लक्ष्मीचंदांस कळते की ते स्वप्नातील गृहस्थ साईबाबा होते.  

 

                     मेघा बाबांस मुसलमान समजत असतो. त्यामुळे मेघा मशिदीत येताच बाबा त्याला दगड मारून जाण्यास सांगतात:-  मेघा हा गुजराती ब्राह्मण रावसाहेब साठयांच्या पदरी होता. मेघा शिवभक्त होता. साठे साईभक्त होते आणि त्यांना साईबाबांना गंगास्नान घालावयाचे होते. तसे त्यांनी मेघास सांगिंतले. मेघाच्या माहितीप्रमाणे साईबाबा मुसलमान होते आणि तो मुसलमान व्यक्तीची सेवा करू इच्छित नव्हता. परंतु आपली नोकरी सांभाळावयाची असल्याने तो काही बोलला नाही आणि तो शिरडीस आला. परंतु तो मशिदीची पायरी चढू लागताच बाबांनी उग्र अवतार धारण केला आणि त्याला दगड मारू लागले. ते बोलत होते,' मी मुसलमान आहे नाही का? तू उच्च जातीचा ब्राह्मण आहेस. तुला माझा विटाळ होईल. तेव्हा तू येथून निघून जा.' आपल्या मनातील विचार बाबांना कळलेले पाहून मेघा थक्क झाला. तरी त्याचा विश्वास बसत नव्हता. पुढे तो घरी गेल्यानंतर अंथरुणाला खिळला आणि या आजारपणातच त्याला बाबांचा ध्यास लागला. पुढे तो शिरडीतच राहून जमेल तशी बाबांची सेवा करीत राहिला. (११७-१५०)

 

                    खंडोबाच्या मंदिराचे दार बंद असल्याने मेघा खंडोबाची पूजा न करताच परत येतो. बाबा त्याला दार उघडे असल्याचे सांगतात:- मेघा शिवभक्त होता. आता तो बाबांचाही भक्त झाला आणि बाबांनाच शिवाचे रूप मानू लागला. तो मुखाने साईशंकरअसा घोष करू लागला. शिवास बेलपत्र प्रिय. परंतु शिरडीत बेलाचे झाड नव्हते. त्यामुळे तो कोस  दीड कोस दूर  जाऊन बेलाची पाने घेऊन येत असे आणि  सर्व देवतांचे यथासांग पूजन करून बाबांच्या वंदनास येत असे. एकदा मेघा याचप्रमाणे सर्व देवांची पूजा करीत असता खंडोबाच्या देवळाचे दार बंद असल्याने तो खंडोबाची पूजा न करता तसाच बाबांकडे आला. तेव्हा बाबा त्यास म्हणाले. 'अरे, एका देवाची पूजा राहिली.' मेघाने खंडोबाची पूजा राहिल्याचे सांगताच बाबा म्हणाले,' जा आता, दार उघडे आहे,' मेघा पुन्हा गेला असता खरोखरच दार उघडे होते. मेघा मग खंडोबाची पूजा करून बाबांकडे आला.   (१५१-१६३)

 

                    मेघा बाबांस गंगास्नान घालतो. बाबांचे फक्त डोके ओले होते, बाकी शरीर कोरडे राहते:- एकदा मकर संक्रान्तीच्या दिवशी मेघाला शिवास  गंगास्नान घालण्याची इच्छा झाली. त्याच्या दृष्टीने बाबा शिवस्वरूप असल्याने त्याने आपली इच्छा बाबांस  सांगितली. बाबांनी त्यास मान्यता  दिली. मेघाने जाऊन-येऊन आठ कोस पायपीट करून गोदावरीचे पाणी गंगाजल म्हणून  घागरीतून आणले. बाबांना पाटावर बसविले. बाबांनी डोके पुढे करून फक्त डोक्यावरच थोडे पाणी ओतण्यास सांगितले. मेघाने ते न ऐकता सर्व अंगावर पाण्याची घागर पालथी केली. परंतु पाहतो तो बाबांचे फक्त डोकेच ओले झाले होते. बाकी अंग कोरडे होते. (१६४- १८६)

 

