Wednesday, August 20, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८-मोक्षसंन्यासयोग

अर्जुन म्हणाला

महाबाहो, मला वेगवेगळे जाणावयाचे | तत्त्व संन्यासाचे || आणि तत्त्व त्यागाचे | हे हृषीकेशा, हे केशिनिषूदना || अ.१८, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

काम्य कर्मे सोडण्यास | कवी म्हणती संन्यास ||सर्व कर्मांची फळे सोडण्यास | विवेकी म्हणती त्याग || अ.१८, ओ.२||

कर्मे असती दोषयुक्त | म्हणून ती सोडावी, असे काही ज्ञानी म्हणतात || यज्ञ, तप, दान ही कर्मे सोडणे नसे उचित | असे दुसऱ्यांचे म्हणणे || अ.१७, ओ.३||

भरतसत्तमा, त्यागाविषयी माझे मत | ऐक सांगतो निश्चित || पुरुषव्याघ्रा, सांगितला आहे शास्त्रात | तीन प्रकारचा त्याग || अ.१८, ओ.४||

यज्ञ, तप, दान या कर्मांस | सोडणे योग्य नसे, ती हवीतच करावयास || पावन करती मनुष्यांस |यज्ञ, दान आणि तप || अ.१८, ओ.५||

परंतु करावे या कर्मांस | सोडून आसक्ती आणि फळांस || असा माझा विश्वास | पक्का आहे पार्था || अ.१८, ओ.६||

नेमून दिलेल्या कर्मास | सोडणे उचित नसे खास || शास्त्रात म्हटला आहे तामस | मोहापोटी केलेला त्याग || अ.१८, ओ.७||

शरीराला कष्ट पडतील | म्हणून कर्माचा त्याग कुणी करील || तर तो त्याग राजस होईल | आणि त्यागाचे फळ मिळणार नाही || अ.१८, ओ.८||

नेमून दिलेले कर्म केल्यास | आसक्ती आणि फळाच्या करून त्यागास || म्हणतात सात्त्विक त्या त्यागास | हे माझे मत अर्जुना || अ.१८, ओ.९||

कष्टदायक कर्माच्या करी न द्वेषास | सुखदायक कर्माची आसक्ती न ज्यास || त्या सत्त्वशील, बुद्धिमान, संशय नष्ट झालेल्या मनुष्यास | म्हणावे खरा त्यागी || अ.१८, ओ.१०||

देहधारी मनुष्यास | शक्य नसे सोडणे कर्मास ||त्यामुळे जो सोडतो कर्मफळास | तोच खरा त्यागी || अ.१८, ओ.११||

जो कर्मफळांस न सोडतो | तो मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट आणि मिश्र फळे भोगतो || परंतु तो मुक्त राहतो | ज्याने सोडले कर्मफळांना || अ.१८, ओ.१२||

सर्व कर्मांच्या सिद्धीला | सांख्यतत्त्वात सांगितले ज्या पाच कारणांला || महाबाहो, ती सांगतो तुला | ऐकून घे || अ.१८, ओ.१३||

पहिला, कर्ता, दुसरे, अधिष्ठान | तिसरे, साधने भिन्न || चौथे विविध प्रयत्न | आणि पाचवे दैव || अ.१८, ओ.१४||

शरीर, वाचा आणि चित्त | यांद्वारे जेव्हा मनुष्य करतो कर्मास सुरुवात || भले ते कर्म असो न्याय्य वा विपरीत | ही पाच कारणे असती त्यापाठी || अ.१८, ओ.१५||

वस्तुस्थिती अशी असता | जो स्वत:स मानतो कर्ता || सत्य न येई हाता | त्या मूर्खाच्या || अ.१८, ओ.१६||

अहंकारमुक्त ज्याचे मन | ज्याच्या बुद्धीस नाही आसक्तीचे बंधन || तो या लोकांना मारून | न मारतो, न बद्ध होतो || अ.१८, ओ.१७||

परिज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान | ही कर्माची प्रेरके तीन || कर्म, कर्ता आणि साधन | ही तीन अंगे कर्माची || अ.१८, ओ.१८||

प्रकृतीच्या गुणांस अनुसरून | कर्म, कर्ता आणि ज्ञान || यांचेही प्रकार तीन | तेसुद्धा ऐक आता || अ.१८, ओ.१९||

ज्या ज्ञानाने सर्व भूतांत | दिसे एकच भाव अव्यय आणि अविभक्त ||  घे लक्षात | ते ज्ञान सात्त्विक || अ.१८, ओ.२०||

ज्या ज्ञानाने येई दिसून | सर्व भूतांत भाव भिन्न ||ते ज्ञान | जाण राजस || अ.१८, ओ.२१||

ज्या ज्ञानाने मनुष्य एकाच कार्यात | विनाकारण, तत्त्व न जाणता, सर्वस्व मानून होतो आसक्त | घे ध्यानात | ते अत्यल्प ज्ञान तामस || अ.१८, ओ.२२||

नेमून दिलेले, आसक्तिरहित | प्रीती आणि द्वेषापासून मुक्त || फळाची इच्छा न ज्यात | ते कर्म सात्त्विक || अ.१८, ओ.२३||

फळाची इच्छा असे ज्यात | जे आहे अहंकारयुक्त || ज्यासाठी खटाटोपच जास्त | ते कर्म राजस || अ.१८, ओ.२४||

परिणाम, हानी, हिंसा आणि क्षमता | या साऱ्याचा विचार न करता || केवळ मोहाने कर्म आरंभता | ते म्हटले जाते तामस || अ.१८, ओ.२५||

अनासक्त, अहंकारापासून मुक्त | धैर्य आणि उत्साहाने युक्त || यश आणि अपयशाविषयी विकाररहित | तो कर्ता सात्त्विक || अ.१८, ओ.२६||

लोभी, हिंसावृत्तीचा, विषयासक्त | अपवित्र, कर्मफळाने प्रेरित || हर्ष आणि शोकाने होई विचलित | तो कर्ता राजस || अ.१८, ओ.२७||

अडाणी, हट्टी, अस्थिर | कपटी, आळशी, कामचोर || सदा दु:खी, करी पिरपिर | तो कर्ता तामस || अ.१८, ओ.२८||

बुद्धी आणि धृतीचे प्रकार | तीन गुणांनुसार ||सांगतो सविस्तर | ऐक धनंजया || अ.१८, ओ.२९||

प्रवृत्ती आणि निवृत्तीचे जिला ज्ञान | कार्य-अकार्य, भय-निर्भयता यांचे भान || कळे कशात मोक्ष वा बंधन | ती बुद्धी सात्त्विक पार्था || अ.१८, ओ.३०||

