Thursday, July 31, 2025

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ११ – विश्वरूपदर्शनयोग

अर्जुन म्हणाला

माझ्यावर कृपा करून | केलेस तू कथन || गूढ अध्यात्मज्ञान | त्याने मोह दूर झाला || अ.११, ओ.१||

विस्ताराने केले कथनास | भूतांच्या उत्पत्ती तसेच लयास  || आणि तुझ्या अव्यय माहात्म्यास | हे कमलपत्राक्षा || अ.११, ओ.२||

परमेश्वरा, तू जसे वर्णिले स्वत:स | तसाच मला दिसतोस || परंतु तुझ्या ऐश्वर रूपास | पाहण्या मी इच्छितो  || अ. ११, ओ.३||

प्रभो, तुझे रूप पाहण्याला | जर वाटतो मी योग्य तुला || तर तुझे अव्यय रूप मला | दाखवावे योगेश्वरा || अ. ११, ओ. ४ ||

श्रीभगवान म्हणाले

शेकड्यांत आणि सहस्रांत | नानाविध प्रकारांत ||नानाविध रंगांत आणि आकारांत | पार्था, माझी दिव्य रूपे पहा || अ.१, ओ.५||

आदित्यांना, वसूंना, रुद्रांना | अश्विनीकुमारांना आणि मरुद्गणांना || तसेच पूर्वी न पाहिलेल्या आश्चर्यांना | पाहून घे भारता || अ.१, ओ.६||

गुडाकेशा, देहात माझ्या | पहा चराचर जगास साऱ्या || इच्छितोस आणखी जे पाहण्या | तेही घे पाहून || अ.१, ओ.७ ||

चक्षूंनी स्वत:च्या | समर्थ नाहीस तू पाहण्या ||माझा ऐश्वर योग पाहण्या | दिव्य चक्षू देतो तुला || अ.१, ओ.८||

संजय म्हणाला 

हे राजा, तेव्हा असे बोलुनी | महायोगेश्वर हरींनी ||पार्थास दिले दाखवुनी | परम ऐश्वर रूप || अ.११, ओ.९||

अनेक मुखे, अनेक नयनांनी युक्त | अनेक दर्शनांनी युक्त || अनेक आभरणांनी अलंकृत | अनेक दिव्य आयुधांनी सिद्ध- || अ.११, ओ.१०||

-दिव्य माळा आणि वस्त्रांनी युक्त | लावून उटणे दिव्य सुगंधित || देव आश्चर्यकारक अत्यंत | अनंत विश्वव्यापक || अ.११, ओ. ११||

प्रकटता सहस्र सूर्य आकाशात | जे तेज दिसून येत || तशा तेजाने तळपत | होता तो महात्मा || अ.११, ओ.१२||

तेव्हा पांडवाने पाहिले सारे जगत | जे विभागले अनेक भागात || त्या देवांच्या देवाच्या शरीरात | एकाच ठिकाणी || अ.११, ओ.१३||

तेव्हा धनंजय होऊन विस्मित | आणि रोमांचित ||बोलला जोडून हात | नमवून शिरास || अ.११, ओ.१४||

अर्जुन म्हणाला 

सर्व देवांचे आणि भूतांचे | कमलासनस्थ ब्रह्मदेवाचे || ऋषींचे आणि दिव्य नागांचे | देवा, तुझ्या देहात दर्शन होते || अ.११, ओ.१५||

अनेक नेत्र, मुखे, उदर आणि हात | दिसतात तुझ्या सर्वव्यापी अनंत रूपात || परी दिसे न तुझा आदि, मध्य किंवा अंत | हे विश्वेश्वरा, विश्वरूपा || अ. ११, ओ.१६||

किरीट, गदा आणि चक्र धारण करणारा |दीप्तिमान, तेजाने तळपणारा || प्रज्वलित अग्नी किंवा सूर्यासम प्रकाशणारा | तुला पाहणे कठीण || अ.११, ओ.१७ ||

तू अक्षर, श्रेष्ठ, योग्य जाणण्यास | तू श्रेष्ठ आधार या विश्वास || तू अव्यय, रक्षितोस शाश्वत धर्मास | तू सनातन पुरुष मला वाटतोस || अ. ११, ओ. १८ ||

आदि, मध्य आणि अंत नसणारा | अनंतवीर्य, अनंतबाहू, चंद्रसूर्य हेच नेत्र असणारा | प्रदीप्त अग्नीने युक्त मुख असणारा | स्वतेजाने या विश्वास तप्त करणारा दिसतोस || अ.११, ओ.१९||

व्यापलेस अंतर आकाश आणि पृथ्वीमधील | तू व्यापिल्यास दिशा सकल || महात्म्या, त्रैलोक्य झाले व्याकुल | अद्भुत, उग्र रूप तुझे पाहून || अ.११, ओ.२०||

सुरसंघ तुझ्यात प्रवेश करती | काही भीतीने हात जोडून स्तवन करती || महर्षी आणि सिद्ध 'स्वस्ति' म्हणती | आणि करती स्तुती तुझी || अ.११, ओ.२१||

रुद्र, वसू आणि भास्कर | विश्वेदेव, अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितर || गंधर्व, यक्ष, सिद्ध आणि असुर | विस्मयाने पाहती तुला || अ.११, ओ. २२||

हे महाबाहो, रूप तुझे विशाल | ज्यास आहेत मुखे, नेत्र, बाहू, मांड्या आणि पाय पुष्कळ | अनेक उदर आणि दाढांमुळे जे दिसते कराल | पाहून लोक आणि मीही झालो व्याकुळ || अ. ११, ओ. २३||

तू नभास स्पर्शतोस, तुझे तेजस्वी वर्ण बहुत | तू वासलेस मुख, तुझे विशाल नेत्र प्रदीप्त || तुला पाहून अंतरी झालो व्यथित | हे विष्णो, मला न धैर्य, न शांती || अ.११, ओ.२४||

कालाग्नीच्या समान | कराल दाढा असलेली तुमची मुखे पाहून || न वाटते सुरक्षित, न राहिले दिशांचे भान | देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न हो || अ.११, ओ.२५ ||

हे धृतराष्ट्राचे सुत | साऱ्या राजांच्या सहित | भीष्म, द्रोण, सूतपुत्र उपस्थित | आणि आमचेही मुख्य योद्धे- || अ. ११, ओ.२६ ||

-भयानक कराल दाढांनी युक्त | तुमच्या मुखांत त्वरेने शिरतात | काहींची मस्तके अडकून दाढांत | चुराडा झालेली दिसती || अ . ११, ओ. २७||

जसे नदीचे प्रवाह वेगात | समुद्राच्या दिशेने वाहतात || तसे हे नरवीर होऊन प्रज्वलित | तुझ्या मुखांत प्रवेश करतात || अ.११, ओ.२८|| 

जसे पतंग वेगात | नाश पावण्या शिरतात प्रदीप्त अग्नीत || तसे लोक तुझ्या मुखांत वेगात शिरतात | नाश पावण्या || अ.११, ओ.२९||

तुझ्या जळत्या मुखांनी | सर्व लोकांस गिळत आहेस चाटुनी || विष्णो, तुझे तेज सारे जग व्यापुनी | उग्र किरण जगास ताप देती || अ. ११, ओ. ३०||

उग्ररूप आपण कोण ते करावे कथन | देववरा, प्रसन्न व्हा, मी करतो नमन || तुम्हास जाणू इच्छितो, तुम्ही आदिकारण | प्रवृत्त कशास मी न जाणतो || अ.११, ओ.३१||

श्रीभगवान म्हणाले

लोकांचा क्षय करणारा मी काळ थोर | प्रवृत्त आहे करण्या लोकांचा संहार || नाश पावतील हे सारे वीर | केवळ तुझ्याशिवाय || अ.११, ओ.३२||

तेव्हा ऊठ, मिळव यशास | समृद्ध राज्य उपभोग, जिंकून शत्रूंस || मीच मारले पूर्वी या सर्वांस | हे सव्यसाची, तू निमित्तमात्र हो || अ.११, ओ.३३||

द्रोण, भीष्म आणि जयद्रथ यांस | कर्ण तसेच अन्य वीरांस || मी मारले आहे, तू व्यथित न होता मार त्यांस | शत्रूंवर विजय मिळवशील || अ.११, ओ.३४||

संजय म्हणाला 

केशवाचे हे वचन ऐकून | हात जोडलेला, थरथर कापणारा अर्जुन || अत्यंत भ्यालेला, सद्गदित होऊन | कृष्णास असे बोलला || अ. ११, ओ. ३५ ||

अर्जुन म्हणाला

हृषीकेशा, ऐकून तुझ्या कीर्तीस | आनंद होतो साऱ्या जगास || राक्षस भिऊन धावती सर्व दिशांस | सारे सिद्ध नमन करती || अ. ११, ओ. ३६ ||

का करू नये त्यांनी नमन तुम्हास | ब्रह्मदेवाहून श्रेष्ठ आदिकर्त्यास || तुम्ही अनंत, देवेश, जगन्निवास | अक्षर, सत् आणि असत् च्या पलीकडे || अ.११, ओ.३७||

तुम्ही पुराणपुरुष, देव आद्य | या विश्वास परम आश्रय || जाणते आणि जाणण्यास योग्य | व्यापिले विश्व अनंतरूपाने || अ.११, ओ.३८||

तुम्ही वायू, यम, अग्नी, शशांक आणि वरुण | तुम्ही प्रजापती, पितामह महान || तुम्हास सहस्रवार नमन | पुन्हा पुन्हा नमस्कार असो || अ.११, ओ.३९||

नमस्कार तुला पुढून आणि पाठून | सर्व बाजूंनी तुला नमन || अनंतवीर्य आणि अमितविक्रम असे तुझे महिमान | व्यापतोस सर्व म्हणून सर्व तूच || अ. ११, ओ.४०||

अनादराने जे बोललो तुला मित्र मानून | `हे कृष्णा, हे यादवा, हे मित्रा' असे केले संबोधन ||तुझा महिमा न जाणून | मी तुला चुकीने किंवा प्रेमाने || अ.११, ओ.४१||

अपमान केला तुझा थट्टामस्करीत | असता फिरत, निजत, बसत किंवा भोजन करीत || अच्युता, तुझ्यासमोर किंवा एकांतात | त्या सर्वांची मला क्षमा कर || अ. ११, ओ.४२||

तू पिता या चराचराचा | आहेस श्रेष्ठ गुरू त्याचा ||त्रैलोक्यात नाही कुणी तुझ्या बरोबरीचा  | मग श्रेष्ठ कसा असेल || अ.११, ओ. ४३||

तेव्हा करून साष्टांग नमन | पूजनीय तुम्हास प्रार्थितो,  ‘होऊन प्रसन्न || करावे माझे अपराध सहन | जसे पित्याने पुत्राचे, मित्राने मित्राचे आणि प्रियकराने प्रियेचे’ || अ.११, ओ.४४||

पूर्वी न पाहिलेले तुझे रूप पाहून | झालो आनंदित तरी व्यथित आहे माझे मन || तेव्हा तुझ्या नेहमीच्या रूपात दे दर्शन | देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न होऊन || अ.११, ओ.४५||

किरीट, गदा आणि चक्र धारण केलेल्या | तुझ्या रूपास इच्छितो पाहण्या || दर्शन दे चतुर्भुज रूपातच त्या | हे सहस्रबाहो, विश्वमूर्ते || अ. ११, ओ. ४६||

श्रीभगवान म्हणाले

अर्जुना, मी प्रसन्न  होऊन | आत्मयोगाने दिले माझ्या परम रूपाचे दर्शन || पूर्वी कुणी न पाहिले तुझ्यावाचून | हे तेजोमय अनंत आद्य विश्व || अ. ११, ओ. ४७||

न वेदयज्ञाने, न अध्ययनाने, न दानाने | न क्रियाकर्माने, न उग्र तपाने || मनुष्यलोकात अन्य कुणाला हे रूप पाहणे | शक्य नाही कुरुप्रवीरा || अ.११, ओ.४८||

माझे असे घोर रूप पाहून | नको  होऊस व्यथित किंवा भ्रांतमन || पहा प्रसन्न चित्ताने भयमुक्त होऊन | पूर्वीचेच माझे रूप || अ.११, ओ.४९||

संजय म्हणाला

असे बोलून अर्जुनास | भ्यालेल्या त्यास || दाखवून स्वत:च्या पूर्वीच्या सौम्य रूपास | वासुदेवाने आश्वासित केले || अ.११, ओ.५०||

अर्जुन म्हणाला 

जनार्दना, तुझ्या | सौम्य मानवी रूपास पाहुनिया || पूर्वस्थितीस येऊनिया | माझे मन स्थिर झाले || अ.११, ओ.५१||

श्रीभगवान म्हणाले 

माझ्या ज्या रूपास | आता तू पाहिलेस || इच्छा असते देवांस | रूप ते पाहण्याची || अ.११, ओ.५२||

न वेदाभ्यासाने, न तपाने | न दानाने, न यज्ञाने ||शक्य आहे माझे हे रूप पाहणे | जे पाहिलेस तू || अ.११, ओ.५३||

परंतपा, याप्रमाणे | शक्य आहे मला पाहणे ||जाणणे आणि तत्त्वतः माझ्यात प्रवेश करणे | केवळ अनन्य भक्तीने || अ. ११, ओ. ५४||

मला परमश्रेष्ठ मानणारा माझा भक्त | जो कर्मे माझ्यासाठी करतो, आहे सर्वसंगपरित्यक्त ||वैरहीन आहे सर्व भूतांप्रत | तो मलाच मिळतो पांडवा || अ.११, ओ.५५||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘विश्वरूपदर्शनयोग ’ नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला

                  || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Our Earth and Us


We have been reading and hearing a lot about climate change, environmental protection, etc. lately. Protecting the environment is the responsibility of all of us and it is very important for us all to work together for this. But have you ever wondered how to explain this to children?

Then here is Mr. Paritosh Tirodkar to help you with his new book. Its name is 'The world is melting-how to talk to kids about climate change'. Let's see what the author says.

1. What does your kid think about the climate change?

Your kid is an observant person. He notices changes in the weather and asks questions like, "Why has it been so hot lately? How come it hasn't rained yet?"

2. Explain climate change in simple terms

Your kid is asking a question, which means he is thinking about the topic.

So first of all, listen to his question carefully. This will help you understand what he is trying to say.

Your kid does not need to know the entire science of climate change. Explain it to your kid according to his age.

If your child is 3-6 years old, explain it to him through interesting stories.

If your child is 7-10 years old, he knows a lot. Explain to him what is causing climate change.