                    बाबा स्वप्नात येऊन मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगतात. नंतर एका रामदास भक्तांकडून आलेलं  शिवलिंग मेघास देतात:- मेघा बाबांची दोन स्वरूपात पूजा करीत असे. एक- बाबांची प्रतिमा. ही प्रतिमा त्याला नानासाहेब चांदोरकरांनी दिली होती. दोन - प्रत्यक्ष बाबा. बाबांची अशा प्रकारे उपासना करता करता बारा महिने लोटले. एक दिवशी पहाटेच्या वेळेला मेघाला दृष्टांत झाला. त्याच्या समोर बाबा उभे होते. बाबांनी त्याच्या बिछान्यावर अक्षता टाकल्या आणि मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगितलेबिछान्यावर अक्षता पडलेल्या दिसत होत्या. वाड्याची सर्व कवाडे बंद असताना बाबा आत कसे येतील, असे वाटून मेघाला दृष्टांताबद्दल शंका आली. शंकेचे समाधान करून घेण्यासाठी तो ताबडतोब मशिदीत गेला आणि बाबांचे दर्शन घेऊन या दृष्टांताच्या सत्यतेविषयी प्रश्न केला. त्यावर  बाबा म्हणाले,' माझिया प्रवेशा नलगे दार I नाही मज आकार ना विस्तार II वसे निरंतर सर्वत्र II १९९II टाकूनीया मजवरी भार I मीनला जो मज साचार II तयाचे सर्व शरीर व्यापार I मी सूत्रधार चालवी  II २०० II' मेघा या उत्तराने समाधान पावून वाड्यात परतला आणि बाबांची छबी जिथे दिसली होती तेथे त्याने तांबड्या रंगात त्रिशूळाची आकृती काढली. दुसऱ्या दिवशी मशिदीत  समर्थ रामदासांचा एक भक्त आला आणि त्याने बाबांना शिवलिंग अर्पण केले. त्याच वेळी मेघाही तेथे आला. मेघाला पाहून बाबा म्हणाले,' हा शंकर आला I सांभाळी याजला तू आता' II २०४II मेघा सद्गदित होऊन शिवलिंग घेऊन निघाला. त्याच वेळी काकासाहेब दीक्षित वाड्यात स्नान करून बाबांचे नामस्मरण करीत होते. त्या वेळी ध्यानात त्यांना शिवलिंग दिसले. त्याच वेळी मेघा त्यांच्याकडे आला आणि त्याने बाबांनी दिलेले शिवलिंग दाखविले. दीक्षितांना आश्चर्य वाटले. कारण त्यांना ध्यानात दिसलेले शिवलिंग या शिवलिंगासारखेच होते. मेघाने पुढे त्रिशूळाच्या आकृतीशेजारीच बाबांच्या हातून शिवलिंगाची स्थापना केली. श्री. दाभोळकर म्हणतात,' मेघास आवडे शंकरपूजन I करून शंकर लिंगप्रदान II केले तद्भक्तीचे दृढीकरण I नवल विंदान साईंचे II २१४ II (. २८- ओवी १८७-२१४)


Thursday, April 2, 2026

श्रीसाईसच्चरित, अध्याय २६


 श्रीसाईसच्चरित, अध्याय २६     

अपस्मारात्महत्त्यानिवारणं तथा निजगुरूपदस्थिरीकरणं   

(ओवीसंख्या १५६)

या अध्यायात काय आहे

चिंतन

मनोमन करिता बाबांचे स्मरण अंतश्चक्षूंनी घेता बाबांचे दर्शन II

सदैव गाता  बाबांचे गुणगान   I  होईल सार्थक जन्माचे II (स्वविचार)  

 

*      अध्यायारंभ; बाबांची आंतरिक पूजा करण्याविषयी श्री दाभोळकरांचे मार्गदर्शन  (- ३७)

*      बाबांशिवाय इतर व्यक्तीस गुरू मानणारे पंत नावाचे गृहस्थ बाबांच्या भेटीस गेले असता मूर्च्छित होऊन पडतात; बाबा त्यांस आपल्या गुरुशीच एकनिष्ठ राहण्याचा संकेत देतात (३८-५६)

*      हरिश्चंद्र पितळे  यांच्या मुलाचा अपस्मार बाबा बरा करतात व त्यांस तीन रुपये देऊन आधी दिलेल्या दोन रुपयांमध्ये हे तीन रुपये ठेवून त्यांची पूजा करण्यास सांगतात (५७-११२)