धर्म काय, अधर्म काय | कुठले कार्य, कुठले अकार्य || यांचा जिला होई न निर्णय | ती राजसी बुद्धी पार्था || अ.१८, ओ.३१||

अज्ञानाने झाकून | अधर्मास धर्म मानून || सर्व बाबतींत करी विपरीत वर्तन | ती बुद्धी तामसी || अ.१८, ओ.३२||

प्राण, इंद्रिये आणि मन | यांच्या क्रिया, स्थिरता आणि योगातून || करते धारण | ती धृती सात्त्विक || अ.१८, ओ.३३||

जिच्यामुळे माणूस | धारण करतो धर्म, काम आणि अर्थास || आणि आसक्त राहतो फळास | पार्था, ती धृती राजस || अ.१८, ओ.३४||

स्वप्न, भय, शोकास | विषाद आणि मदास || जी दुर्बुद्धी तयार नसे सोडण्यास | पार्था, ती धृती तामस || अ.१८, ओ.३५||

सुखाचे प्रकार तीन | भरतर्षभा, घे ऐकून || जे अभ्यासात राहते मग्न | आणि दु:खास संपवते -|| अ.१८, ओ.३६||

-जे विषासारखे भासे सुरुवातीस | परंतु ज्याचा परिणाम अमृतापरीस || जे आत्मबुद्धीच्या प्रसन्नतेतून येते जन्मास | ते सुख सात्त्विक || अ.१८, ओ.३७||

विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून | होते जे उत्पन्न || आरंभी अमृतासारखे, परिणामी विषासमान | ते सुख राजस || अ.१८, ओ.३८||

जे आरंभापासून अखेरपर्यंत | आत्म्याला पाडते मोहात || उगम ज्याचा निद्रा, आळस आणि प्रमादात | ते सुख तामस || अ.१८, ओ.३९||

न पृथ्वीवर, न आकाशात | किंवा अगदी देवलोकात || प्राणी न कुणी अस्तित्वात | या तीन गुणांपासून मुक्त || अ.१८, ओ.४०||

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांस | वाटून दिले कर्मांस || त्यांच्या स्वभावजन्य गुणांस | अनुसरून परंतपा || अ.१८, ओ.४१||

शम, दम, शुद्धता | सरळपणा, क्षमाशीलता || ज्ञान, विज्ञान, आस्तिकता | हे ब्राह्मणांचे स्वभाव कर्म || अ.१८, ओ.४२||

शौर्य, तेज, धैर्य, दक्षतेत | युद्धात पलायन न करण्यात || दान आणि अधिकारभावात | क्षत्रियांचे स्वभावकर्म || अ.१८, ओ.४३||

शेती, गोरक्षा, व्यापारात | वैश्यांचे कर्म स्वभावजात || सेवाशुश्रुषेत | शूद्रांचे स्वभावजात कर्म || अ.१८, ओ.४४||

आता सांगतो थोडक्यात | स्वकर्म करीत || उत्तम सिद्धी प्राप्त | कशी होते || अ.१८, ओ.४५||

करता स्वकर्मास | पूजिले जाते त्यास || ज्याने व्यापले साऱ्यास | त्यातून मिळते सिद्धी || अ.१८, ओ.४६||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म  गुणविहीन ||नेमून दिलेले स्वाभाविक कर्म करून | दोष न येई माथा || अ.१८, ओ.४७||

कौंतेया, स्वाभाविक कर्म जरी दोषयुक्त | ते सोडणे न उचित || सर्व कर्मांस दोष झाकतात |धुराप्रमाणे अग्नीस ||अ.१८, ओ.४८||

ज्याने सोडले आसक्तीस | जिंकले स्वत:स, सोडले इच्छांस || तो परम नैष्कर्म्यसिद्धीस | संन्यासातून मिळवतो || अ.१८, ओ.४९||

कौंतेया, सांगतो थोडक्यात | सिद्धी केल्यावर प्राप्त || ब्रह्मावस्थेप्रत | कसा मनुष्य पोहचतो || अ.१८, ओ.५०||

बुद्धीद्वारे विशुद्ध झालेला | धृतीने स्वतःस नियंत्रित केलेला || शब्दादि विषयांचा त्याग केलेला | मुक्त आसक्ती आणि द्वेषातून - || अ.१८, ओ.५१||

-एकांतात राहणारा, मिताहार करणारा | काया, वाचा, मनास नियंत्रित करणारा || ध्यानयोगात मग्न राहणारा | वैराग्यसंपन्न- || अ.१८, ओ.५२||

अहंकार, बल, दर्पास | काम, क्रोध आणि भौतिक सुखांस || सोडून, निर्मम आणि शांत राहणारास | ब्रह्मस्थिती प्राप्त होते || अ.१८, ओ.५३||

तो प्रसन्न आत्मा ब्रह्मरूप होतो | तो न शोक करतो, न इच्छा धरतो || सर्व भूतांशी समबुद्धीने राहतो | मिळवतो माझ्या परम भक्तीस || अ.१८, ओ.५४||

मी आहे किती महान | याचे त्याला होते ज्ञान ||मला तत्त्वत: जाणून | तो प्रवेश माझ्यात करतो || अ.१८, ओ.५५||

नेहमी करतो सर्व कर्मांस | राहून माझ्या आश्रयास || मिळवतो माझ्या कृपाप्रसादास | आणि पदास अव्यय शाश्वत || अ.१८, ओ.५६||

सर्व कर्मे मनाने मला अर्पून | माझ्याशी परायण होऊन || बुद्धियोगाने माझा आश्रय घेऊन | चित्त सतत माझ्यात ठेव || अ.१८, ओ.५७||

जर चित्त माझ्यात स्थिर करशील | तर माझ्या कृपेने सर्व संकटे तरून जाशील || अहंकाराने माझे न ऐकशील | तर पावशील नाश || अ.१८, ओ.५८||

जाऊन अहंकाराच्या आश्रयास | 'युद्ध करणार नाही' असे जे म्हणतोस || तो व्यर्थ आहे तुझा प्रयास | प्रकृती तुझ्याकडून युद्ध करवील || अ.१८, ओ.५९||

स्वत:च्या स्वभावजन्य कर्मास | कौंतेया तू बांधला आहेस || मोहाने जे न करू इच्छितोस | स्वभाववश होऊन करशील || अ.१८, ओ.६०||