For a child aged 11-14, you can go into more depth on this topic and explain how climate change is affecting the world.

Explain climate change not as a crisis, but as a cause of concern. Your answer does not need to be perfect. Do not over-explain or give scary statistics.

Don't scare your child away. Avoid answers like 'It's all finished now. Nobody can do anything.   You can  say, 'Many people are working to find a way out of this situation. We can also work.'

Encourage your kid to ask more questions.

Now, if your kid asks you what we can do to protect the environment, you can suggest simple solutions.

3. Eco-friendly habits

It is important to inculcate good habits at home because kids imitate what they see. Simple habits like turning off the tap while brushing their teeth, turning off the lights when leaving the room can make a big impact.

If you give your kid more respect, like, 'From today you are the light checker, you are the water manager', then he will be even more motivated. You can implement some activities at home, like,  eco-friendly Sunday, garbage-free Tuesday. This will create an eco-friendly atmosphere at home.

We have many festivals like Holi, Ganeshotsav, Diwali. On the occasion of such festivals, use eco-friendly colors, Ganesh idols, etc. 

Reduce food waste, start a compost bin, turn off lights, fans, and appliances when not in use.

You can teach your kid things like nature journaling, emotion cards, etc., based on his interests.

Preaching, nagging, or guilt-tripping rarely brings about change. Instead, model your behavior. So when your kid observes you reusing old bags or choosing local, plant-based food, he will look to you as a role model and try to do the same.

4. Respect for Nature and Animals

When your kid enjoys observing a flower without picking it or helps a stray animal without being afraid, give him a pat on the back.

5. Bigger Problems

Problems like pollution, deforestation are bigger. So if your kid asks about them, keep your explanation simple. Convince him that there is a solution to these too.

6. Teach your kid to trust the environment even in a busy, digital world

How is it possible to teach your kid to trust the environment in today's fast-paced, noisy, screen-filled world? You can try this. Use the digital media to gain knowledge about the environment. For example, when you are in the car, you can listen to podcasts about the environment or chat about the environment. You can watch documentaries on the topic of the environment, play games.

7. Use media like stories, movies, and their heroes 

Kids love hero worship. They live their lives believing themselves to be heroes. Now many such climate heroes or warriors have been popularized through comics and movies. There are many movies on the subject of environment. So let kids read such literature or watch such movies.

 8. The importance of school, friends, and community

Your kid's world doesn't stop at home. It extends to school hallways, playgrounds, birthday parties, and WhatsApp groups. You can promote green projects in schools. You can arrange get-togethers with other friends to promote eco-friendly ideas. Keep birthday parties in a way that produces minimal waste.

9. My kid is not listening, what should I do?

If you feel that your kid is not listening to you, you need to establish more emotional connection with him. You should spend more time with your kid. Praise him for the things he is doing, so that he will be encouraged to do more.

10. Climate Optimism:

Climate optimism is the belief that even though things are serious, people can and are making a difference. Teach kids that they too can make a difference. So, highlight to kids what is effective, such as increased use of solar energy for energy needs, awareness about planting trees.

11. Protecting the Earth:

From all this discussion, you must have realized that protecting the Earth is everyone's responsibility and just saving the Earth from disasters is not enough. It does not require perfect effort to fulfill this responsibility. Even imperfect efforts can have their effect. Let your kid know that what he is doing to protect the Earth is a lot. Your kid is making a difference in the Earth, shaping the Earth - with love and hope. This is all the Earth expects from us.

About the book:

This book tells us a lot about environmental protection. The author's focus is on taking action rather than insisting on perfection. There are relevant quotations throughout the book. The language is very simple and engaging. The book is easy to read and you don't know when you start reading the book and when you finish. The practical and innovative tips in the book make the book an activity or workbook. The book is inspiring and worth keeping in a collection and giving as a gift. The book is useful for parents and teachers to guide children on the environmental issues.

Number of pages: 92.

The book is available on Amazon.

About the Author:
               
Mr. Paritosh Tirodkar 

The author of this book, Mr. Paritosh Tirodkar, has obtained a Masters degree in Finance from Australia.  

Mr. Tirodkar has over 12 years of experience working in the fields of Finance and Audit in Canada, Australia, UK and India. Mr. Tirodkar has worked with the renowned institutions like TD Bank, Royal Bank of Canada, UBS, Deutsche Bank and Morgan Stanley. 

Environment is a topic close to Mr. Tirodkar’s heart.         

Disclaimer:

This is a blog post written on the book 'The World is Melting-How to Talk to Kids about Climate Change' written by Mr. Paritosh Tirodkar. The author of the blog does not claim any copyright on the book. The copyright lies with the author/publisher. The references in the book and the discussion of its content are for educational and entertainment purposes only.

-Blog post by Dr Hemant Junnarkar

Blog post © Dr Hemant Junnarkar,

All rights reserved



  











 














   

Wednesday, July 30, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०-विभूतियोग

श्रीभगवान म्हणाले

हे महाबाहो, पुन्हा कर श्रवण । माझे हे परम वचन ।। साधण्या तुझे कल्याण । सांगतो मी तुला ।। १ ।।

माझी उत्पत्ती झाली कोठून । जाणती न महर्षी, न सुरगण ।। कारण उत्पत्ती माझ्यापासून I झाली त्यांची ।। अ. १०, श्लो.२।।

मी अनादि, जन्मविहीन । मी लोकांचा ईश्वर महान ।। आहे ज्या मनुष्यास ज्ञान । तो पापांतून मुक्त होतो ।। अ.१०, श्लो. ३।

संमोहाचा अभाव, बुद्धी आणि ज्ञान । क्षमा, सत्य, शांती आणि दमन ।। सुख, दुःख, जन्म आणि मरण । भय आणि निर्भयता- ।। अ.१०, श्लो. ४ ।।

-अहिंसा, समता, समाधान । तप, यश-अपयश, दान ।। असे भूतांचे भाव विभिन्न । माझ्यापासून उद्भवती ।। अ. १० श्लो. ५ ।।

सप्तर्षी माझ्या मनातून । त्याआधीचे चार ऋषी (सनकादिक) आणि मनू (स्वायंभुव) झाले उत्पन्न ।। आणि त्यांच्यापासून । पुढे प्रसवली प्रजा ।। अ.१०, श्लो. ६।।

(सप्तर्षी ७, सनकादिक ४, स्वायंभुव ३=एकूण १४)

माझा योग आणि विभूती । तत्वतः जे जाणती ।।ते निस्संशय जोडले जाती । स्थिर योगात ।। अ.१०, ओ. ७ ।।

माझ्यापासून सर्वांची उत्पत्ती । माझ्यामुळे सर्वांना गती ।। भावसमन्वित ज्ञानी हे जाणती । आणि भजती मला ।। अ. १०, श्लो. ८।।

चित्त आणि प्राण माझ्यात ठेवून । परस्परांस माझा बोध करून ।। माझ्याविषयी कथन करून । माझ्या ठायी ते संतोषती आणि रमती ।। अ.१०, श्लो. ९ ।।

ते माझ्यात सतत युक्त होती । प्रीतिपूर्वक मला भजती ।। आणि माझ्याकडे येती । माझ्याच बुद्धियोगाने ।। अ.१०, श्लो.१०।।

त्यांच्या आत्मभावात राहून । ज्ञानदीप उजळून ।।अज्ञानतमाचा नाश करून । मी कृपा त्यांच्यावर करतो ।। अ. १०, श्लो. ११।।

अर्जुन म्हणाला

तू दिव्य पुरुष, शाश्वत, । आदिदेव प्रभू, जन्मरहित ।। परम, पुनीत । परब्रह्म, परधाम- ।। अ. १०, श्लो. १२ ।।

-असे म्हणती सारे ऋषी । थोर नारद देवर्षी- ।। -असित, देवल आणि व्यास महर्षी । तूही तेच सांगतोस ।। अ. १०, ओ. १३।।

केशवा, तू जे सांगतोस । मी ठेवतो त्यावर विश्वास ।। भगवंता, तुझ्या स्वरूपास । जाणती देव न दानव ।। अ. १०, ओ. १४।।

तू भूतभावन, ईश भूतांचा । तू देवांचा देव, स्वामी जगाचा ।। थांग तुझ्या स्वरूपाचा । पुरुषोत्तमा, तुलाच आहे ।। अ. १०, ओ. १५।।

हा लोक तू व्यापला आहेस । घेऊन विविध विभूतींच्या स्वरूपास ।। त्या सर्व सांगण्यास । तूच आहे समर्थ ।। अ. १०, ओ. १६।।

हे योगेश्वरा, सदैव करीत तुझे चिंतन । कसे घेऊ तुला जाणून ।। भगवंता, तुझ्या कुठल्या भावांतून । चिंतनीय आहेस तू ।। अ. १०, ओ. १७।।

तुझे अमृतासारखे भाषण ऐकून I होत नाही समाधान II जनार्दना, विस्ताराने कर कथन I तुझा योग  आणि तुझ्या विभूती II अ. १०, ओ. १८ II

श्रीभगवान म्हणाले

माझ्या दिव्य विभूती फार विस्तृत । नाही त्यांना अंत ।। तरी तुला थोडक्यात । सांगतो कुरुश्रेष्ठा ।। अ. १०, ओ. १९।।

मी भूतांच्या हृदयात | आहे आत्म्याच्या रूपात ||भूतांचा आदि, मध्य आणि अंत | मीच आहे गुडाकेशा || अ. १०, ओ.२०||

आदित्यांमध्ये विष्णू मी | ज्योतींमध्ये तेजस्वी सूर्य मी || मरुतांमध्ये मरीची मी | मी चंद्र नक्षत्रांत || अ. १०, ओ.२१||

मी सामवेद वेदांमध्ये | मी वासव देवांमध्ये || मी मन इंद्रियांमध्ये | भूतांतील चेतना मी || अ.१०, ओ.२२|| (वासव= इंद्र)

रुद्रांमध्ये शंकर मी | यक्षराक्षसांमध्ये वित्तेश मी ||वसूंमध्ये अग्नी मी | पर्वतांमध्ये मी मेरुपर्वत || अ.१०, ओ.२३||

(वित्तेश=कुबेर)

मी बृहस्पती, पुरोहितांत I पार्था, घे ध्यानात II स्कंद मी सेनानींत I जलाशयांत मी सागर || अ.१०, ओ.२४||

महर्षींमध्ये भृगू ऋषी मी | वाणीत ॐकार मी ||यज्ञांत जपयज्ञ मी | स्थावरांत मी हिमालय || अ. १०, ओ.२५||

वृक्षांमध्ये पिंपळ मी | देवर्षींमध्ये नारद मी ||गंधर्वांमध्ये चित्ररथ मी | सिद्धांमध्ये कपिल मुनी || अ. १०, ओ. २६||

उच्चै:श्रवा मी अश्वांत | जो उद्भवला समुद्रमंथनात || गजेन्द्रांमध्ये मी ऐरावत | मनुष्यांमध्ये मी राजा || अ.१०, ओ.२७||

आयुधांमध्ये वज्र मी | धेनूंमध्ये कामधेनू मी ||

प्रजनन करणारा काम मी | सर्पांमध्ये मी वासुकी || अ.१०, ओ.२८||

नागांमध्ये मी अनंत | वरुण मी जलचरांत || अर्यमा मी पितरांत | संयम करणाऱ्यांत मी यम || अ.१०, ओ. २९||

प्रह्लाद मी दैत्यांमध्ये | काल मी नियमन करणाऱ्यांमध्ये || सिंह मी पशूंमध्ये | पक्ष्यांमध्ये गरुड मी || अ.१०, ओ.३०||

पावन करणाऱ्यांत पवन मी | शस्त्रधारकांत राम मी || मत्स्यांमध्ये मकर मी | स्रोतांमध्ये मी जाह्नवी || अ.१०, ओ.३१||

सृष्टीची मी सुरुवात | तसेच मध्य आणि अंत ||अध्यात्मविद्या मी विद्यांत | वादांचा मी निष्कर्ष || अ.१०, ओ.३२||

अक्षरांत ‘अ’ हे अक्षर मी | समासांमध्ये द्वंद्व समास मी || अक्षय काल मी | सृष्टिकर्ता मी ब्रह्मदेव || अ.१०, ओ.३३||

मी मृत्यू, ज्याने सारे नाश पावती | भविष्यातील गोष्टींची मी उत्पत्ती || नारींमध्ये मी श्री, वाणी, कीर्ती | स्मृती, मेधा, श्रुती आणि क्षमा || अ. १०, ओ.३४||

बृहत्साम मी  सामांमध्ये | गायत्री मी छंदांमध्ये ||मार्गशीर्ष मी महिन्यांमध्ये | ऋतूंमध्ये मी वसंत || अ.१०, ओ.३५||

कपट करणाऱ्यांचे द्यूत मी | तेजस्वी लोकांचे तेज मी || जय मी, साहस मी | सात्त्विकांचे मी सत्त्व || अ.१०, ओ.३६||

वासुदेव मी वृष्णींमध्ये | धनंजय मी पांडवांमध्ये ||व्यास मी मुनींमध्ये | कवींमध्ये मी उशना कवी || अ.१०, ओ.३७||

शासक देतात ती शिक्षा मी | जय इच्छिणाऱ्यांची नीती मी || गुह्यांपैकी मौन मी | ज्ञानवानांचे मी ज्ञान || अ.१०, ओ.३८ ||

बीज जे सर्व भूतांत | ते मीच अर्जुना, घे ध्यानात || माझे अस्तित्व नाही ज्यात | असा चराचर कुणी नाही || अ. १०, ओ.३९||

परंतपा, तुला सांगितल्या | अशा अंत नसणाऱ्या   || दिव्य विभूती माझ्या | त्यांचा विस्तार कळण्यास || अ. १०, ओ.४०||

ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी | श्री आणि ऊर्जा येते दिसुनी || त्या  त्या  उपजल्या माझ्या तेजाच्या अंशातुनी | ध्यानात घे तू || अ. १०, ओ.४१||

अर्जुना, हे ज्ञान जरी मिळवले | तरी त्याने काय साधले? || संपूर्ण जग मी व्यापले | माझ्या एका अंशाने  || अ.१०, ओ.४२||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘विभूतियोग’ नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला.

               || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

शिवगीता - अध्याय ५- रामास वरप्रदान

सूत म्हणाला, 

मग तेथे प्रगटला सोन्याचा रथ भव्य | ज्यास जडविली रत्ने दिव्य, | त्या रत्नांच्या किरणांनी प्रकाशमय | झाल्या दशदिशा. || अ.५, ओ.१ || 