*      बाबांचे एक भक्त गोपाळ नारायण आंबेडकर दारिद्र्यामुळे आत्महत्त्येस जात असता एक खानावळवाले त्यांस अक्कलकोट स्वामींची पोथी वाचण्यास देतात; या पोथीतील आत्महत्त्येच्या निष्फळतेवरील अध्याय वाचून आंबेडकर आत्महत्त्येपासून परावृत्त होतात; अध्यायाचा समारोप (११३-१५६)


 बाबा आपल्या भक्तास आत्महत्त्येपासून परावृत्त करतात

 

श्री. गोपाळ नारायण आंबेडकर हे बाबांचे भक्त होते. ते आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्रस्त झाले होते. एकदा ते शिरडीला आले असताना विहिरीत उडी मारून आत्महत्त्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

 

तेथे समोरच एक खाणावळ होती. त्या खाणावळीचा सगुण नावाचा मालक बाबांचा भक्त होता. तो आंबेडकरांजवळ येऊन त्याने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची पोथी आंबेडकरांच्या हातात देऊन विचारले,'ही पोथी तुम्ही वाचली आहे का?'

 

आंबेडकरांनी पोथी हातात घेऊन चाळली असता योगायोगाने एक अध्याय त्यांच्या वाचण्यात आला. या अध्यायातील कथा अशी होती-

 

स्वामी समर्थांचे एक भक्त असाध्य रोगाने पीडित असल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्त्येचा विचार करीत असतात. त्याच वेळी स्वामी समर्थ त्याच्या समोर प्रगट होऊन त्याला उपदेश करतात की मनुष्याला सारे भोग त्याच्या कर्मांमुळे भोगावे लागतात आणि हे भोग त्याच जन्मात भोगले नाहीत तर दुसरा जन्म घेऊन भोगावे लागतात. या भक्ताने मग आत्महत्त्येचा विचार रहित केला.

ही कथा आंबेडकरांस मार्गदर्शक वाटली आणि बाबांचे आभार मानून त्यांनी आत्महत्त्येचा विचार रहित केला. आंबेडकरांनी ज्योतिषविद्येचा अभ्यास करून या विद्येवर उपजीविका सुरू केली. बाबांच्या कृपेमुळे यथावकाश त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

 

 

श्रीसाईसच्चरित अध्याय २७

 श्रीसाईसच्चरित अध्याय २७

दीक्षानुग्रहदानं     

(ओवीसंख्या २०२)

चिंतन

बाबांनी भक्तांना निरनिराळ्या पोथ्या, ग्रंथ वगैरे  वाचण्यास प्रवृत्त केले. यांमध्ये बऱ्याचशा पोथ्या, ग्रंथ असे असत की भक्तच बाबांकडे  घेऊन येत. त्यांची अशी श्रद्धा अशी असे की बाबांनी कृपास्पर्श करून हे ग्रंथ दिले तर त्यांचे वाचन निर्विघ्नपणे होईल. हे ग्रंथ कधी बाबा भक्तांस परत न देता शामाला ठेवून घेण्यास सांगत तर कधी दक्षिणेसह भक्तांस वाचण्यास परत देत. श्री दाभोळकरांच्या मते हासुद्धा बाबांच्या भक्तांवरील दीक्षानुग्रहाचाच प्रकार होता आणि भक्तांची कुवत पाहून केलेला होता.

*      अध्यायारंभ (- ३०)

*      काका महाजनींनी आणलेला श्री भागवत ग्रंथ बाबा शामाकडे ठेवण्यास देतात. पुढे काका महाजनी दुसरा श्रीभागवत ग्रंथ घेऊन येतात तो बाबा काकांस परत देतात . बऱ्याच भक्तांनी आणलेले ग्रंथ बाबांनी भक्तांना परत न देता शामाकडे ठेवण्यास दिले (३१-६१)

*      एका रामदासी बुवाची  विष्णुसहस्रनामाची पोथी बाबा शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस देतात- विष्णुसहस्रनामाची बाबांनी सांगितलेली महती (६२ -१३० )

*      बापूसाहेब जोगांना बाबा लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्यास प्रोत्साहन देतात (१३१-१३८)

*      दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नीने आणलेला प्रसाद ग्रहण करून बाबा त्या पूर्वजन्मी एक गाय असल्याचे शामाला सांगतात (१३९-१६८)

*      अध्यायाचा समारोप (१६९-२०२)

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...