अर्जुना, सर्व भूते आहेत | जणू यंत्रात || आणि त्यांना योगमायेने आहे फिरवीत | सर्वांच्या हृदयात राहणारा ईश्वर || अ.१८, ओ.६१||

भारता, सर्वभावास अनुसरून | त्याला जा शरण || मिळेल परम शांती आणि शाश्वत स्थान | त्याच्या कृपेने || अ.१८, ओ.६२||

याप्रमाणे केले तुला कथन | गूढातील गूढ ज्ञान ||त्यावर पूर्ण विचार करून | तुझ्या इच्छेप्रमाणे कर || अ.१८, ओ.६३||

हे माझे श्रेष्ठ वचन, गूढ सर्वांत | पुन्हा घे ध्यानात || तू मला प्रिय अत्यंत | म्हणून तुझ्या हिताचे सांगतो || अ.१८, ओ.६४||

माझा भक्त हो, मन माझ्यात कर स्थिर | माझा उपासक हो, मला नमस्कार कर || म्हणजे तू माझ्याकडेच येणार | तू मला प्रिय म्हणून, प्रतिज्ञेवर सत्य सांगतो तुला || अ.१८, ओ.६५||

सर्व धर्मांस सोडून | मलाच ये शरण || तुला मुक्त करीन सर्व पापांतून | नको करूस शोक || अ.१८, ओ.६६||

हे ज्ञान कधीही सांगू नये तपोहीनास | किंवा अभक्तास || अथवा ऐकण्याची इच्छा नसे ज्यास | किंवा जो माझा मत्सर करतो || अ.१८, ओ.६७||

हे श्रेष्ठ गूढ ज्ञान | जो माझ्या भक्तांना करील कथन | तो माझ्यावर परम भक्ती जडून | नि:संशय माझ्याकडेच येईल || अ.१८, ओ.६८||

सर्व मनुष्यांत त्याच्याहुनी | नसे प्रिय मला दुसरा कुणी || न तसा होईल भुवनी | भविष्यात || अ.१८, ओ.६९||

आपल्या या धर्मदायी संवादाचे अध्ययन | करील जो कोण || तो ज्ञानयज्ञाने करील मला प्रसन्न | हे माझे मत || अ. १८, ओ.७०||

जो मनुष्य श्रद्धावान आणि असूयाहीन | केवळ करील हा संवाद श्रवण || तोही जाईल मुक्त होऊन | पुण्य करणाऱ्यांच्या शुभ लोकात || अ.१८, ओ.७१||

हे पार्था, लक्ष देऊन | केलेस ना हे शास्त्र श्रवण ?नष्ट झाले का संमोह आणि अज्ञान | तुझे धनंजया? || अ.१८, ओ.७२||

अर्जुन म्हणाला 

हे अच्युता, मोह दूर झाला | तुझ्या कृपेने कर्तव्याचे स्मरण झाले मला || सिद्ध मी, संदेह दूर झालेला | तुझ्या सांगण्याप्रमाणे युद्ध करीन || अ.१८, ओ.७३||

संजय म्हणाला 

याप्रमाणे मी ऐकले | वासुदेव आणि पार्थ हे महात्मे जे अद्भुत बोलले || ते ऐकून रोमांच उभे राहिले | अंगावर माझ्या || अ.१८, ओ.७४||

व्यासांनी कृपा केली म्हणून | हा योग परम गहन || केला मी श्रवण | प्रत्यक्ष योगेश्वर कृष्णांच्या मुखातून || अ.१८, ओ.७५||

हे राजा, केशव आणि अर्जुन यांनी | केलेला हा पवित्र आणि अद्भुत संवाद आठवुनी || मी हर्षित होतो मनी | पुन्हा पुन्हा || अ.१८, ओ.७६||

महाराज, हरीचे अतिशय अद्भुत रूप ते | मला एक सारखे आठवते || मन विस्मित आणि हर्षित होते | पुन्हा पुन्हा || अ.१८, ओ.७७||

जेथे कृष्ण योगेश्वर | जेथे पार्थ धनुर्धर || तेथेच श्री, विजय, शक्ती आणि नीतीचा वास निरंतर | हे माझे मत || अ.१८, ओ.७८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘मोक्षसंन्यासयोग’ नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला.

                 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, August 19, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग

अर्जुन म्हणाला

जे सोडून शास्त्रविधीस | श्रद्धेने करतात पूजनास || कृष्णा, त्यांच्या श्रद्धेस | सात्त्विक, राजस की तामस मानावे || अ.१७, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

अनुसरून स्वभावास | देहधारी धारण करतो तीन श्रद्धांस || सात्त्विक, राजस किंवा तामस | कशा ते ऐक || अ.१७, ओ.२||

स्वभावानुसार सर्व जण | भारता, करती श्रद्धेचे पालन || मनुष्य आहे श्रद्धापूर्ण | जशी श्रद्धा, तसाच तो || अ.१७, ओ.३||

सात्त्विक भजती देवांस | राजस भजती यक्षराक्षसांस || भूत आणि प्रेतगणांस | भजती तामसी लोक || अ.१७, ओ.४||

जे लोक दंभ आणि अहंकाराने युक्त | कामवासनांत आसक्त || न सांगितलेले शास्त्रात | घोर तप करून-||अ.१७, ओ.५||

-शरीरात राहणाऱ्या मला | आणि पंचमहाभूतसमूहाला || कारण होती त्रासाला, | ते अविवेकी लोक, जाण आसुर वृत्तीचे || अ.१७, ओ.६||

या तिघांच्या आहाराची | आवड तीन प्रकारची ||तीच तऱ्हा यज्ञ, तप आणि दानाची | फरक त्यांतील ऐक || अ.१७, ओ.७||

आयुष्य, सत्त्व, बल आणि आरोग्य वाढविणारा | सुख आणि प्रीती उत्पन्न करणारा || रम्य, स्निग्ध, स्थिर आणि मन प्रसन्न ठेवणारा | आहार सात्त्विकांस आवडतो || अ.१७, ओ.८||

कडू, आंबट, खारट आणि अति उष्ण असणारा | तिखट, रुक्ष आणि दाह करणारा || दु:ख, शोक आणि रोग उत्पन्न करणारा | आहार राजसांस आवडतो ||अ.१७, ओ.९||

तीन प्रहरांपूर्वी शिजविलेले | रसहीन, दुर्गंधियुक्त, नासलेले || अपवित्र उष्टे झालेले | अन्न तामसांस आवडते || अ.१७, ओ.१०||

फळाची आशा सोडून | शास्त्रविधीस अनुसरून ||यज्ञ हेच कर्तव्य मानून आणि मन शांत ठेवून | केलेला यज्ञ तो सात्त्विक || अ.१७, ओ.११||