रथ मोत्याच्या तोरणांनी सजविला | शेकडो शुभ्र छतांनी झाकला.  | चाकांस मात्र चिखल लागला | नदीच्या काठाने आल्याने || अ.५, ओ.२ ||

सोन्याचे लगाम लावलेले |  घोडे रथास जोडले |  रथास मौक्तिकयुक्त छताने सजविले | रथावर शोभे वृषभयुक्त ध्वज || अ. ५, ओ. ३ ||

रथास गज जोडले मत्त  | रथ रेशमी आसनाने युक्त | आणि केला सुशोभित | पारिजातकाच्या फुलांनी || अ.५, ओ. ४ ||

मृगनाभीतील कस्तूरीचे रथास विलेपन  | कर्पूर आणि अगरु (चंदन)  यांच्या धूपातून | दरवळणाऱ्या सुगंधाने आकृष्ट होऊन | भ्रमर जमती रथाभोवती. || अ‌. ५, ओ. ५ || 

रथाचा ध्वनी  प्रलयकाळच्या मेघांसमान |  रथ नाना वाद्यांनी  संपन्न.  |  वीणा वेणु इत्यादि वाद्यांचे करती वादन |   गण किन्नरींचे || अ.५, ओ.६ ||

पाहून तो रथ मनोहर |  वृषभावरून उतरून शंकर | रथातील रेशमी आसनावर | पार्वतीसह बैसला || अ. ५, ओ. ७ ||

देवांगनांच्या ओवाळण्यानें |  श्वेतचामरें वारण्यानें  |  दिव्य पंख्यांच्या वार्‍याने | नीललोहित (=शंकर)   आनंदित झाला || अ. ५, ओ. ८ ||

(देवांगनांच्या) कंकणांच्या किणकिणाटाने |  नूपुरांच्या मंजुळ ध्वनीनें | वीणा, वेणु ह्यांच्या वादनानें | शुक व मयूर यांच्या शब्दांनीं- || अ. ५, ओ. ९|| 

-शुभ्र पारव्यांच्या किलबिलाटाने |  त्रैलोक्य व्यापले पूर्णपणे.  | नाग शोभती फणा उभारल्याने.  | पाहून त्यांना मयूर || अ.५, ओ.१० || 

-पिसाऱ्यावरील कोट्यवधी चंद्र दाखवून | करती नर्तन. | मग वृषभध्वजाने (=वृषभावर आरूढ झालेला, शिव) उठवून |  नमन करणाऱ्या रामाला-  || अ.५, ओ.११ ||

-प्रेमाने अतिशय | आणले रथात  दिव्य. | मग कमंडलूतील निरामय | जलाने स्वतः आचमन करून- || अ.५, ओ.१२ ||

रामाला आचमन करविले, | प्रेमाने अंकावर बसविले | आणि त्याला दिले | दिव्य धनुष्य व अक्षय बाणभाता. || अ.५, ओ.१३ ||

दिले शिवाय |  महापाशुपतास्र दिव्य. | मग प्रेमाने अतिशय |  चंद्रमौली (=शिव) म्हणाला || अ.५, ओ.१४ ||

'हे नृपा, या अस्त्राचे फार सामर्थ्य |  ते नष्ट करील  त्रैलोक्य  | म्हणून युद्धात सामान्य | ह्याचा प्रयोग करूं नको || अ. ५, ओ. १५ ||

ह्याचा त्रैलोक्यांत  प्रतीकार |  नाहीं कुणी करू शकणार | म्हणून जेव्हा बेतेल  प्राणावर | तेव्हाच प्रयोग कर याचा || अ. ५, ओ. १६ ||

अन्य कालीं वापरता यास  | ते नष्ट करील जगास.' | नंतर  देवांस आणि लोकपालांस |  महेश्वराने बोलाविले  || अ.५, ओ.१७ ||

आणि तो परमप्रीत (=शिव) म्हणाला,   |  ''देव हो, तुम्हीही आपली अस्त्रे द्या राघवाला | म्हणजे  तो मारील रावणाला |  त्या अस्त्रांनी.  || अ. ५, ओ. १८ ||

मी रावणाला वर दिला, |  "देवांकडून  मृत्यू नाहीं तुला" | म्हणून घ्या वानरजन्माला | रामासाठी युद्धात. || अ.५, ओ.१९ ||

साह्य केल्यास रामास | सुख लाभेल तुम्हास.' | देवांनी वंद्य मानले शिवाच्या आज्ञेस |  जोडून हात || अ.५, ओ.२०||

वंदून शंभूचे चरण | त्यांनी रामास केली अस्त्रे प्रदान. | दिले दैत्यारीने (=विष्णूने) नारायणास्त्र महान | तर पुरंदराने (=इंद्राने) इंद्रास्त्र || अ.५, ओ.२१||

ब्रह्मदेवाने ब्रह्मदंडास्त्र | धनंजयाने (=अर्जुनाने) आग्नेयास्त्र | यमाने याम्यास्त्र | रक्षोराजाने (=राक्षसांच्या राजाने ) मोहास्त्र दिले || अ.५, श्लो.२२ ||

वरुणाने वारुणास्त्र | प्रभंजनाने (=वायूने) वाय्वास्त्र  | कुबेराने कौबेरास्त्र | तर ईशानाने रौद्रास्त्र दिले || अ. ५, ओ.२३ ||

सूर्यानें सौरास्त्र | सोमाने सोमास्त्र | विश्वेदेवांनीं पार्वतास्त्र |  आणि वसूंनीं वासवास्त्र दिले || अ.५, ओ.२४ || 

अशी ही अस्त्रे प्राप्त करून |  दशरथात्मज राम  संतुष्ट होऊन |   नम्रतेने हात जोडून | भक्तिपूर्वक म्हणाला, || अ. ५, ओ. २५ ||

श्रीराम म्हणाला, 

'हे भगवान, ओलांडणे क्षारसमुद्रास |  शक्य नाही मनुष्यांस. | जिंकणे कठीण देवदानवांस | त्या  समुद्रातील लंकादुर्गास. || अ. ५, ओ.२६ ||

लंकेमध्ये आहेत | जितेंद्रिय आणि शिवभक्त | वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनात रत |  कोट्यवधी राक्षस || अ. ५, ओ. २७ ||

त्यांना अनेक माया अवगत | ते आहेत अग्निहोत्री आणि बुद्धिवंत | केवळ भाऊ (लक्ष्मण) माझ्यासोबत | कसा जिंकू मी राक्षसांना ? || अ.५, ओ.२८||

महादेव म्हणाला-

रामा, वधण्यास राक्षस आणि रावण |   योग्य आहे  हाच क्षण | आला आहे कारण | काळ त्यांच्या विनाशाचा || अ. ५, ओ. २९ ||

ते होऊन अधर्मास प्रवृत्त | देव-ब्राह्मणांना पीडा देतात | त्यामुळे हे सुव्रता, जवळ आला आहे अंत | त्यांच्या आयुष्य आणि वैभवाचा || अ.५, ओ.३० ||

राजस्रीच्या कामनेने आसक्त | अशा रावणास तू वधशील रणात | शत्रूस पापासक्त  | मारणे आहे सुकर || अ.५, ओ.३१ || 

शत्रू अधर्मात रत | असतो भाग्यानेच मिळत. | पारंगत धर्मशास्त्रात | किंवा वेदाध्ययनात तत्पर- || अ. ५, ओ.३२||

-होता विनाशकाल प्राप्त | होतो धर्ममार्गापासून च्युत. | जो पापी पीडतो सतत | देवतांना, ब्राह्मणांना आणि ऋषींना - || अ.५, ओ.३३||

-त्याचा नाश असे निश्चित. | रामा, किष्किंधानगरात | उत्पन्न झाले आहेत |  देवांच्या अंशापासून-  || अ. ५, ओ. ३४ ||

-शत्रूला जिंकण्यास दुष्कर | बलाढ्य असे वानर. | ओलांडण्यास सागर | ते साहाय्य तुला करतील || अ. ५, ओ. ३५ ||

वानरांकडून समुद्रावर घे सेतू बांधून | म्हणजे वानर  जातील त्यावरून  |  मग परिवारासहित रावणाचा वध करून | आपल्या प्रियेला आण || अ. ५, ओ. ३६ ||

युद्धात शस्त्रांनी जय मिळत असेल जर | वापरू नयेत अस्त्रे तर. | नि:शस्त्रांवर, अल्प शस्त्रे असणारांवर |  किंवा पलायन करणारांवर- || अ.५, ओ. ३७ ||

-जो प्रयोग करतो दिव्यास्त्रांचा | नाश होतो त्याचा.| मी आहे निर्माता जगाचा | यापलिकडे काय सांगू? || अ.५, ओ.३८ ||

मीच  रक्षणकर्ता जगाचा | मीच नाश करतो त्याचा | हे महीपते, मी मृत्यू या जगताचा  | आणि मीच मृत्यू मृत्यूचा || अ.५, ओ.३९||

व्यापले मी सर्व जगास | आणि चराचरास | हे युद्धोत्सुक राक्षस | पडलेत माझ्या मुखात || अ. ५, ओ. ४० ||

तू होऊन केवळ निमित्त | मिळव कीर्ती रणात || अ.५, ओ.४१||

अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'रामास वरप्रदान नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला.

🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏🪔 🌺 

शब्दार्थ व टीपा:

किर्मीरित" = झगमगलेला, तेजाने व्यापलेला, चमकदार लहरींनी भरलेला. (किर्मीर नामापासून नामधातू) (श्लो.१)

आढ्य (वि.)=युक्त (मूळ शब्द आध्य) संधिनियमामुळे 

आध्य" → "आढ्य" ) काही वेळा ध्वनिग्राह्यता आणि उच्चारसुलभतेसाठी काही व्यंजनांत किंवा स्वरांत बदल होतो (श्लो.२)

श्लो. ३

खलीन = घोड्यांच्या तोंडाला लावले जाणारे लोखंडी लगाम (bridle)

शुक्ता = शंख किंवा मुक्तेप्रमाणे चमकणारे (किंवा शंखमुक्तेपासून बनवलेले) 

श्लो.४

वारणिका=हत्तींचा समूह; पट्ट=रेशीम; तल्प=आसन; अभिरञ्चित= सुशोभित केलेला (अभि+ रञ्च् ( गण १, आ.प.)

स्वन (ना.पुं) = ध्वनी, आवाज (श्लो.६)

श्लो.९ ते ११

निध्वान (ना.पुं.)=ध्वनी; मञ्जीर (ना. नपुं.)=नूपुर; उन्निद्र (वि.)=उभारलेले, फणिन्= सर्प

श्लो.१२

आनिनाय =आणले (आ+नी, परोक्ष भूतकाळ)

 यत्नत: = प्रयत्नपूर्वक. परंतु येथे या शब्दाचा अर्थ "पूर्ण जागरूकतेने, मनपूर्वक, शुद्ध श्रद्धेने व शास्त्रशुद्ध रीतीने" असा घेतला पाहिजे.

श्लो.२२ 

या श्लोकातील देवतांचे अनेक प्रकारे अर्थ काढता येतील. येथे सर्वसामान्य अर्थ दिला आहे.

धनंजयाने आग्नेयास्त्र दिले = अर्जुनाने खांडववन जाळले तेव्हा अग्नीने त्यास आग्नेयास्त्र दिले होते. ते त्याने येथे दिले असा अर्थ होऊ शकतो.

रक्षोराजाने मोहास्त्र दिले = येथे रक्षोराज, म्हणजे राक्षसांचा राजा म्हणजे रावण असा अर्थ होतो. पण स्वतःच्या वधासाठी रावण अस्त्र कसा देईल, म्हणून काही ठिकाणी विभीषण असा अर्थ दिला आहे. राक्षसांचा राजा निऋती असा अर्थही काही ठिकाणी दिला आहे. निऋती हा पश्चिम दिशेचा दिक्पाल असून त्यालासुद्धा राक्षसांचा राजा मानले आहे. तो राक्षसांचा राजा असल्याने त्याने मोहास्त्र किंवा मोहनास्त्र म्हणजे मोह किंवा भ्रम उत्पन्न करणारे अस्त्र दिले.

रामानंतर होऊन गेलेला अर्जुन किंवा रामास नंतर भेटलेला विभीषण येथे कसा येऊ शकेल. याचे उत्तर असे होऊ शकते की शिवगीता हा इतिहास किंवा संदर्भग्रंथ नसून एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. तसेच रामायण , महाभारतातील व्यक्तिरेखांस सार्वकालिक किंवा प्रतीकात्मक स्वरूप आहे.

श्लो.२३

या श्लोकात ईशानाने  रौद्रास्त्र दिले असे म्हटले आहे. "ईशान" हे शिवाचे उत्तर-पूर्व दिशेचे रूप असून, ते विशेषतः ज्ञान, आग्नी तत्त्व आणि तपस्येचे प्रतिनिधी मानले जाते.

रौद्रास्त्र: रौद्र शक्ती, कोपयुक्त विध्वंसासाठी वापरले जाणारे, अग्नी तत्त्वाशी संबंधित.