फळाची आशा धरून | केवळ ढोंग म्हणून ||केलेला जाण | राजस यज्ञ || अ.१७, ओ.१२||

शास्त्रविधी सोडून, न करता अन्नसंतर्पण || न देता दक्षिणा, मंत्रहीन || करता श्रद्धाविहीन | तामसी यज्ञ म्हणतात || अ.१७, ओ.१३||

शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप | देव, ब्राह्मण, गुरू, विद्वानांस पुजणे | शुद्ध राहणे, सरळ वागणे || ब्रह्मचर्य आणि अहिंसा पाळणे | यास शारीरिक तप म्हणतात || अ.१७, ओ.१४||

दुसऱ्यास ज्याने न होईल त्रास | सत्य, प्रिय, साधेल हितास || होईल स्वाध्याय आणि अभ्यास | असे बोलणे म्हणजे वाचिक तप || अ.१७, ओ.१५||

मन प्रसन्न ठेवणे, सौम्य राहणे | मौन आणि आत्मनिग्रह पाळणे || शुद्ध भाव बाळगणे | यास मानसिक तप म्हणतात || अ.१७, ओ.१६||

न इच्छिता फळास | परावर ठेवून श्रद्धेस || करता या तीन प्रकारच्या तपास | म्हणती त्यास सात्त्विक तप || अ.१७, ओ.१७||

व्हावा सत्कार, मिळावा मान, व्हावे स्वत:चे पूजन | आणि ढोंग म्हणून || केलेले तप राजस जाण | ते असते अस्थिर आणि अनिश्चित || अ.१७, ओ.१८||

दुराग्रह पूर्ण करण्यास | ज्यात स्वत:सही होई त्रास || किंवा दुसऱ्याच्या नाशास | केले जाते ते तप तामस || अ.१७, ओ.१९||

दान हे कर्तव्य मानून | परतफेडीची अपेक्षा न ठेवून || स्थळ, काळ आणि पात्रता पाहून | दिलेले दान सात्त्विक || अ.१७, ओ.२०||

परतफेड व्हावी म्हणून | फळाची अपेक्षा ठेवून ||स्वत:स त्रागा करून | दिले जाते ते राजस दान || अ.१७, ओ.२१||

अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीस | करून अपमानित त्यास || दिलेल्या दानास | तामस म्हणतात || अ.१७, ओ.२२||

'ॐ तत्सत् इति' असा ब्रह्माचा | निर्देश तीन प्रकारचा || त्यांतून ब्राह्मण, वेद आणि यज्ञांचा | उद्भव पूर्वी झाला || अ.१७, ओ.२३||

त्या कारणे ब्रह्मवादी जन | ॐकार उच्चारून ||यज्ञ, तप, दान | या शास्त्रोक्त क्रिया आरंभती || अ.१७, ओ.२४||

मोक्ष इच्छिणारे जन | फळाची इच्छा सोडून || 'तत्' शब्दाचा उच्चार करून | यज्ञ, तप, दान अशा क्रिया करती || अ.१७, ओ.२५||

सद्भाव आणि साधुभाव दाखवण्यास | तसेच प्रशस्त कर्माच्या निर्देशास || येतो उपयोगास | 'सत्' हा शब्द पार्था || अ.१७, ओ.२६||

यज्ञ, तप आणि दान देणे | तसेच त्यांसाठी कर्म करणे || या सर्वांस एकत्रितपणे | 'सत्' असेच म्हणतात || अ.१७, ओ.२७||

श्रद्धेवाचून केलेले तप, कर्म, हवन | आणि दिलेले दान || पार्था, हे सारे 'असत्' जाण | इहलोकात वा परलोकात ते न उपयोगी || अ.१७, ओ.२८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘श्रद्धात्रयविभागयोग ’ नावाचा सतरावा अध्याय पूर्ण झाला.

              || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, August 18, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १६-दैवासुरसम्पद्विभागयोग

श्रीभगवान म्हणाले 

सत्त्वशुद्धी, निर्भयता | ज्ञानयोगात मग्नता || दम, यज्ञ, दानशीलता | स्वाध्याय, तप, सरळपणा-|| अ.१६, ओ.१||

-अहिंसा, शांती, क्रोधहीनता | त्याग, दोषदृष्टीचा अभाव, सत्यशीलता || भूतदया, लोभहीनता | मृदुता, चंचलतेचा अभाव-||अ.१६, ओ.२||

-तेज, धैर्य, क्षमाशीलता | द्रोह, अभिमानाचा अभाव आणि शुद्धता || हे त्याचे गुण भारता | जो दैवी संपत्तीसहित जन्मतो || अ.१६, ओ.३||

दंभ, दर्प, अभिमान | क्रोध, कठोरता आणि अज्ञान || हे आहेत त्याचे गुण | जो आसुरी संपत्तीसहित जन्मतो || अ.१६, ओ.४||

दैवी संपत्ती देते मोक्षास | आसुरी संपत्ती होते कारण बंधनास || पांडवा, तू दैवी संपत्ती घेऊन  जन्मलास | तेव्हा शोक सोडून दे || अ.६, ओ.५||

भूतांचे दोन प्रकार | एक दैवी तर दुसरे आसुर ||दैवी भूतांचा याआधी केला विस्तार | आता पार्था ऐक आसुरांबद्दल || अ.१६, ओ.६||

प्रवृत्ती आणि निवृत्ती | आसुर जन न जाणती ||नसे त्यांना क्षिती | शुद्धता, आचार किंवा सत्याची || अ.१६, ओ.७||

ईश्वर नाही जगात | जग आहे असत्य, प्रतिष्ठाविरहित || परस्परसंबंध नसे त्यात | त्यास कामपूर्तीशिवाय अन्य हेतू नाही || अ.१६, ओ.८||

असा दृष्टिकोन स्वीकारून | अहितकारी, उग्र कर्मे करून || हे अल्पबुद्धी, स्वत:चा नाश ओढवून | जगाच्या नाशास सिद्ध होती ||अ.१६, ओ.९||

तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन | दंभ, अभिमान, मद, अशुद्धता यांनी युक्त होऊन ||मोहाने अयोग्य गोष्टींचा आग्रह धरून | ते वर्तन करतात || अ.१६, ओ.१०||

वाहणे आमरणांत | चिंता अपरिमित || राहणे कामतृप्ती आणि उपभोगात रत | एवढेच त्यांनी ठरवले || अ.१६, ओ.११||

शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध होऊन | काम आणि क्रोधात होऊन परायण || काम आणि भोगांचे करण्या समाधान | अन्यायाने धनसंचय इच्छितात || अ.१६, ओ.१२||

‘मी आज मिळवले यास | पूर्ण करीन त्या मनोरथास || मिळवले या धनास | ते धनही माझे होईल || अ.१६, ओ.१३||

मी मारले या शत्रूस | मारीन त्या दुसऱ्यास || मी ईश्वर, मी भोगी खास | मी सिद्ध, बलवान आणि सुखी || अ.१६, ओ.१४||

पुष्कळ माझे गणगोत, आहे मी धनसंपन्न | नाही कोणी माझ्यासमान || यज्ञ करीन, दान देईन, ऐष करीन’ | असे म्हणणारे अज्ञानविमोहित,- || अ.१६, ओ.१५||

-अनेक विचारांनी भ्रमित झालेले, | मोहजालात गुंतलेले, || कामभोगात आसक्त झालेले | हे जन अशुद्ध नरकात पडतात || अ.१६, ओ.१६||

गर्विष्ठ आणि आत्मकेंद्रित | धन, मान, मदाने उन्मत्त || दांभिकपणे, नावासाठी यज्ञ करतात | विधीला सोडून || अ.१६, ओ.१७||

असे अहंकार, बल आणि दर्प त्यांच्यात | असती काम आणि क्रोधाने युक्त || सर्वांच्या देहात | राहणाऱ्या माझा द्वेष करती || अ.१६, ओ.१८||

ते द्वेष्टे, क्रूर | अशुभ आणि अधम नर || त्यांना संसारातील योनींत आसुर | निरंतर मी पाठवतो || अ.१६, ओ.१९||

जन्मोजन्मी आसुरी योनींस | जावे लागते त्या मूढांस || जातात अधम गतीस | माझी प्राप्ती न होता कौंतेया || अ.१६, ओ.२०|| 

काम, क्रोध, लोभ यांच्या रूपात | आहे नरकाचे त्रिविध द्वार साक्षात || करते आपला घात | म्हणून त्या तिघांस सोडावे || अ.१६, ओ.२१||

तमरूप या तीन द्वारांपासून | कौंतेया, जो नर जातो सुटून || तो करतो आत्महितकारी वर्तन | आणि जातो परम गतीस || अ.१६, ओ.२२||

जो शास्त्रविधीस सोडून | वागतो इच्छांस अनुसरून || तो बसतो सिद्धी गमावून | त्यास न मिळे सुख, न परम गती || अ.१६, ओ.२३||

म्हणून प्रमाण मानून शास्त्रास | ठरवावे कार्य किंवा अकार्यास || जाणून शास्त्रातील विधानांस | कर्म करणे योग्य आहे  || अ.१६, ओ.२४ ||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘दैवासुरसम्पद्विभागयोग’ नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला.

               || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, August 11, 2025

આપણી પૃથ્વી અને આપણ

આપણે તાજેતરમાં આબોહવા પરિવર્તન, પર્યાવરણીય સંરક્ષણ વગેરે વિશે ઘણું વાંચી અને સાંભળી રહ્યા છીએ. પર્યાવરણનું રક્ષણ કરવું એ આપણા બધાની જવાબદારી છે અને આ માટે આપણે બધાએ સાથે મળીને કામ કરવું ખૂબ જ મહત્વપૂર્ણ છે. પરંતુ શું તમે ક્યારેય વિચાર્યું છે કે બાળકોને આ કેવી રીતે સમજાવવું?

તો પછી શ્રી પારિતોષ તિરોડકર તેમના નવા પુસ્તકમાં તમને મદદ કરવા માટે અહીં છે. પુસ્તક નું નામ છે 'The world is melting-how to talk to kids about climate change'. ચાલો જોઈએ લેખક શું કહે છે.

૧. તમારા બાળકો ને હવામાન પરિવર્તન વિશે શું લાગે છે?

તમારો બાળક હવામાનમાં થતા ફેરફારો પર નજર રાખે છે અને પ્રશ્નો પૂછે છે, "છેલ્લા કેટલાક સમયથી આટલી ગરમી કેમ પડી રહી છે? હજુ સુધી વરસાદ કેમ નથી પડ્યો?"

૨. સરળ શબ્દોમાં આબોહવા પરિવર્તન સમજાવો

તમારું બાળક એક પ્રશ્ન પૂછી રહ્યું છે, જેનો અર્થ છે કે તે વિષય વિશે વિચારી રહ્યો છે.

તો સૌ પ્રથમ, બાળકના પ્રશ્નને ધ્યાનથી સાંભળો. આનાથી તમને તે શું કહેવાનો પ્રયાસ કરી રહ્યો છે તે સમજવામાં મદદ મળશે.

તમારા બાળકને આબોહવા પરિવર્તનનું સંપૂર્ણ વિજ્ઞાન જાણવાની જરૂર નથી. તેને તેની ઉંમર પ્રમાણે સમજાવો.

જો તમારું બાળક ૩-૬ વર્ષનું છે, તો તેને રસપ્રદ વાર્તાઓ દ્વારા સમજાવો.

જો તમારું બાળક ૭-૧૦ વર્ષનું છે, તો તે ઘણું જાણે છે. તેને આબોહવા પરિવર્તનનું કારણ શું છે તે સમજાવો.

૧૧-૧૪ વર્ષના બાળક માટે, તમે આ વિષય પર વધુ ઊંડાણમાં જઈ શકો છો અને સમજાવી શકો છો કે આબોહવા પરિવર્તન વિશ્વને કેવી રીતે અસર કરી રહ્યું છે.

આબોહવા પરિવર્તનને કટોકટી તરીકે નહીં, પરંતુ ચિંતાના કારણ તરીકે સમજાવો. તમારા જવાબ સંપૂર્ણ હોવા જરૂરી નથી. વધુ પડતું સમજાવશો નહીં અથવા ડરામણા આંકડા આપશો નહીં.

તમારા બાળકને ડરાવશો નહીં. 'આપણો વિનાશ નજીક છે,' જેવા જવાબો ટાળો. કહો, 'ઘણા લોકો આ પરિસ્થિતિમાંથી બહાર નીકળવાનો માર્ગ શોધવા માટે કામ કરી રહ્યા છે. અમે પણ કામ કરી શકીએ છીએ.'

જો તમારા બાળકને હજુ પણ રસ હોય તો તેમને વધુ પ્રશ્નો પૂછવા માટે પ્રોત્સાહિત કરો.