अथवा किं बहूक्तेन = किंवा फार काय सांगू? (श्लो.३८)

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, July 29, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

श्रीभगवान म्हणाले

तू आहेस असूयाविहीन | सांगतो तुला म्हणून ||अत्यंत गूढ विज्ञानासहित ज्ञान | जे अशुभातून मुक्त करील || अ.९, ओ.१||

ते उत्तम आणि पवित्र ज्ञान I विद्या आणि गुपितांच्या राजाचे त्यास स्थान || ज्याचे प्रत्यक्ष आचरण | धर्मकारक, सुखदायक आणि अविनाशी || अ.९, ओ.२||

परंतपा, असे जन आहेत | जे या धर्मावर विश्वास ठेवीत नाहीत || ते माझ्याकडे न येता जाती परत | मृत्यू आणि संसाराच्या मार्गावर || अ.९, ओ.३||

मी व्यापले सर्व जगत | रूपाने माझ्या अव्यक्त ||सर्व भूते आहेत माझ्यात | मी त्यांच्यात नाही || अ.९, ओ.४||

भूतेही  नाहीत माझ्या अंतरी | पहा माझा योग ईश्वरी || मी भूतांस उत्पन्न करून पोषण करी | तरी भूतांत नाही मी || अ.९, ओ.५||

सर्वत्र फिरणारा वात | जसा राहतो आकाशात ||तशी सर्व भूते माझ्यात | राहती हे जाण || अ.९, ओ.६||

कल्पाचा होता अंत | भूते प्रवेशती माझ्या प्रकृतीत || कल्पाची होता सुरुवात | मी निर्मितो पुन्हा त्यांना || अ.९, ओ.७||

भूते प्रकृतीच्या अधीन | मी पुन्हा पुन्हा करतो निर्माण || माझ्या प्रकृतीतून | सर्व भूतांना || अ. ९, ओ.८||

धनंजया, कर्मे ती | मला न बांधती || कारण माझी आसक्ती | नाही त्या कर्मांत || अ.९, ओ.९||

माझ्या अध्यक्षतेत | प्रकृती उपजते चराचरासहित || म्हणूनच हे जग कार्यान्वित | राहते धनंजया  || अ.९, ओ.१०||

मी जगाचा महान ईश्वर असून | करता मनुष्यदेह धारण || माझा परम भाव न जाणता मला लेखती न्यून | मूर्ख लोक || अ. ९, ओ.११||

मोहविणाऱ्या असुरी आणि राक्षसी प्रकृतीचा आश्रय घेऊन | सर्व आशा, कर्मे आणि ज्ञान || बसतात गमावून | जन बुद्धिभ्रष्ट  || अ.९, ओ.१२||

पार्था, दैवी प्रकृतीच्या आश्रयात I जे महात्मे राहतात II ते अनन्य भावाने मला भजतात I जाणून मला भूतांचे अव्यय, आदिस्थान II अ. ९, ओ. १३ II

ते राहून प्रयत्नशील, दृढव्रत, नित्ययुक्त I सतत माझे कीर्तन करतात  II मला नमस्कार करतात I भक्तीने करतात माझी उपासना IIअ. ९, ओ.१४II

आणि दुसरे ज्ञानयज्ञात I एकत्वात आणि विभिन्नतेत II उपासना करतात I माझ्या बहुविध विश्वरूपाची II अ. ९,ओ.१५II

यज्ञ म्हणजे मीच आहे I यज्ञातील क्रतु, स्वधा, औषधी मीच  आहे II मंत्र आणि आज्य मीच आहे I आहे मीच  अग्नी आणि आहुती II अ.९, ओ.१६II 

माता-पिता, पितामह मी या जगास I करतो मी जगाच्या पोषणास II पवित्र मी, योग्य जाणण्यास I मी ॐकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद II १७ II 

मी सर्वांचा प्रभू, सर्वांची गती, पोसतो सर्वांस I साक्षी, निवास, योग्य शरण जाण्यास II स्थान, निधान, करतो उत्पत्ति-प्रलयास I आहे मी अव्यय बीज II १८ II 

मी करतो उष्णता निर्माण I माझ्यामुळे येई पाऊस, होई अवर्षण II मी मृत्यू आणि अमृत जाण I अर्जुना, मीच सत् आणि असत् II १९ II  

काही जन तीन वेदांचे ज्ञानी | सोमरस पिणारे, मुक्त पापातुनी || यज्ञाने माझ्याकडून स्वर्ग मिळवुनी | दिव्य भोग भोगती || अ.९, श्लो.२०||

असे हे कामेच्छुक, तीन वेदांचा धर्म आचरती | विशाल स्वर्गलोक उपभोगती || पुण्य संपता मृत्युलोकी येती | करती अशा येरझारा || अ.९, ओ. २१||

अनन्य भावाने करीत चिंतनास | जे करती माझ्या उपासनेस || त्या नित्य अभियुक्तांच्या योगक्षेमास | मी वाहतो || अ. ९, ओ. २२ ||

अन्य देवतांचे भक्त । श्रद्धेने जेव्हा त्या देवतांस पूजितात ।। कौंतेया, तेव्हा खरे मलाच भजतात । जरी न विधिपूर्वक ।। अ. ९, ओ. २३।।

यज्ञांचा भोक्ता आणि प्रभू मी असे । तरी या भक्तांस माझे ज्ञान नसे ।। म्हणून होत असे । पतन त्यांचे ।। अ. ९, ओ. २४।।

देवांचे पूजक देवांकडे जाती I पितरांचे पूजक पितरांकडे जाती II भूतांचे पूजक भूतांकडे जाती I माझे भक्त येती माझ्याकडे ।। अ. ९, ओ. २५।।

पान, फूल, फळ, पाणी जरी कोण । भक्तीने मला करतो अर्पण ।। मी ते करतो ग्रहण । प्रेमपूर्वक ।। अ. ९, ओ. २६ ।।

जे करतोस, खातोस । हवन करतोस, देतोस ।।

ज्याची उपासना करतोस । कौंतेया, ते कर मला अर्पण ।। अ.९, ओ. २७।।

या संन्यासयोगाने युक्त होऊन । कर्मबंधनाच्या शुभ-अशुभ फलांतून ।। विमुक्त तू होऊन । माझ्याकडे येशील ।। अ.९, ओ. २८।।

सर्व भूते समान मला । न कोणी प्रिय वा अप्रिय मला ।। भक्तीने जे भजती मला । मी त्यांच्या ठायी आणि ते माझ्या ठायी ।। अ.९, ओ. २९।।

असूनही कोणी दुराचारी । जर अनन्यभावाने माझी भक्ती करी ।।  मानावा तो साधू तरी । कारण सुनिश्चित बुद्धी त्याची ।। अ.९, ओ. ३०।।

तो लवकरच धर्मात्मा होतो । शाश्वत शांती मिळवतो ।। माझा भक्त नाश न पावतो । लक्षात ठेव कौंतेया ।। अ.९, ओ. ३१।।

माझ्या आश्रयास जे येती । जरी ते हलक्या योनीतील असती ।। तरी परम शांतीस पावती । असो स्त्री, वैश्य वा शूद्र ।। अ.९, ओ. ३२।।

ब्राह्मण, राजर्षी तसेच पुण्यवान भक्त । परम शांती मिळवतील निश्चित ।। येऊन या अनित्य, दुःखदायक मृत्युलोकात । माझी भक्ती करीत राहा ।। अ.९, ओ. ३३।।

माझा भक्त हो, माझ्या ठायी ठेव मन । नमस्कार मला कर, कर माझे पूजन ।। परायण मला हो, माझ्यात स्वतःस जोडून । माझ्याकडेच येशील ।। अ.९, ओ. ३४।।

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘राजविद्याराजगुह्ययोग’ नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.

🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺 🙏

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved.

Friday, July 25, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग

अर्जुन म्हणाला

काय असे ब्रह्म आणि अध्यात्म | पुरुषोत्तमा, काय असे कर्म ||  अधिभूताचे काय मर्म | अधिदैव कशास म्हणतात || अ.८, ओ.१||

अधियज्ञ काय असे | मधुसूदना, या देहात तो कसा वसे ||  नियत आत्म्यांनी तुला कसे | प्रयाणकाळी जाणावे || अ.८, ओ.२||

श्रीभगवान म्हणाले

परम अविनाशी ते ब्रह्म | स्वभाव म्हणजे अध्यात्म ||  त्या सृष्टिव्यवहारास म्हणती कर्म | ज्यातून उद्भवतो भूतांचा भाव || अ.८, ओ.३||

नश्वर भाव म्हणजे अधिभूत | स्वामी म्हणजे अधिदैवत ||  अधियज्ञ मीच देहात | हे देहधारी श्रेष्ठा || अ.८, ओ.४||

अंतकाळी मला स्मरत | देहातून जो होई मुक्त ||  त्याला माझा भाव होई प्राप्त | यात नाही संशय || अ. ८, ओ.५||

सोडत असता देहाला | जो भाव स्मरतो ज्याला ||  तोच भाव प्राप्त होतो त्याला | नेहमी कौंतेया || अ.८, ओ.६||

मन आणि बुद्धी करून मला अर्पित | सर्व काळात ||  माझे स्मरण करीत | निस्संशय मलाच मिळशील, युद्ध करतानाही || अ.८, ओ.७||

जो योगयुक्त राहून, करतो अभ्यास | दुसरीकडे जाऊ न देता चित्तास ||  परम दिव्य पुरुषाच्या करतो चिंतनास | तो त्या पुरुषासच मिळतो || अ.८, ओ.८||

सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूहून सूक्ष्म आहे | सर्वांचा पालनकर्ता, अचिंत्यरूप आहे || सूर्यासारखा तेजस्वी, अंधाराच्या पलिकडे आहे | दिव्य परम पुरुष || अ.८, ओ.९||

प्रयाणकाळी मन अचल ठेवून |भक्ती आणि योगबलाने  युक्त होऊन ||  भुवयांमध्ये प्राणाची स्थापना करून | दिव्य पुरुषाचे स्मरण करणारा त्यालाच मिळतो || अ.८, ओ.१०||

वेद जाणणारे ज्यास अक्षय म्हणतात | विरक्त यती ज्यात प्रवेशतात ||  ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरतात | ते पद थोडक्यात तुला सांगतो || अ.८, ओ.११||

सर्व द्वारांचा संयम करून | मनाचा हृदयात निरोध करून ||  मस्तकात प्राण स्थापन करून | करीत योगधारणा ||अ.८, ओ.१२||

ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत |  माझे स्मरण करीत ||  देहातून होतो मुक्त | तो जातो परम गतीस || अ.८, ओ.१३||

जो अनन्य बुद्धीने सतत | नित्य राहतो मला स्मरत ||  त्या योग्यास नित्ययुक्त | मी सहज  प्राप्त आहे || अ.८, ओ.१४||

झाल्यावर माझी प्राप्ती | पावल्याने परम गती ||  पुनर्जन्मास न जाती | पुनर्जन्म असे अशाश्वत आणि दु:खाचे आगर || अ.८, ओ.१५||

ब्रह्मभुवनापासून लोक सारे | पुन्हा पुन्हा घेती फेरे ||  येता माझ्यापाशी कौंतेया रे | होई न पुनर्जन्म || अ.८, ओ.१६||

दिवस ब्रह्मदेवाचा | म्हणजे काळ सहस्र युगांचा || तेवढाच असे काळ रात्रीचा | हे ज्ञानी जाणतात || अ.८, ओ.१७||

या दिवसाची होता सुरुवात | अव्यक्त सारे होती व्यक्त ||  रात्र होता लय पावतात | अव्यक्तात त्याच || अ. ८, ओ.१८||

भूतांचा समुदाय एकच तो | पुन्हा पुन्हा आकारास येतो ||  रात्र होता लय पावतो | प्रभवतो दिवस उगवता || अ.८, ओ. १९ ||

परंतु या अव्यक्ताहून | असे दुसरा श्रेष्ठ अव्यक्त भाव सनातन ||  सर्व भूते जरी जाती नाश पावून | तो भाव नाश न पावतो ||अ.८, ओ. २०||

ज्या अव्यक्तास अक्षय म्हणती | तीच असे परम गती ||  जेथे जाऊन परत न येती | तेच माझे परम धाम || अ.८, ओ.२१||

पार्था, श्रेष्ठ पुरुष तो | अनन्य भक्तीने प्राप्त होतो ||  सर्व भूतांस जो अंतरी सामावतो | ज्याने व्यापले हे जग सारे || अ.८, ओ.२२||

देहत्याग करता कुठल्या काळात | योगी पुन्हा जन्म न घेतात || आणि केव्हा जन्म घेतात | तो काळ सांगतो भरतर्षभा || अ.८, ओ.२३||

अग्नी, प्रकाश, शुक्ल पक्ष आणि दिवस | उत्तरायणाचे सहा मास ||  यांत जे ब्रह्मवेत्ते सोडती देहास | ते जाती ब्रह्मपदाला || अ.८, ओ. २४||

धूर, रात्र तसेच कृष्ण पक्षात | दक्षिणायनाच्या सहा महिन्यांत ||  यांत जे योगी देह सोडतात | ते चंद्रलोकास जाऊन परत येती || अ.८, ओ.२५||

शुक्ल आणि कृष्ण गती | जगी शाश्वत मानती ||  पहिल्या गतीने मिळे मुक्ती | परत येती दुसऱ्या गतीने || अ.८, ओ.२६||

जे योगी जाणती या दोन गतींना | मोह न होई त्यांना || याचसाठी अर्जुना | योगयुक्त हो सर्व काळी || अ.८, ओ.२७||

वेदांत, यज्ञांत, तपांत आणि दानांत | जी पुण्यफले सांगितली आहेत ||  त्यांपलिकडे योगी जातात | परम दिव्य अशा स्थानी || अ.८, ओ.२८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘अक्षरब्रह्मयोग’ नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला.

     🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺🙏

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Thursday, July 24, 2025

The Power of Discipline

The Power of Discipline is a book written by Daniel Walter. Everyone wants to become self-disciplined , but does not find it easy. Here this book comes to our help and explains how to master self-discipline. 


1.Self-discipline is a biological process: 

Meaning and nature of discipline: Discipline is the ability to focus on one course of action until that goal has been accomplished. Discipline is about doing what you know you've got to do even when you don't feel like it. 

According to the author self-discipline is a biological process. Self-discipline does not come on its own, but it is to be developed. Childhood is the time when the things are learnt easily , but it is never too late to learn and you can develop self-discipline at any age.

The following points are noteworthy to know about self-discipline:-
1. Self-discipline is a skill you can master if you are willing to work at it.
2. Self-discipline and focus work simultaneously.
3. Will power and self-discipline lose strength when they have been put to work and wear down.
4. The best way to build discipline is to remove yourself from temptation. For example, if you are tempted to unhealthy foods, go for shopping after dinner.
5. For self-discipline, consistency of efforts is very important. Consistency builds momentum and that's how dreams become a reality.
Remember, there is a biological process to discipline, and similarly to any other habit, the brain 🧠 is more programmed to accept it as the norm the more you practise it.

2. The benefits of self-discipline:
Self-discipline-
i. Raises your self-discipline
ii. Helps you build better relationships
iii. Enables you to handle constructive discipline
iv. Enables you to avoid risky behaviours.

3. The status quo bias-why we resist change
We want to maintain the status quo because of the following reasons:-
i. The sunk cost fallacy:- Generally this tendency is called inertia, which means people choose to do nothing and carry on as normal.
ii. Loss Aversion theory:- According to this theory, people don't like losing things.
iii. The fear of regret:- No one wants to make a change and then regret it.
iii. The mere exposure effect:- The more we experience a particular phenomenon, the more we are likely to accept and like it.
To overcome the above limitations, we can undertake a  thought evaluation exercise which is to put your rational decision-making abilities to good use and build the life you want. 

Chapter 4-A reality check-the Dunning - Kruger effect

It is important to know what you are good at and what you are not. When you know the areas in which you are not good, you have to keep developing yourself, associate with the people who are good in those areas and so on.