હવે, જો તમારું બાળક તમને પૂછે કે પર્યાવરણનું રક્ષણ કરવા માટે આપણ શું કરી શકો છો, તો તમે સરળ ઉકેલો સૂચવી શકો છો.

૩. પર્યાવરણને અનુકૂળ આદતો

ઘરે સારી આદતો કેળવવી મહત્વપૂર્ણ છે કારણ કે બાળકો જે જુએ છે તેનું અનુકરણ કરે છે. કેટલીક સરળ આદતો છે જેમ કે દાંત સાફ કરતી વખતે નળ બંધ કરવો, ઓરડામાંથી બહાર નીકળતી વખતે લાઈટ બંધ કરવી.

જો તમે તમારા બાળકને વધુ મહત્ત્વ આપીને કહો છો, જેમ કે, 'આજ થી તમે લાઈટ ચેકર છો, તમે પાણી  મેનેજર છો', તો તે તેનું મનોબળ વધુ વધારશે અને તે વધારે ઉત્સાહ સાથે કામ કરશે. તમે ઘરે કેટલાક  ઉપયુક્ત ઉપક્રમો કરી શકો છો, જેમ કે પર્યાવરણસ્નેહી રવિવાર, કચરા મુક્ત મંગળવાર. આનાથી ઘરમાં પર્યાવરણને અનુકૂળ વાતાવરણ બનશે.

આપણી પાસે હોળી, ગણેશોત્સવ, દિવાળી જેવા ઘણા તહેવારો છે. આવા તહેવારો નિમિત્તે ઈકો ફ્રેન્ડલી રંગો, ગણેશ છબીઓ વગેરે અજમાવો.

ખોરાકનો બગાડ ઓછો કરો,  કંપોસ્ટ  બિન નો વાપર શરૂ કરો, ઉપયોગમાં ન હોય ત્યારે લાઇટ, પંખા અને વિદ્યુત ઉપકરણો બંધ કરો.

તમે તમારા બાળકને તેમની રુચિઓના આધારે પ્રકૃતિ જર્નલિંગ, ભાવના કાર્ડ વગેરે જેવી વસ્તુઓ શીખવી શકો છો.

ઉપદેશ, સતામણી અથવા અપરાધભાવથી ભાગ્યે જ પરિવર્તન આવે છે. તેના બદલે, તમારા વર્તનનું મોડેલ બનાવો. તેથી જ્યારે તમારું બાળક તમને જૂની બેગનો ફરીથી ઉપયોગ કરતા, વનસ્પતિજન્ય ખોરાક પસંદ કરતા, વગેરે જોશે, ત્યારે તેઓ તમારી તરફ જોશે અને તે પણ તમારા જેવા બનવાનો પ્રયત્ન કરશે.

૪. પ્રકૃતિ અને પ્રાણીઓ પ્રત્યે આદર

જ્યારે તમારું બાળક ફૂલ તોડ્યા વિના તેને જોવાનો આનંદ માણે છે અથવા ડર્યા વિના રખડતા પ્રાણીને મદદ કરે છે, ત્યારે તેની પીઠ થપથપાવો.

૫. મોટી સમસ્યાઓ

પ્રદૂષણ, વનનાબૂદી જેવી સમસ્યાઓ મોટી છે. તેથી જો તમારું બાળક તેમના વિશે પૂછે છે, તો તમારા ખુલાસા સરળ રાખો. તેમને ખાતરી આપો કે આનો પણ ઉકેલ છે.

૬. વ્યસ્ત, ડિજિટલ દુનિયામાં પણ તમારા બાળકને પર્યાવરણ પર વિશ્વાસ કરવાનું શીખવો

આજના ઝડપી, ઘોંઘાટીયા, સ્ક્રીનથી ભરેલા વિશ્વમાં, બાળક પર્યાવરણ પર કેવી રીતે વિશ્વાસ કરી શકે? તો આ કરો. પર્યાવરણ વિશે જ્ઞાન મેળવવા માટે આ ડિજિટલ મીડિયાનો ઉપયોગ કરો. ઉદાહરણ તરીકે, જ્યારે તમે કારમાં હોવ, ત્યારે તમે પર્યાવરણ વિશે પોડકાસ્ટ સાંભળી શકો છો અથવા પર્યાવરણ વિશે ચેટ કરી શકો છો. તમે પર્યાવરણ વિષય પર દસ્તાવેજી ફિલ્મો જોઈ શકો છો, રમતો રમી શકો છો.

૭. વાર્તાઓ, ફિલ્મો અને તેમના નાયકોનો ઉપયોગ કરો

બાળકો નાયકોની પૂજાને પસંદ કરે છે. તેઓ પોતાનું જીવન પોતાને નાયક માનીને જીવે છે. હવે આવા ઘણા આબોહવા નાયકો અથવા યોદ્ધાઓ કોમિક્સ અને ફિલ્મો દ્વારા લોકપ્રિય થયા છે. પર્યાવરણ વિષય પર ઘણી ફિલ્મો બની છે. તેથી બાળકોને આવા સાહિત્ય વાંચવા દો અથવા આવી ફિલ્મો જોવા દો.

૮. શાળા, મિત્રો અને સમુદાયનું મહત્વ

તમારા બાળકની દુનિયા ફક્ત ઘર સુધી મર્યાદિત નથી. તે શાળાના કોરિડોર, રમતના મેદાન, જન્મદિવસની પાર્ટીઓ અને વોટ્સએપ ગ્રુપ સુધી વિસ્તરે છે. તમે શાળાઓમાં ગ્રીન પ્રોજેક્ટ્સને પ્રોત્સાહન આપી શકો છો. તમે પર્યાવરણને અનુકૂળ વિચારોને પ્રોત્સાહન આપવા માટે અન્ય મિત્રો સાથે ભેગા થઈ શકો છો. જન્મદિવસની પાર્ટીઓ એવી રીતે રાખો કે જેમાં ઓછામાં ઓછો કચરો ઉત્પન્ન થાય.

૯. મારું બાળક સાંભળતું નથી, મારે શું કરવું જોઈએ?
જો તમને લાગે કે તમારું બાળક સાંભળતું નથી, તો તમારે તેની સાથે વધુ ભાવનાત્મક જોડાણ સ્થાપિત કરવાની જરૂર છે. તમારે તમારા બાળક સાથે વધુ સમય વિતાવવો જોઈએ. તે જે કરી રહ્યો છે તેના માટે તેની પ્રશંસા કરો, જેથી તેને વધુ કરવા માટે પ્રોત્સાહિત કરવામાં આવે.