Chapter 5- Daily habits to improve self-discipline

Habits are routine behaviours performed without putting any conscious thoughts into them. Your habits are reflection of your character. 
Daily habits to improve self-discipline
i. Your morning routine:- Your morning routine will set the pace for the rest of your day. Your morning routine should consist of exercise, healthy breakfast and so on. Praying and meditation in the morning also helps you keep positive throughout the day.
ii. The final hour of the day:- When you end your day after work, you need enough sleep for renewing the body and resting the mind so that you can be productive the next day. If you take a nap during the day, restrict it to 30 minutes. Avoid stimulants such as caffeine and nicotine in the evening which will stimulate the brain to stay awake. Eat right food in dinner and avoid rich, heavy, fatty foods and carbonated drinks as these can cause painful heartburn in the middle of the night and interrupt your sleep. Prepare the body for sleep by establishing a relaxing bedtime routine like having a warm bath, reading a book etc. There should be right environment with comfortable mattress, pillow etc.
iii. Gratitude:- Express  gratitude, say 'thank you' for small things rather than complaining or waiting big things to happen.
iv. Set daily goals:- You can achieve long-term goals by breaking them down and setting daily goals for yourself.
v. Stay organised:- Organisation and self-discipline go hand in hand. It improves productivity, reduces stress, enhances energy and enthusiasm and creates positive image for you.

6: Tips for building better habits
The Navy SEALS are some of the most disciplined people in the world. They are trained to understand that the mind is more powerful than we can ever imagine.
The 40% Rule :-According to this rule, when the mind starts telling the body is tired, we have reached only 40% of what we are capable of. If you know this principle, you can achieve more.
Box breathing:- This is a technique used by Navy SEALS to stop stress.
The 10 X Rule:-Grant Cordone, the pioneer of this rule, suggests that we should set goals ten times higher than the desired outcomes because it will make us take ten times more action to achieve it. 









श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७- ज्ञानविज्ञानयोग

श्रीभगवान म्हणाले

मन लावून माझ्यात | माझ्या आश्रयाने योग योजीत || कसे मला जाणशील निश्चित | ते ऐक पार्था || अ.७, ओ.१||

विज्ञानासहित ते ज्ञान | पूर्णपणे तुला सांगेन || जे घेतल्यावर जाणून | जाणण्यासारखे उरते न काही || अ.७, ओ.२||

एखादा कुणी सहस्र मनुष्यांत | झटतो, सिद्धी करण्यास प्राप्त || अशा झटणाऱ्या सिद्धांत | एखादा मला तत्त्वत: जाणतो || अ.७, ओ.३||

भूमी, जल, अग्नी, पवन | आकाश, बुद्धी, अहंकार आणि मन || अशा आठ प्रकारची भिन्न | असे माझी प्रकृती || अ.७, ओ.४||

ही माझी अपर प्रकृती होता अवगत | जाण माझी पर प्रकृती, जी असे जीवभूतांत || जी हे जगत | धारण करिते महाबाहो || अ.७, ओ.५||

पर आणि अपर प्रकृतींतून | भूते होती उत्पन्न ||जग प्रभवते माझ्यातून | आणि लय पावते माझ्यात || अ.७, ओ. ६||

माझ्याहून श्रेष्ठ असे | धनंजया, दुसरे काही नसे || आहे सर्व माझ्यात जसे | मणी 🧿 ओवलेले धाग्यात 🧵 || अ.७, ओ.७||

कौंतेया, मी रस पाण्यातील 🌊 | मी प्रभा चंद्रसूर्यांतील 🌙 ☀️|| मी शब्द आकाशातील  |आणि पुरुषांतील पौरुष मी || अ.७, ओ.८||

मी पुण्यगंध पृथ्वीतील 🌎| मी तेज अग्नीतील 🔥|| मी जीवन भूतांतील | तपस्व्यांतील तप मी || अ.७, ओ.९||

भूतांचे सनातन बीज मी | लक्षात ठेव पार्था नेहमी || बुद्धिमंतांची बुद्धी मी | तेजस्व्यांचे मी तेज || अ.७, ओ.१०||

बल मी बलवानांत | काम आणि आसक्तीपासून मुक्त || भरतर्षभा भूतांत | धर्माविरुद्ध नसणारा काम मी || अ.७, ओ.११||

सात्त्विक, राजस आणि तामस हे भाव तीन | आहेत माझ्यापासून ||  ते माझ्यात असती जाण | नसे मी त्यांच्यात || अ. ७, ओ.१२||

या गुणांनी तीन | हे जग गेले मोहून || न घेते जाणून | मला, परम अव्ययाला || अ.७, ओ.१३||

या दैवी गुणांनी युक्त माया | असे दुस्तर, पार करण्या || तेच समर्थ, ती तरून जाण्या | शरण येती जे मला || अ.७, ओ.१४||

जे नर असती या भावांच्या आश्रयास | मूढ, नराधम, असुर वृत्तीचे, करती दुष्कृत्त्यांस || मायेने हरले ज्यांच्या ज्ञानास | ते न शरण येती मला || अ.७, ओ.१५||

अर्जुना, जे सत्कृत्त्य करतात | असे चार प्रकारचे भक्त || जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी आणि आर्त | मला भजतात भरतर्षभा || अ.७, ओ.१६||

विशेष आहे त्यांत | नित्ययुक्त, एकभक्ती असा ज्ञानी भक्त || मी त्यास प्रिय अत्यंत | मलाही प्रिय तो || अ.७, ओ.१७||

हे सारे भक्त जरी थोर | ज्ञानी हा आत्माच खरोखर || युक्तात्मा  तो माझ्यात स्थिर | राहतो उत्तम गतीत || अ.७, ओ.१८||

तो अनेक जन्म घेऊन | सर्व काही वासुदेव आहे, असे जाणून || शरण येतो मला ज्ञानवान | महात्मा सुदुर्लभ || अ.७, ओ.१९||

जे स्वत:च्या प्रकृतीने बद्ध होती | इच्छांमुळे ज्ञान गमावती || ते अन्य देवतांना शरण जाती | त्यासाठीच्या नियमानुसार || अ.७, ओ.२०||

जो भक्त ज्या तनूची | श्रद्धापूर्वक इच्छा करतो पूजेची || अचल श्रद्धा त्याची | मी तेथे स्थिर करतो || अ.७, ओ.२१||

श्रद्धेने युक्त तो | तिच्या पूजेची इच्छा करतो || नंतर इच्छित मिळवतो | मी ठरवून दिलेले || अ.७, ओ.२२||

हे अल्पबुद्धी फळास मिळवती | ज्याचा नाश होतो अंती || देवांचे पूजक देवांकडे जाती | माझे भक्त येती माझ्याकडे || अ.७, ओ.२३||

मी अव्यक्तातून आलो व्यक्तिरूपात | असे निर्बुद्ध लोक मानतात || ते जाणू न शकतात | श्रेष्ठ, अव्यय, उत्तम भाव माझा || अ.७, ओ.२४||

मी योगमायेने झाकला असे | त्यामुळे सर्वांस प्रगट न दिसे || मी, जन्मरहित, अव्यय असे | हे मूढ लोक न जाणती || अ.७, ओ.२५||

अतीत आणि वर्तमान | यांचे अर्जुना, मला ज्ञान || भविष्य आणि भूताची मला जाण | परंतु मला कोणी न जाणतो || अ.७, ओ.२६||

भारता, इच्छा आणि द्वेषातून | उद्भवलेल्या द्वंद्वाच्या मोहातून || सृष्टीत सर्व भूते संमोह पावून | जातात परंतपा || अ.७, ओ.२७||

जे पुण्यकर्मी जन | मुक्त होती पापातून || ते द्वंद्वाच्या मोहातून मुक्त होऊन | दृढ व्रताने मला भजती || अ.७, ओ.२८||

मोक्ष मिळवण्या वृद्धत्व आणि मरणातून | जे झटती माझा आश्रय घेऊन || येई त्यांना समजून | ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म || अ.७, ओ.३०||

अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञात | मी आहे असे जे जाणतात || ते अंतकाळीही मला स्मरतात | युक्त अशा बुद्धीने || अ.७, ओ.३०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ज्ञानविज्ञानयोग’ नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🪔 🙏 🌺 🪔 🙏🌺 🪔 🙏 🌺 🪔 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Wednesday, July 23, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ६ -ध्यानयोग

श्रीभगवान म्हणाले

योगी आणि संन्यासी म्हणावे त्यास | जो त्यागून कर्मफळास || करतो कर्तव्य कर्मास | म्हणू नये अग्निहोत्रहीनास आणि निष्क्रियास II अ.६, ओ.१ II

म्हणती ज्यास संन्यास | पांडवा, जाण योग त्यास || सोडल्यावीण संकल्पास | योगी न होई कोणीही || अ.६, ओ.२||

योगारोहणास ज्या मुनीने आरंभ केला | कारण असे कर्म त्याला || मात्र योगारूढाला | शम हे कारण असे || अ।६, ओ.३||

जो होत नाही आसक्त | इंद्रियविषयांत किंवा कर्मांत || संकल्पांतून होतो मुक्त | म्हणती त्यास योगारूढ || अ.६, ओ.४||

आपण करावा उद्धार आपला | करू नये नाश आपला || आपण बंधू आपला | आपणच आपला शत्रू || अ.६, ओ.५||

जो स्वत:स जिंकतो | तो स्वत:चा मित्र होतो || जो स्वत:स न जिंकतो | तो होई शत्रू स्वत:चा || अ.६, ओ.६||

स्वत:स जिंकलेल्या प्रशांत | परमात्म्यास समत्व होई प्राप्त || शीतोष्ण वा सुखदु:खात | वा मानापमानात || अ.६, ओ.७||

तो आत्मा तृप्त ज्ञान-विज्ञानाने | असे निर्विकार, इंद्रियांस जिंकले ज्याने || समान ज्यास मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने | त्यास योगी म्हणतात || अ.६, ओ.८||

सुहृद, मित्र, शत्रूंशी | तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य, बंधूंशी || सज्जनांशी आणि पाप्यांशी | समबुद्धी असे त्या विशेष पुरुषाची  || अ.६, ओ.९||

राहून एकांतात | चित्त आणि आत्मा करून नियंत्रित || इच्छा आणि परिग्रहापासून मुक्त | योग्याने स्वत:स सतत योजावे || अ.६, ओ.१०||

स्वच्छ भूमीवर | स्थापन करावे आसन स्थिर || न फार उंचावर, न खाली फार | मृदू वस्त्राचे, कातड्याचे किंवा गवताचे || अ.६, ओ.११||

त्या आसनावर बसून | करून एकाग्र मन || चित्त आणि इंद्रिये नियंत्रित करून | आत्मविशुद्धीसाठी  योग योजावा || अ.६, ओ.१२||

शरीर, मस्तक आणि मान | एका रेषेत स्थिर ठेवून || नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून | न पाहता सभोवती ||अ.६, ओ.१३||

मन शांत व निर्भय ठेवून | ब्रह्मचर्यव्रतात राहून || मनावर संयम ठेवून | चित्त माझ्या ठिकाणी ठेवावे, माझ्यात परायण असावे || अ.६, ओ.१४||

याप्रमाणे स्वत:स योजून सदोदित | मनास करून संयमित || योगी पावतो माझ्यात | निर्वाणकारक परम शांतीस ||अ.६, ओ.१५||

अति खाणाऱ्यास | किंवा अगदीच न खाणाऱ्यास || फार झोपणाऱ्यास किंवा फार जागणाऱ्यास | हा योग जमत नाही अर्जुना || अ.६, ओ.१६||

आहार-विहार ज्याचा नियंत्रित | जो कर्मे करी उचित || निद्रा-जागरण ज्याचे मर्यादेत | त्यालाच दु:खनाशक ठरतो हा योग || अ.६, ओ.१७|||

जेव्हा चित्त नियंत्रित | स्थिर होते आत्म्यात || सर्व इच्छांतून होतो विरक्त | तेव्हा तो योगी म्हणवतो || अ.६, ओ.१८||

निवांत जागी ठेवता दिव्यास | स्थैर्य राहते ज्योतीस || ती उपमा त्या योग्यास | ज्याचे चित्त नियंत्रित || अ.६, ओ.१९||

योगसेवेने नियंत्रित | चित्त होता शांत || आत्म्याने आत्म्यास पाहत | आत्म्यात संतुष्ट राहतो || अ.६, ओ.२०||

जी अनुभवता न ये इंद्रियांस | परी बुद्धी समर्थ जाणावयास || पावता अशा स्थितीस | योगी न ढळतो तत्त्वत: || अ.६, ओ.२१||

जी स्थिती होता प्राप्त | दुसरा लाभ नाही मोठा वाटत || स्थिर होता त्या स्थितीत | विचलित न करी दु:ख कुठले  || अ.६, ओ.२२||

दु:खाच्या उत्पत्तीचा अंत करणाऱ्या  | जाणावे समाधिस्थितीला त्या || निश्चयाने योगास योजावे त्या | न होता विचलित || अ.६, ओ.२३||

इच्छा जन्मती संकल्पांतून | त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करून || मनानेच सर्व बाजूंनी नियमन करून | इंद्रियांच्या गावाचे || अ.६, ओ.२४||

बुद्धीने धैर्ययुक्त | हळूहळू करून नियंत्रित || मन स्थिर करून आत्म्यात | विचार दुसरा करू नये || अ.६, ओ.२५||

अस्थिर आणि चंचल मन | करील जेथे जेथे भ्रमण || तेथून त्याला आवरून | आत्म्यात वश करावे || अ.६, ओ.२६||

मन प्रशांत झालेल्या | रजोगुण निमालेल्या ||ब्रह्मरूप, पापरहित झालेल्या | अशा योग्यास उत्तम सुख लाभते || अ.६, ओ.२७||

योगी पापरहित | सदा स्वत:स योजीत ||ब्रह्मसंस्पर्शाचे अत्यंत | सुख मिळवतो || अ.६, ओ.२८||

योगयुक्त आत्मा तो | सर्वत्र समदृष्टी ठेवतो || सर्व भूतांत स्वत:स पाहतो | आणि स्वत:त सर्व भूतांस ||अ.६, ओ.२९||

जो सर्वत्र मला पाहतो | आणि माझ्यात सर्व पाहतो || त्याच्यासाठी मी न नाश पावतो | न तो पावतो नाश माझ्यासाठी || अ.६, ओ.३०||

सर्व भूतांत मी वास करतो | अशा मला जो एकत्वभावाने भजतो || तो योगी सर्व प्रकारे वर्ततो | माझ्याच ठायी || अ.१६, ओ.३१||

ठेवून समदृष्टीस | इतरांत पाहून स्वत:स || जाणतो त्यांच्या सुखदु:खांस | तो परम योगी मानावा || अ.६, ओ.३२||

अर्जुन म्हणाला

हे मधुसूदना, या योगास | कथन तू केलेस || परंतु वाटे साधारणपणे  त्यास | स्थिरता न येईल चंचलत्वामुळे || अ.६, ओ.३३||

कृष्णा, हे चंचल मन | विचलित करणारे, दृढ, बलवान || त्याचा निग्रह वायूसमान | कठीण मी मानतो || अ.६, ओ.३४||

श्रीभगवान म्हणाले

महाबाहो, निस्संशय हे मन | आहे चंचल आणि निग्रह करण्यास कठीण || परंतु कौंतेया, अभ्यास आणि वैराग्यातून | त्याचा निग्रह शक्य आहे || अ.६, ओ.३५||

ज्याचे मन नाही नियंत्रित | हा योग त्यास दुस्साध्य आहे, असे माझे मत || प्रयत्न आणि इतर उपायांनी योग होईल प्राप्त | मनास वश करणाऱ्यास || अ. ६, ओ.३६||

अर्जुन म्हणाला

योगी जो असूनही श्रद्धायुक्त | होतो योगापासून विचलित || न होता योग प्राप्त | जातो कुठल्या गतीस कृष्णा || अ.६, ओ.३७||

ब्रह्मपथापासून भ्रष्ट होऊन | प्रतिष्ठा घालवून, दोन्ही गमावून || फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश पावून | जातो का महाबाहो ? || अ.६, ओ.३८||

कृष्णा, माझ्या या संशयास | पूर्णपणे दूर करण्यास || तूच समर्थ आहेस || नसे दुसरा कुणीही || अ.६, ओ.३९||

श्रीभगवान म्हणाले

पार्था, या लोकात वा परलोकात | विनाशास तो नाही जात || बाबा रे, कल्याणकारी कार्यात | जातो न कुणी दुर्गतीला || अ.६, ओ.४०||

योगापासून जो भ्रष्ट होतो | तो पुण्यवंतांच्या लोकांत वर्षानुवर्षे राहतो || आणि नंतर जन्म घेतो | शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरी || अ.६, ओ.४१||

अथवा बुद्धिमान योग्यांच्याच कुळास | येतो तो जन्मास || असा जन्म मिळावयास | कठीण असे या लोकी || अ.६, ओ.४२||

पूर्वजन्मातील संस्कार | घेऊन येतो बरोबर ||संसिद्धीसाठी कठोर | पुन्हा झटतो कुरुनंदना || अ.६, ओ.४३||

पूर्वीचा अभ्यास | आपोआप आकर्षून घेई त्यास || इच्छुक तो  योग  जाणण्यास | शब्दब्रह्माच्या पैल जातो || अ.६, ओ.४४||

सतत प्रयत्नशील राहून | तो योगी शुद्ध होतो पापांतून || कैक जन्मांतून सिद्धी पावून | जातो परम गतीस || अ.६, ओ.४५||

योगी श्रेष्ठ तपस्व्यांहून | योगी श्रेष्ठ ज्ञानी लोकांहून || योगी श्रेष्ठ कर्म करणाऱ्याहून | म्हणून योगी हो अर्जुना || अ.६, ओ.४६||

सर्व योग्यांत | जो अंतरात्मा स्थिर करून माझ्यात || श्रद्धेने मला भजतो सतत | मला वाटतो तो योगी सर्वश्रेष्ठ || अ.६, ओ. ४७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ध्यानयोग’ नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, July 22, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ५ संन्यासयोग

अर्जुन म्हणाला

सांगून कर्मांपासून संन्यास | पुन्हा योगाची प्रशंसा करतोस || दोन्हींत   एक कुठले कारक हितास | ते निश्चित सांग कृष्णा || अ.५, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

कर्मयोग आणि संन्यास | दोन्ही कारक हितास || तरी कर्मयोगास | विशेष महत्त्व आहे || अ.५, ओ.२||

जो न द्वेष करतो, न इच्छा धरतो | जाणावा नित्य संन्यासी तो || सहज बंधनातून मुक्त होतो | द्वंद्वमुक्त तो महाबाहो || अ.५, ओ.३||

सांख्य आणि योग वेगळे दोन्ही | म्हणती अज्ञानी, न ज्ञानी || एकाचे पालन करूनी | फळे मिळती दोन्हींची || अ.५, ओ.४||

जे स्थान सांख्यांस मिळते | योगांनीही तेथे जाता येते || ज्यास दोन्ही एकच दिसते | त्यालाच खरे दिसते   ||अ.५, ओ.५||

योगावाचून संन्यास | महाबाहो, कठीण मिळवावयास || योगयुक्त मुनीस | ब्रह्म मिळते लवकर || अ.५, ओ.६||

जो योगयुक्त, ज्याने शुद्ध केले आत्म्याला | जिंकले इंद्रियांना आणि आत्म्याला || सर्व भूतांच्या आत्म्यांत पाही स्वतःच्या आत्म्याला | तो कर्मे करूनही लिप्त न होतो || अ.५, ओ.७||

तत्त्व जाणणाऱ्याने मानणे युक्त | की,' मी काही नाही करीत’ || असताना पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत | खात, जात, झोपत, श्वास घेत- || अ. ५, ओ. ८||

-बोलत, त्याग करीत, घेत | पापण्यांची उघडझाप करीत, || इंद्रिये विषयांच्या ठायी वर्ततात | असे जो मानतो, ||अ.५, ओ.९||

आसक्ती सोडून | करतो कर्मे ब्रह्मात अर्पण || तो अलिप्त राहतो पापापासून | जसे कमलपत्र पाण्यात ||अ.५, ओ.१०||

आसक्तीचा त्याग करुनी | काया, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी || आत्मशुद्धीचे ध्येय ठेवुनी | योगी कर्म करतात || अ.५, ओ.११||

योगी कर्मफळ त्यागतो | आणि दृढ शांती पावतो || योगविहीन कर्मफळात आसक्त होतो | आणि बद्ध होतो ||अ.५, ओ.१२||

वश करतो जो इंद्रियांस | तो मनाने सोडून सर्व कर्मांस || नऊ द्वारांच्या देहरूपी नगरात, सुखात करतो वास | कर्मे न करता न करविता ||अ.५, ओ.१३||

लोकांच्या कर्तृत्वाची किंवा कर्माची | तसेच कर्मफळसंयोगाची || स्वभावातून उत्पत्ती होते त्यांची | प्रभू न त्यांस निर्मितो ||अ.५, ओ.१४||

कुणाच्या पाप-पुण्यास | न घ्यावयाचे प्रभूस || अज्ञानाने झाकल्याने ज्ञानास | मोह पावतात जीव || अ.५, ओ.१५||

ज्यांचे ते अज्ञान | आत्मज्ञानाने गेले नाश पावून || 

त्यांचे ते ज्ञान सूर्यासमान | प्रकाशित करते परास ||अ.५, ओ.१६||

त्या ज्ञानात ज्यांची बुद्धी आणि आत्मे स्थिर झाले I जे त्या ज्ञानाशी निष्ठ आणि परायण झाले II त्या ज्ञानाने त्यांचे दोष जाती धुतले I पुनर्जन्मास न जाती ते II अ.१५,ओ.१७II

विद्याविनयसंपन्न ब्राह्मणास | गायीस आणि हत्तीस || कुत्र्यास आणि चांडाळास | समदृष्टीने पाहती पंडित || अ.५, ओ.१८||

ज्यांच्या मनात समभाव स्थिर झाला असे | त्यांनी येथेच जन्म-मृत्यू जिंकला असे || ब्रह्म निर्दोष आणि सम असे | त्यामुळे ब्रह्मात स्थिर ते झाले || अ.५, ओ.१९||

प्रिय वस्तू मिळता होई न आनंदित | अप्रिय घडता होई न दु:खित || ब्रह्मज्ञानी स्थिर ब्रह्मात | विवेकी आणि स्थिर बुद्धीचा || अ.१५, ओ.२०||

तो बाह्यस्पर्शांत न आसक्त | स्वत:मध्ये होते त्याला सुख प्राप्त || तो ब्रह्मयोगाने युक्त | अक्षय सुख मिळवतो || अ.५, ओ.२१||

स्पर्शातून भोग उत्पन्न होती | तेच दु:खास कारण होती || कौंतेया, ते आरंभती तसेच अंतास जाती | जाणता न रमतो त्यांत ||अ.५, ओ.२२||

वेग कामक्रोधातून उत्पन्न | येथेच जो करू शकतो सहन || करण्याआधी शरीरविमोचन | तो योग्य, तो सुखी नर || अ.५, ओ.२३||

जो असे अंतरी सुखात I आनंदात आणि प्रकाशात II तो योगी ब्रह्मभूत | ब्रह्मनिर्वाण मिळवतो || अ.५, ओ.२४||

पाप ज्यांचे क्षीण झाले | द्वंद्वमुक्त होऊन स्वतःस ज्यांनी नियंत्रित केले ||  सर्व भूतांच्या हितात जे रमले | असे हे ऋषी ब्रह्मनिर्वाण पावती ||अ.५, ओ.२५||

काम-क्रोध ज्यांचे सुटले | चित्त ज्यांनी नियंत्रित केले | स्वत:स ज्यांनी जाणले | ब्रह्मनिर्वाण अशा  यतींच्या सन्निध  असते || अ.५, ओ.२६||

बाह्यविषयांस ठेवून बाहेर | भुवयांच्या मध्यभागी दृष्टी करून स्थिर || नाकाच्या अंतर्भागात करणाऱ्या  संचार | प्राण-अपानांची सारखी ठेवून गती || अ.५, ओ.२७||

-मन, बुद्धी आणि इंद्रिये नियंत्रित करून | इच्छा, भय आणि क्रोध सोडून || राहतो जो मुनी मोक्षपरायण | तो मुक्तच सदैव || अ.५, ओ.२८||

भोक्ता सर्व यज्ञांचा आणि तपांचा | महान ईश्वर सर्व जगाचा || सुहृद सर्व भूतांचा | अशा मला जाणून, शांती पावतो ||अ.५, ओ.२९||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘संन्यासयोग’ नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, July 21, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ४ – कर्मसंन्यासयोग


श्रीभगवान म्हणाले

हा योग सांगितला | पूर्वी मी विवस्वानाला || विवस्वानाने मनूला | इक्ष्वाकूला मनूने || अ. ४, ओ.१||

असा परंपरेने प्राप्त झालेला | राजर्षींनी जाणून घेतला || कालांतराने नष्ट झाला | हा योग परंतपा ||अ.४, ओ.२||

तू माझा भक्त आणि सखा म्हणून | आज तुला केला कथन || हा योग पुरातन | आणि रहस्य उत्तम || अ.४, ओ.३||

अर्जुन म्हणाला

विवस्वानाचा जन्म पूर्वीचा | तुमचा जन्म अलिकडचा || कसा मी विश्वास ठेवायचा | की योग तू पूर्वी सांगितला ||अ.४, ओ.४||

श्रीभगवान म्हणाले

यापूर्वीही आपणास | यावे लागले आहे अनेक जन्मांस || मी जाणतो त्या सर्वांस | तू न जाणसी परंतपा || अ.४, ओ.५||

स्वत:च्या प्रकृतीत राहून | स्वत:च्या मायेने होतो उत्पन्न || मी अव्यय जन्मविहीन | भूतांचा ईश्वर || अ.४, ओ.६||

भारता, ज्या ज्या वेळेस | ग्लानी येते धर्मास ||अधर्म जातो पराकोटीस | तेव्हा मी स्वत: प्रगटतो || अ.४, ओ. ७||

सज्जनांच्या उद्धारास | दुर्जनांच्या विनाशास || धर्माच्या पुनर्स्थापनेस | युगायुगांत मी प्रगट होतो || अ.४, ओ.८||

माझे जन्म आणि कर्म दिव्य | यांचा जो करून घेई परिचय || पुनर्जन्म त्याचा न होय | तो माझ्याकडे येई अर्जुना ||अ.४, ओ. ९||

आसक्ती, भय आणि क्रोध सोडून | माझा आश्रय घेऊन || ज्ञानतपाने पावन होऊन | भावास  माझ्या आले बहुत || अ.४, ओ.१०||

जे जसे शरण येती मला | पावतो मी तसा त्यांजला || मनुष्य अनुसरती माझ्या मार्गाला | सर्व प्रकारे पार्था ||अ।४, ओ.११||

जे कर्मांची सिद्धी इच्छितात | ते देवतांना पूजितात || कारण लवकर होते मनुष्यलोकात | कर्मोत्पन्न सिद्धी ||अ.४, ओ.१२||

मी केले चातुर्वर्ण्य निर्माण | विभागून कर्म आणि गुण || अशा मला तू जाण | अकर्त्यास, अव्ययास || अ.४, ओ.१३||

मी न इच्छितो कर्माची फळे | लेपती मला न कर्मे त्यामुळे || असे माझे रूप ज्याला कळे | त्यालाही कर्मे न बांधती || अ. ४, ओ. १४ ||

पूर्वीसुद्धा असे जाणुनी | कर्मे केली मुमुक्षूंनी || पूर्वी केलेली पूर्वजांनी | कर्मे तू कर || अ.४, ओ.१५||

म्हणावे कर्म कशास, अकर्म कशास | याचा नसे निश्चय कवींस || पार करशील अशुभास | असे कर्म सांगतो तुला || अ.४, ओ. १६||

जाणावे काय कर्म | जाणावे काय विकर्म ||जाणावे काय अकर्म | कर्माची गती गहन ||अ.४ ओ.१७||

जो पाहतो अकर्म कर्मात | आणि कर्म अकर्मात || तो बुद्धिमान मनुष्यांत | जरी मग्न सर्व कर्मांत || अ.४, ओ. १८||

ज्याच्या साऱ्या क्रिया | कामसंकल्पातून मुक्त झाल्या || ज्ञानाग्नीत जळून गेल्या | त्यास म्हणती पंडित || अ. ४, ओ. १९||

कर्मफलाची आसक्ती सोडून | नित्य तृप्त, निराश्रय होऊन || जरी असे तो कर्मात मग्न | करीत नाही काहीच तो || अ. ४, ओ.२०||

इच्छा सोडून, बुद्धी आणि मन नियंत्रित करतो | परिग्रहांपासून मुक्त राहतो || कर्मे केवळ शरीरासाठी करतो | तो पापात न गुंततो || अ.४, ओ.२१||