૧૦. આબોહવા આશાવાદ:
આબોહવા આશાવાદ એ એવી માન્યતા છે કે ભલે વસ્તુઓ ગંભીર હોય, લોકો ફરક લાવી શકે છે અને લાવી રહ્યા છે. બાળકોને શીખવો કે તેઓ પણ ફરક લાવી શકે છે. તેથી, બાળકોને શું જે અસરકારક રહેશે તે કહો,  જેમ કે ઉર્જાની જરૂરિયાતો માટે સૌર ઉર્જાનો ઉપયોગ, વૃક્ષો વાવવા વિશે જાગૃતિ.

૧૧. પૃથ્વીનું રક્ષણ:

આ બધી ચર્ચામાંથી, તમને સમજાયું હશે કે પૃથ્વીનું રક્ષણ કરવું એ દરેકની જવાબદારી છે અને ફક્ત પૃથ્વીને આફતોથી બચાવવી પૂરતું નથી. આ જવાબદારી નિભાવવા માટે સંપૂર્ણ પ્રયાસની જરૂર નથી. અપૂર્ણ પ્રયાસો પણ પોતાનો પ્રભાવ પાડી શકે છે. તમારા બાળકને જણાવો કે તે પૃથ્વીને બચાવવા માટે જે કરી રહ્યો છે તે ઘણું છે. તમારું બાળક પૃથ્વીમાં પરિવર્તન લાવી રહ્યું છે, પૃથ્વીને આકાર આપી રહ્યું છે - પ્રેમ અને આશા સાથે. પૃથ્વી આપણી પાસેથી આટલી જ અપેક્ષા રાખે છે.

પુસ્તક વિશે:
આ પુસ્તક આપણને પર્યાવરણીય સંરક્ષણ વિશે ઘણું બધું કહે છે. લેખકનું ધ્યાન સંપૂર્ણતા પર આગ્રહ રાખવાને બદલે પગલાં લેવા પર છે. આખા પુસ્તકમાં સંબંધિત અવતરણો છે. ભાષા ખૂબ જ સરળ અને આકર્ષક છે. પુસ્તક વાંચવામાં સરળ છે અને તમે ક્યારે પુસ્તક વાંચવાનું શરૂ કરો છો અને ક્યારે પૂર્ણ કરો છો તે તમને ખબર નથી. પુસ્તકમાં આપેલી વ્યવહારુ અને નવીન ટિપ્સ પુસ્તકને એક પ્રવૃત્તિ અથવા કાર્યપુસ્તિકા જેવું બનાવે છે. પુસ્તક પ્રેરણાદાયક છે અને સંગ્રહમાં રાખવા અને ભેટ તરીકે આપવા યોગ્ય છે. આ પુસ્તક માતાપિતા અને શિક્ષકો માટે પર્યાવરણીય મુદ્દાઓ પર બાળકોને માર્ગદર્શન આપવા માટે ઉપયોગી છે.

પાનાઓની સંખ્યા: ૯૨.

પુસ્તક એમેઝોન પર ઉપલબ્ધ છે.

લેખક વિશે:
                શ્રી. પારિતોષ તિરોડકર
આ પુસ્તકના લેખક, શ્રી પરિતોષ તિરોડકર, ઓસ્ટ્રેલિયાથી ફાઇનાન્સમાં માસ્ટર્સ ડિગ્રી ધરાવે છે.

શ્રી તિરોડકરને કેનેડા, ઓસ્ટ્રેલિયા, યુકે અને ભારતમાં ફાઇનાન્સ અને ઓડિટ ક્ષેત્રોમાં ૧૨ વર્ષથી વધુનો અનુભવ છે. શ્રી તિરોડકરે ટીડી બેંક, રોયલ બેંક ઓફ કેનેડા, યુબીએસ, ડોઇશ બેંક અને મોર્ગન સ્ટેનલી જેવી પ્રખ્યાત સંસ્થાઓ સાથે કામ કર્યું છે.

પર્યાવરણ એ શ્રી તિરોડકરના હૃદયની નજીકનો વિષય છે.

ડિસ્ક્લેમર:

આ શ્રી પરિતોષ તિરોડકર દ્વારા લખાયેલ પુસ્તક 'The world is melting-how to talk to kids about climate change'  પર લખાયેલ બ્લોગ પોસ્ટ છે. બ્લોગના લેખક પુસ્તક પર કોઈ કોપીરાઇટનો દાવો કરતા નથી. કોપીરાઇટ લેખક/પ્રકાશક પાસે છે. પુસ્તકમાં સમાવિષ્ટ સામગ્રીના સંદર્ભો અને ચર્ચા ફક્ત શૈક્ષણિક અને મનોરંજન હેતુઓ માટે છે.

-Blog post by Dr Hemant Junnarkar 
Blog post © Dr Hemant Junnarkar,
All rights reserved 






Saturday, August 9, 2025

हमारी धरती और हम

हम इन दिनों जलवायु परिवर्तन, पर्यावरण संरक्षण आदि के बारे में बहुत कुछ पढ़ और सुन रहे हैं। पर्यावरण की रक्षा हम सबकी ज़िम्मेदारी है और इसके लिए हम सबका मिलकर काम करना बेहद ज़रूरी है। लेकिन क्या आपने कभी सोचा है कि बच्चों को यह कैसे समझाया जाए?

तो लीजिए, श्री. पारितोष तिरोडकर अपनी नई किताब के साथ आपकी मदद के लिए हाज़िर हैं। किताब का नाम है,  The world is melting-how to talk to kids about climate change" | आइए देखें कि लेखक क्या कहते हैं।

१. आपका बेटा (या बेटी) जलवायु परिवर्तन के बारे में क्या सोचता है?

आपका बेटा हर चीज़ पर नज़र रख रहा है। वह मौसम में बदलाव देखता है और सवाल पूछता है, "इन दिनों इतनी गर्मी क्यों पड़ रही है? अभी तक बारिश क्यों नहीं हुई?"