सहज मिळेल त्यात त्यास समाधान | तो द्वंद्वांपासून मुक्त आणि मत्सरविहीन || सिद्धी आणि असिद्धी त्यास समान | तो कर्मात न बद्ध होतो || अ.४, ओ.२२||

आसक्ती त्याची सुटली | बुद्धी ज्ञानात स्थिर झाली || यज्ञास्तव सारी कर्मे केलेली | पूर्ण विरून जाती || अ. ४, ओ.२३||

ब्रह्माने ब्रह्माग्नीत | ब्रह्म हे हविर्द्रव्य ब्रह्मार्पण करीत || तो जातो ब्रह्माप्रत | ब्रह्मसमाधीने || अ.४, ओ.२४||

काही योगी करून यज्ञास | उपासिती दैवतांस || काही यज्ञ करून यज्ञास | ब्रह्माग्नीत अर्पिती ||अ.४, ओ.२५||

श्रवणादी इंद्रियांची आहुती | काही संयमाग्नीत देती || शब्दादी विषय अर्पिती | इंद्रियाग्नीत काही || अ.४, ओ.२६||

काही जण कर्मांस इंद्रियांच्या | काही जण कर्मांस प्राणाच्या || ज्ञानदीपित योगाग्नीत आत्मसंयमाच्या | करिती अर्पण || अ.४, ओ.२७||

द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ | तसेच योगयज्ञ   || आणि स्वाध्यायज्ञानाचा यज्ञ | करिती दृढ-व्रतस्थ यती || अ.४, ओ.२८||

रोखून प्राण आणि अपानाची गती | प्राण अपानात अर्पिती || अपान प्राणात अर्पिती | प्राणायमपरायण || अ.४, ओ.२९||

काही आहार 🍚 नियंत्रित करती | प्राण प्राणांत अर्पिती || हे सारे जन यज्ञ जाणती | यज्ञाने हरती पापास || अ.४, ओ.३०||

यज्ञातून उरलेल्या अमृतास  | भोगून जाती सनातन ब्रह्मलोकास || हा लोकही मिळे यज्ञ न करणाऱ्यास | दुसरा तरी कसा मिळेल कुरुसत्तमा || अ.४, ओ.३१||

असे हे यज्ञ विभिन्न | विस्तारले ब्रह्म्याच्या मुखातून || उत्पन्न कर्मापासून | जाणून मोक्ष पावशील || अ.४, ओ.३२||

तुलना करिता द्रव्ययज्ञाची | परंतपा, श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची || कारण परिसमाप्ती सर्व कर्मांची | पार्था, ज्ञानात होतसे || अ.४, ओ.३३||

प्रणिपात, परिप्रश्न | आणि सेवा करून || उपदेशती ज्ञान | ज्ञानी आणि तत्त्वदर्शी || अ.४, ओ.३४||

हे ज्ञान करून प्राप्त | पांडवा, पुन्हा न पडशील मोहात || पाहशील स्वत:त आणि माझ्यात |  सर्व भूतांस || अ.४, ओ.३५||

जरी सर्व पाप्यांमधील | सर्वांत अधिक पापी असशील || पापसमुद्र 🌊 तरून जाशील | ज्ञानाच्या नौकेने ⛵|| अ. ४ ओ.३६||

जसा अग्नी 🔥 प्रदीप्त झाल्यावरी | अर्जुना, समिधांस भस्म करी || तशीच कर्मे सारी | ज्ञानाग्नीत भस्म होती ||अ.४, ओ. ३७||

जगात कशाची बरोबरी | नसे ज्ञानाशी खरोखरी || योगसंसिद्ध प्राप्त करी | कालांतराने ते ज्ञान || अ.४, ओ.३८||

जो असे श्रद्धावान | ज्याने केले इंद्रियांचे नियमन | तो मिळवून ज्ञान | पूर्ण शांती प्राप्त करतो || अ. ४, ओ. ३९||

जो अज्ञानी, अश्रद्ध, संशयाने भरलेला | नाश त्याचा असे ठरलेला || मिळे न इहलोक, न परलोक त्याला | संशयात्म्यास मिळे न सुख || अ. ४, ओ. ४०||

योगाने ज्याने कर्मांचा त्याग केला | ज्ञानाने ज्याचा संशय नष्ट झाला || अशा आत्मवंताला | कर्मे न बांधती धनंजया || अ.४, ओ.४१||

हृदयात ❤️ उत्पन्न झालेले अज्ञान | ज्ञानाच्या खड्गाने 🗡️ छेदून || योगाचा अवलंब करून | ऊठ भारता || अ.४, ओ.४२||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मसंन्यासयोग’ नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Friday, July 18, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ३ - कर्मयोग

अर्जुन म्हणाला

बुद्धी श्रेष्ठ कर्माहून | जनार्दना, असे सांगून || या घोर कर्मात माझे नियोजन | कशास करिसी केशवा || अ.३, ओ.१||

सांगून वाक्ये मिश्रित | करसी बुद्धीस मोहित || एकच सांग निश्चित | ज्यात हित माझे || अ. ३, ओ. २||

श्रीभगवान म्हणाले

हे अनघा, मोडती या जगात | निष्ठा दोन प्रकारांत || सांख्यांची ज्ञानयोगात | कर्मयोगात योग्यांची || अ. ३, ओ.३||

न केल्याने कर्माच्या आरंभास | पुरुष न पावे नैष्कर्म्यास || किंवा सोडून कर्मास | लाभ न होई सिद्धीचा ||अ. ३, ओ.४||

क्षणभरही कोणीही न | राहू शके कर्मावाचून | सर्व कर्मे घेती करवून | गुण प्रकृतीचे ||अ. ३, ओ.५||

जो संयमित करून कर्मेंद्रियांस | मनाने करी इंद्रियांच्या स्मरणास || अशा विमूढ आत्म्यास | ढोंगी म्हणतात || अ. ३, ओ.६||

जो मनाने इंद्रियांचे नियमन करतो | आणि कर्मेंद्रियांनी कर्मयोग आरंभतो || असक्त असा तो | विशेष असे अर्जुना || अ.३, श्लो.७||

कर्म कर नेमून दिलेले | कर्म न करण्याहून ते चांगले || शरीरव्यापारही आपले | कर्मावाचून न होती ||अ.३, ओ.८||

कर्म करिता यज्ञाव्यतिरिक्त | टाकते कर्मबंधनात | आणि तरी कर्म यज्ञात | अनासक्तपणे कर, कौंतेया ||अ.३, ओ.९||

यज्ञासह करून प्रजेची निर्मिती | म्हणाले प्रजापती, || ‘यज्ञाने करून घ्या इच्छापूर्ती | यज्ञ तुमची कामधेनू || अ.३, ओ.१०||

यज्ञाने प्रसन्न करा देवांस | देव प्रसन्न करोत तुम्हास || प्रसन्न करून एकमेकांस | घ्या साधून कल्याण || अ. ३, ओ.११||

देव यज्ञाने संतुष्ट होतील | तुम्हास इच्छित वस्तू देतील || परंतु त्या देवांस न अर्पिता भोगेल | तो चोर केवळ || अ.३, ओ.१२||

अन्न उरलेले यज्ञातून | सेवन करणारे मुक्त होती पापांतून | स्वत:साठी जे शिजवती अन्न | ते भोगतात पाप ||अ.३, ओ.१३||

भूतांस  🐈 पोसते अन्न 🍚| अन्नाची  उत्पत्ती पर्जन्यातून 🌧️ || पर्जन्य उद्भवतो यज्ञातून | यज्ञ कर्माचा परिपाक || अ.३, ओ.१४||

कर्म ब्रह्मापासून उत्पन्न होते | ब्रह्म अक्षरापासून उद्भवते || म्हणजे ब्रह्म जे सर्व व्यापते | नित्य अधिष्ठित यज्ञात || अ.३, ओ.१५||

असे चक्र 🛞 प्रवर्तित | नाही पुढे चालवीत || तो पापी, इंद्रियासक्त | व्यर्थ त्याचे जीवन || अ.३, ओ.१६||

परंतु जो मनुष्य आत्म्यात रमतो | आत्म्यात तृप्त राहतो || आत्म्यातच संतोष मानतो | त्यास उरते न कार्य काही ||अ.३, ओ.१७||

काही करण्यात वा न करण्यात | लाभ न त्याच्या दृष्टीत || नसे त्याचा सर्व भूतांत | हितसंबंध काही || अ.३, ओ. १८||

म्हणून होऊन अनासक्त | कर्म करीत राहा सतत || अनासक्त कर्म करीत | पुरुष परास पावतो ||अ.३, ओ.१९||

मिळवली जनकादिकांनी | संसिद्धी कर्म करूनी ||लोकसंग्रहही पाहुनी | कर्म करणे उचित || अ.३, ओ.२०||

श्रेष्ठ जसे आचरण करीती | इतर जन तसे वागती || श्रेष्ठ जे प्रमाण ठरवती | अनुकरण करती लोक त्याचे ||अ.३, ओ.२१||

पार्था, लोकात तिन्ही | मला कर्तव्य नाही || मिळवावयाचे, न मिळवावयाचे, नसे काही | तरी कर्म करतो मी || अ.३, ओ. २२||

कारण ठेवून अवधान | जर मी कार्य न करीन ||अनुसरतील मला जन | सर्व परीने || अ.३, ओ.२३||

होईल लोकांचा ऱ्हास | जर मी न केले कर्मास ||कारण होईन संकरास | आणि घातास प्रजेच्या || अ.३, ओ. २४||

होऊन आसक्त | अज्ञानी लोक कर्म करतात ||विद्वानांनी कर्म करावे होऊन अनासक्त |लोकसंग्रहाच्या इच्छेने || अ.३, ओ.२५||

जनांचा अज्ञानी | करू नये बुद्धिभेद विद्वानांनी ||कर्मे स्वतः करूनी | इतरांकडून करवावी || अ.३, ओ.२६||

प्रकृतीचे गुण तीन | कर्मे घेती करवून || कर्मे करण्याचा अभिमान | बाळगतो अहंकारी विमूढात्मा || अ.३, ओ.२७||

हे महाबाहो, जाणून गुण आणि कर्मांची भिन्नता |  गुण गुणांच्या ठायी वर्तता || खरा तत्त्ववेत्ता | आसक्त त्यांत होत नाही || अ.३, ओ.२८||

जे आहेत प्रकृतीच्या गुणांनी मोहित | गुण आणि कर्मांत आसक्त || अशा अज्ञानी, मंदबुद्धींस करू नये विचलित | सर्वज्ञाने || अ.३, श्लो. २९||

सर्व कर्मे मला अर्पून | आध्यात्मात बुद्धी ठेवून ||युद्ध 🏹 कर निरपेक्ष, निर्मम होऊन | वैर न बाळगता || अ.३, ओ.३०||

हे माझे मत | प्रमाण मानून जे  वागतात || ते मानव श्रद्धावान, असूयारहित | होतात मुक्त कर्मातून   || अ.३, ओ. ३१||

परंतु माझे हे मत | जे अविवेकी, मूर्ख नाही अनुसरत || त्यांचा नाश निश्चित | असे जाण || अ.३, ओ.३२||

स्वतःच्या प्रकृतीस अनुसरून | वागतो ज्ञानवान ||सर्व भूतांचेही तसेच वर्तन | तेथे निग्रह काय करील || अ.३, ओ. ३३||

इंद्रिये आणि विषयांत | प्रीति-द्वेषसंबंध निश्चित ||त्यांना वश होणे न उचित | ते मार्गातील विघ्ने जणू  || अ.३, ओ.३४||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||बरे स्वधर्मात निधन |   परधर्म भयावह || अ.३, ओः३५ ||

अर्जुन म्हणाला

मग प्रयोजनाने कुठल्या | पाप होई हातून पुरुषाच्या || मनाविरुद्ध त्याच्या | इच्छा नसताना वार्ष्णेया || अ.३, ओ. ३६ ||

श्रीभगवान म्हणाले

काम किंवा क्रोध जाण | जो होतो रजोगुणातून निर्माण || तो महाखादाड, पापाची खाण | येथील वैरी आहे जणू || अ.३, ओ.३७ ||

जसा धूर  झाकतो अग्नीस 🔥 | जशी धूळ माखते आरशास 🪞|| वार वेढते गर्भास | तसा काम झाकतो ज्ञानास || अ.३, ओ.३८||

झाकतो ज्ञानी मनुष्याचे ज्ञान | काम हा नित्य वैऱ्यासमान || अग्नीप्रमाणे त्याला न समाधान | जाण कौंतेया || अ.३, ओ. ३९ ||

इंद्रिये, बुद्धी आणि मन | यांत करून अधिष्ठान ||ज्ञानास झाकून | काम आत्म्यास मोहवितो || अ.३, ओ.४०||

भरतषर्षभा, म्हणून सुरुवातीस | करून इंद्रियनियमनास || सोड पापप्रतीक कामास | ज्ञानविज्ञाननाशकास || अ.३, ओ.४१||

इंद्रिये श्रेष्ठ जाण | मन श्रेष्ठ इंद्रियांहून || बुद्धी श्रेष्ठ मनाहून | बुद्धीहून श्रेष्ठ परमात्मा || अ.३, ओ. ४२||

अशा त्या परमात्म्यास जाणून | स्वत:स स्वत: स्थिर करून || महाबाहो, घे जिंकून | दुष्कर कामरूपी शत्रूला || अ.३, ओ.४३ ||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मयोग’ नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

साप

जीभ लवलवती 
चट्टे पट्टे अंगावरी 
साप सारे 
नाही विषारी 
पाय नाही बापड्याला 
म्हणून सरपटतो 
अध्यात मध्यात नाही कुणाच्या 
सर्वांना टाळतो 
येत नाही बोलायला 
म्हणून फुत्कार टाकतो 
घाबरतो तुम्हाला 
म्हणून फणा काढतो 
उंदीर घुशी खातो 
धान्य वाचवतो 
नका उगारू लाठ्या-काठ्या | 
मित्र माना त्याला |
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved

Thursday, July 17, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ - सांख्ययोग


संजय म्हणाला

करुणापूर्ण तशा अर्जुनाला | व्याकूळ, अश्रुपूर्ण दिसणाऱ्याला || विषाद करणाऱ्याला | मधुसूदन हे वाक्य बोलले || अ.२, ओ.१|

श्रीभगवान म्हणाले

कोठून हे तर्कट अर्जुना | अशा अवेळी आले तुझ्या मना || जे नेते दूर स्वर्गापासून, न शोभते आर्यांना | आहे अपकीर्तीचे कारण ||अ.२, श्लो.२||

नकोस पडू कमकुवतपणास बळी | तुला न हा शोभतो मुळी || मन:स्थिती क्षुद्र दुबळी | सोडून ऊठ परंतपा || अ.२, श्लो.३||

अर्जुन म्हणाला

कसा मी या युद्धात पण | पूज्य आम्हाला जे भीष्म-द्रोण || त्यांच्यावर उलट सोडू बाण | सांग मधुसूदना ||अ.१, ओ.४||

महान गुरूंस मारणे | यापेक्षा बरे, भीक मागून जगणे || जरी हे गुरू पैशासाठी ओशाळवाणे | हत्येचे भोग असतात रक्तरंजित ||अ. २, ओ. ५ ||

नकळे मला दोन्हींत बरे काय | मिळवावा की न मिळवावा जय || ज्यांना मारून जगण्यात न स्वारस्य | ते धार्तराष्ट्र युद्धास सिद्ध ||अ. २, ओ.६||

गोंधळली वृत्ती, झाले कुंठित मन |   धर्माविषयी मला न ज्ञान || भले काय ते सांग समजावून | शिष्य मी तुझा, सांग मला शरणागताला || अ.१, ओ.७||

कसे दूर करू, मला न कळते | दु:ख जे इंद्रियांचे शोषण करते || जरी निष्कंटक राज्य पृथ्वीचे मिळते | आणि देवांचे आधिपत्य ||अ. २, ओ.८||

संजय म्हणाला

बोलून असे हृषीकेशास | गुडाकेश, जो ताप देई शत्रूंस || 'नाही करणार युद्धास'| असे बोलून शांत झाला ||अ.२, ओ.९||

हृषीकेश बोलला त्यास | भारता, करून जणू हास्यास || विषाद करणाऱ्या अर्जुनास | दोन्ही सैन्यांच्यामध्ये || अ.२, ओ.१०||

श्रीभगवान म्हणाले

ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस | पोकळ पांडित्य सांगतोस |I नसे दु:ख खऱ्या ज्ञानी लोकांस | आल्यागेल्यांचे  ||अ.२, ओ.११||

तुला, मला, या राजांस | वा आपणां सर्वांस ||नव्हता जन्म पूर्वी, न यावयाचे जन्मास | असे काही नाही || अ. २, ओ. १२||

आत्म्यास या देहात जशा लाभती | बालपण, तारुण्य, म्हातारपण या स्थिती |I तशीच होते त्याला नव्या देहाची प्राप्ती | त्यामुळे ज्ञानी मोह न पावतो || अ. १, ओ. १३ ||

कौंतेया, स्पर्शसंवेदना उत्पन्न होती | शीत वा उष्ण, सुख वा दु:ख देती || त्या येती तशा जाती | कर सहन त्यांना || अ.१, ओ.१४||

या संवेदना व्यथा न देती ज्या ज्ञानी पुरुषाला | पुरुषश्रेष्ठा, सांगतो तुला || सुख आणि दु:ख सारखे ज्याला | तो अमृतत्वाला पात्र होतो ||अ.२, ओ. १५||

असत् होई न भाव | सत् होई न अभाव || असा या दोन्हींचा पाहिला ठाव | तत्त्वदर्शी लोकांनी ||अ.२, ओ.१६||

जाण अविनाशी अव्ययास | ज्याने व्यापिले या सर्वास || त्याच्या विनाशास | कोणीही समर्थ नाही || अ. २, ओ.१७||

नित्य, अविनाशी, अप्रमेय आत्म्याने या | धारण केलेल्या काया | अंती जाती विलया | त्याकरिता युद्ध कर || अ. २, ओ.१८||

जो मानतो मारणारा आत्म्यास | किंवा जो मानतो  मेलेला त्यास || कळत नाही त्या दोघांस | हा न मारतो न मारला जातो || अ. २, श्लो. १९||

आत्मा नाही जन्मत, नाही मरत | नाही तो झाला, नाही होत ||  तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित | शरीर नष्ट करिता, नाही मारला जात || अ.२, श्लो. २० ||

ज्या पुरुषास ज्ञात | की आत्मा नित्य, अव्यय, जन्मरहित || तो पुरुष कसा करवील कुणाचा घात | किंवा मारील कुणास? || अ.२, श्लो. २१||

जसा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून | नवी वस्त्रे करतो परिधान || तसा आत्मा जुनी शरीरे सोडून | नव्या शरीरात जातो || अ.२, श्लो. २२||

तुटे न हा शस्त्राने | जळे न हा अग्नीने || भिजे न हा पाण्याने | न सुकवी वारा यास || अ.२, ओ.२३||

न हा तोडला वा जाळला जातो | न भिजवला वा सुकवला जातो || नित्य, स्थिर, सर्वत्र राहतो | अचल हा सनातन || अ. २, ओ. २४||

हा अचिंत्य, अव्यक्त | अविकार्य यास बोलतात || हे झाल्यावर ज्ञात | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.२५||

हा जन्मतो आणि मरतो नियमित | असे जरी असेल तुझे मत |I तरी शोक करणे न उचित | महाबाहो तुला ||अ. २, ओ. २६ ||

मृत्यू हा जन्माचा संपात | तसा जन्म हा मृत्यूचा संपात || याचे भान ठेवीत | योग्य नाही शोक करणे ||अ.२, श्लो. २७||

आरंभी ही भूते अव्यक्त असती | मध्ये व्यक्त दिसती || अखेर अव्यक्तातच विलीन होती | तिथे शोक कशासाठी || अ. २, श्लो. २८||

कुणी आत्म्यास आश्चर्यकारक म्हणून पाहती | कुणी आश्चर्यकारक बोलती || कुणी आश्चर्यकारक म्हणून ऐकती | आणि ऐकूनसुद्धा त्यास, जाणे न कुणीही || अ. २, ओ. २९ ||

भारता, आत्मा राहतो देहात | आत्मा आहे अवध्य, शाश्वत || तेव्हा सर्व भूतांप्रत | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.३०||

आणि पाहताही स्वधर्मास | वाव नसे विचलित होण्यास |I कारण यु्द्धाहून क्षत्रियास | हितकारक काही नसे || अ. २,ओ. ३१||

काही सायासांवाचून | स्वर्गाचे दार ठेविले उघडून |I क्षत्रियांस भाग्यवान | युद्ध असे लाभते || अ.२, ओ.३२||

जाणूनही धर्मास | न करशील या युद्धास || पात्र होशील पापास | स्वधर्म आणि कीर्ती गमावून || अ. २, ओ. ३३ ||

अपकीर्ती तुझी करतील | जन हे सकल ||संभावितास अपकीर्तीचा सल | मरणाहून असह्य || अ. २, ओ.३४||

महारथी म्हणतील, 'अर्जुन | पळाला  रणातून घाबरून ' |I करतील तुझे अवमूल्यन | जे तुला मानतात || अ.२, ओ.३५||

बोलू नये ते बोलतील | पुष्कळ तुझ्याबद्दल || तुझे सामर्थ्य कमी लेखतील | त्याहून काय दु:खदायक || अ.२, ओ.३६||

मारला गेल्यास मिळवशील स्वर्गास | जिंकल्यास भोगशील पृथ्वीस || म्हणून कौंतेया, ऊठ युद्धास  | दृढनिश्चय करूनी || अ.२ ओ. ३७||

समान मानून सुख-दु:खास | लाभ-हानी, जय-पराजयास || करशील जर युद्धास | लागणार नाही पाप तुला || अ.२, ओ.३८||

हे ज्ञान  सांगितले सांख्यातील | ऐक ज्ञान आता योगातील || जे जाणून मुक्त होशील | कर्मबंधातून || अ.२, ओ.३९||

योगात  आरंभिले कार्य नाश न पावते | न आरंभिल्या कार्यात विघ्न  येते || मोठ्या भयापासून रक्षण करते | या धर्माचे अल्प आचरण || अ.२, ओ.४०||

जी  व्यस्त  असे योगात  | एकत्व  राहे त्या बुद्धीत || जी नसे योगात  व्यस्त  | त्या बुद्धीला अनंत शाखा फुटती  || अ.२, ओ.४१||

अज्ञानी लोक भाषा फुलवती | आणि बोलती ||वेदांच्या वादात रंगून म्हणती, | ‘नसे दुसरे काही’ || अ.२, ओ.४२||

‘विविध विशेष क्रियांचे  फळ म्हणून | भोग आणि ऐश्वर्य देणारा  जन्म येतो चालून’, || म्हणती हे जन | इच्छा आणि स्वर्गाच्या पाठी जे असती ||अ.२, ओ.४३||

भोग आणि ऐश्वर्य ध्येय एक | मानून गमावती विवेक || त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक | होते न स्थिर || अ.२, ओ. ४४||

वेद आहेत त्रिगुणांनी युक्त | अर्जुना, तू हो त्रिगुणरहित || नेहमी सत्त्वगुणी, द्वंद्वापासून मुक्त | योगक्षेमापासून दूर, आत्मनिष्ठ || अ. २, ओ.४५||

जळाने 🌊 व्यापता सर्व बाजूंस | कोण विचारी विहीरीस  || तेवढीच किंमत वेदांस | देई ज्ञानी ब्राह्मण || अ.२, ओ. ४६ ||

अधिकार तुझा केवळ कर्मावर | नाही कधीही कर्मफलावर || कर्मफलहेतूस ठेव दूर | कर्म मात्र टाळू नको || अ.२, ओ.४७||

कर कर्मे योगात राहुनी | धनंजया, आसक्ती सोडुनी || सिद्धी-असिद्धी समान मानुनी | या समानतेस योग म्हणती || अ.२, श्लो. ४८||

कर्म फार न्यून | धनंजया, बुद्धियोगाहून || फळाचा 🍑 हेतू असणारे जन असती कृपण I म्हणून तू बुद्धीचा आधार घे || अ.२, ओ.४९||

बुद्धियुक्त त्यागतो उभय | पाप आणि पुण्य || तेव्हा योगाचा घे आश्रय | कर्मातील कौशल्य म्हणजेच योग || अ. २, ओ. ५०||

कर्मातून झालेले उत्पन्न | फळ, बुद्धियुक्त जन टाकून || मुक्त होती जन्मबंधनातून | जाती निरामय पदाला || अ. २, ओ. ५१||

जेव्हा मोहाचे जंगल 🌴 🌴🌴| बुद्धी पार करील || तुला  निरुपयोगी वाटेल | ऐकलेले आणि ऐकावे असे || अ. २, ओ.५२||

श्रुतींमुळे झालेली चंचल | होईल जेव्हा निश्चल ||बुद्धी समाधीत अचल | तेव्हा साधशील योग || अ.२, ओ.५३||

अर्जुन म्हणाला

‘स्थितप्रज्ञ, जो समाधीत स्थिर झाला | केशवा सांग मला | बोलेल काय शब्दांला | असेल कसा, वागेल कसा’ || अ.२, ओ.५४||

श्रीभगवान म्हणाले

‘हे पार्था, स्थितप्रज्ञ म्हणती त्यास | जो सोडून सर्व इच्छांस || मानतो संतोषास | स्वत:च्याच ठायी || अ.२, ओ.५५||

जो न उद्विग्न दु:खात | ज्याची इच्छा न सुखात || जो प्रेम, राग, भीतीपासून मुक्त | स्थितप्रज्ञ म्हणती त्यास ||अ.२, ओ.५६||

सर्वत्र जो अनासक्त | शुभ आणि अशुभापासून अलिप्त || हर्ष आणि द्वेषापासून मुक्त | स्थिर त्याची बुद्धी || अ.२, श्लो.५७||

जो घेतो आवरूनी | इंद्रिये इंद्रियविषयांपासुनी | कासव 🐢 जसे अवयव सर्व बाजूंनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ.२, ओ.५८||

जीवात्म्याची निराहारातुनी | निवृत्ती होई विषयांतुनी, न त्यांच्या आसक्तीतुनी || निवृत्ती आसक्तीतुनी | होई पराच्या दर्शनाने ||अ.२, ओ.५९||

पुरुषाने ज्ञानी | प्रयत्नही करूनी || मन दुसरीकडे नेती ओढुनी | त्रासदायक इंद्रिये || अ. २, ओ.६०||

तेव्हा इंद्रियांस करून संयमित | युक्त हो माझ्यात || इंद्रिये ज्याची ताब्यात | स्थिर त्याची बुद्धी || अ. २, ओ. ६१||

विषयांचे जो करी चिंतन I विषयासक्त होई त्याचे मन II काम जन्मतो विषयांतून I कामातून जन्म क्रोधाचा || अ. २, ओ. ६२||

जन्म क्रोधातून संमोहाचा I संमोहातून स्मृतिनाशाचा II स्मृतिनाशातून बुद्धिनाशाचा I बुद्धिनाशातून होई सर्वनाश || अ. २, ओ. ६३||

जो मुक्त आसक्ती आणि द्वेषापासून | इंद्रियांना ठेवून स्वाधीन || वावरतो विषयांतून || तो विधेयात्मा प्रसन्नता पावतो || अ.२, ओ.६४||

पावता प्रसन्नतेस | दु:खे जाती लयास || स्थिरता येई बुद्धीस | लगेच || अ.२, ओ.६५||

बुद्धीचा लाभ न अयुक्तास | न जाणी तो भावनेस || भावनेअभावी न शांती त्यास | नसता शांती नसे सुख त्यास || अ।२, ओ.६६||

भटकता इंद्रियांनी | त्यांच्या पाठी जाऊनी || मन बुद्धीस नेते ओढुनी | जसा वारा 🌬️ ओढतो पाण्यातील 🌊 नावेस 🚢||अ.२, श्लो. ६७||

महाबाहो म्हणूनी | इंद्रियांस विषयांपासूनी || घेतो जो आवरूनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ. २, श्लो.६८||

सर्व भूतांसाठी रात्र 🌃 होता | संयमी राखतो जागृतता || सर्व भूते जागी राहता | मुनी पाही रात्र  ती || अ.२, ओ६९||

सर्व बाजूंनी भरताही जल | समुद्र 🌊 जसा राहतो आपल्या मर्यादेत अचल || तसा जो राहतो स्थिर, इच्छांत सकल | तो पावतो शांती, न भोगेच्छू || अ.२, ओ.७०||

जो सर्व इच्छांचा त्याग करतो | आणि नि:स्पृहपणे राहतो || निर्मम निरहंकारी पुरुष तो | पावतो शांती || अ.२, ओ.७१||

पार्था, हीच ती ब्राह्मी स्थिती | प्राप्त होता न मोह पावती || अंतकाळीही स्थिर राहती | पावती ब्रह्मनिर्वाणास || अ.२, ओ.७२||

अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'सांख्ययोग' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 © Dr Hemant Junnarkar 

All rights reserved