२. जलवायु परिवर्तन को सरल शब्दों में समझाइए।

आपका बच्चा प्रश्न पूछ रहा है, जिसका अर्थ है कि वह उस विषय पर विचार कर रहा है।

तो सबसे पहले, बच्चे के प्रश्न को ध्यान से सुनें। इससे आपको यह समझने में मदद मिलेगी कि वह क्या कहना चाह रहा है।

आपके बच्चे को जलवायु परिवर्तन का पूरा विज्ञान जानने की ज़रूरत नहीं है। उसे उसकी उम्र के अनुसार समझाएँ।

अगर आपका बच्चा ३-६ साल का है, तो उसे रोचक कहानियों के ज़रिए समझाएँ।

अगर आपका बच्चा ७-१० साल का है, तो वह बहुत कुछ जानता है। उसे समझाएँ कि जलवायु परिवर्तन का कारण क्या है।

११-१४ साल के बच्चे के लिए, आप इस विषय पर और गहराई से जा सकते हैं समझा सकते हैं कि जलवायु परिवर्तन दुनिया को कैसे प्रभावित कर रहा है।

जलवायु परिवर्तन को एक संकट के रूप में नहीं, बल्कि चिंता का विषय समझें। आपके उत्तर का सटीक होना ज़रूरी नहीं है। ज़रूरत से ज़्यादा व्याख्या न करें या डरावने आँकड़े न दें।

अपने बच्चे को डराएँ नहीं। 'अब हमारी कोई खैर   नहीं है',  ऐसे जवाब न दे। कहें, 'कई लोग इस स्थिति से निकलने का रास्ता ढूँढ़ने की कोशिश कर रहे हैं। हम भी कुछ कर सकते हैं।'

अगर आपका बच्चा और सवाल पूछे तो उसे प्रोत्साहित करें।

अब, अगर आपका बच्चा आपसे पूछे कि हम पर्यावरण की रक्षा के लिए क्या कर सकते हैं, तो आप कुछ आसान उपाय सुझा सकते हैं।

३. पर्यावरण के अनुकूल आदतें 

घर पर अच्छी आदतें डालना ज़रूरी है क्योंकि बच्चे जो देखते हैं, उसकी नकल करते हैं। कुछ आसान आदतें हैं जैसे दाँत ब्रश करते समय नल बंद करना, कमरे से बाहर निकलते समय लाइट बंद करना।

अगर आप अपने बच्चे को ज़्यादा सम्मान देंगे, जैसे, 'आज से तुम लाइट चेकर हो, तुम पानी के मैनेजर हो', तो उसका हौसला और भी बढ़ेगा। आप घर पर कुछ गतिविधियाँ कर सकते हैं, जैसे, इको संडे या पर्यावरण के अनुकूल रविवार, कचरा मुक्त मंगलवार। इससे घर में पर्यावरण के अनुकूल माहौल बनेगा।

हमारे यहाँ होली, गणेशोत्सव, दिवाली जैसे कई त्योहार आते हैं। ऐसे त्योहारों के अवसर पर पर्यावरण के अनुकूल रंगों, गणेश प्रतिमाओं आदि का प्रयोग करें।

खाने की बर्बादी कम करें, कम्पोस्ट बिन शुरू करें, इस्तेमाल न होने पर लाइट, पंखे और उपकरण बंद कर दें।

आप अपने बच्चे की रुचियों को देखकर उसे प्रकृति की डायरी लिखना, इमोशन कार्ड आदि जैसी चीज़ें सिखा सकते हैं।

उपदेश देने, झिड़कने या अपराधबोध पैदा करने से शायद ही कोई बदलाव आता है। इसके बजाय, आप खुद आदर्श बरताव करे ताकि आप का बच्चा आप का  अनुकरण करे ।  जब आपका बच्चा आपको पुराने बैगों का दोबारा इस्तेमाल करते, स्थानीय पौधों से बने खाद्य पदार्थ चुनते देखेगा, तो वह आपकी ओर देखेगा और आपके जैसा व्यवहार करने की कोशिश करेगा।

४. प्रकृति और जानवरों के प्रति सम्मान

जब आपका बच्चा बिना थोडे फूल देखने का आनंद लेता है या बिना डरे किसी आवारा जानवर की मदद करता है, तो उसकी पीठ थपथपाएँ।

५. बड़ी समस्याएँ

प्रदूषण, वनों की कटाई जैसी समस्याएँ और भी बड़ी हैं। इसलिए अगर आपका बच्चा इनके बारे में पूछे, तो अपनी व्याख्या सरल रखें। उसे विश्वास दिलाएँ कि इसका भी समाधान है।

६. अपने बच्चे को व्यस्त, डिजिटल दुनिया में भी पर्यावरण पर भरोसा करना सिखाएँ

आज की तेज़, शोरगुल वाली, स्क्रीन से भरी दुनिया में एक बच्चे के लिए पर्यावरण पर भरोसा करना कैसे संभव है? तो यह करें। पर्यावरण के बारे में जानकारी हासिल करने के लिए इन डिजिटल माध्यमों का इस्तेमाल करें। उदाहरण के लिए, जब आप कार में हों, तो आप पर्यावरण के बारे में पॉडकास्ट सुन सकते हैं या पर्यावरण पर बातचीत कर सकते हैं। आप पर्यावरण विषय पर वृत्तचित्र देख सकते हैं, खेल खेल सकते हैं।

७. कहानियों, फिल्मों और उनके नायकों जैसे माध्यमों का इस्तेमाल करें

बच्चों को नायक पूजा बहुत पसंद होती है। वे खुद को नायक मानकर जीते हैं। अब ऐसे कई जलवायु नायकों या योद्धाओं को कॉमिक्स और फिल्मों के माध्यम से लोकप्रिय बनाया गया है। पर्यावरण विषय पर कई फिल्में बनी हैं। तो अपने बच्चों को ऐसा साहित्य पढ़ने या ऐसी फिल्में देखने दें।

८. स्कूल, दोस्तों और समूहों का महत्व

आपके बच्चे की दुनिया घर तक ही सीमित नहीं है। यह स्कूल के गलियारों, खेल के मैदानों, जन्मदिन पार्टियों और व्हाट्सएप ग्रुप तक फैली हुई है। स्कूलों में, आप पर्यावरण-अनुकूल परियोजनाओं को बढ़ावा दे सकते हैं। आप पर्यावरण-अनुकूल विचारों को बढ़ावा देने के लिए अन्य दोस्तों के साथ मिल सकते हैं। जन्मदिन की पार्टियों को इस तरह रखें कि कम से कम कचरा उत्पन्न हो।

९. मेरा बच्चा सुन नहीं रहा है, मुझे क्या करना चाहिए?
अगर आपको लगता है कि आप का  बच्चा आप की सुन नहीं रहा है, तो आपको उसके साथ और अधिक भावनात्मक जुड़ाव बनाने की ज़रूरत है। आपको अपने बच्चे के साथ ज़्यादा समय बिताना चाहिए। उसके कामों के लिए उसकी प्रशंसा करें, ताकि वह और अधिक करने के लिए प्रोत्साहित हो।

१०. जलवायु आशावाद:

जलवायु आशावाद यह विश्वास है कि भले ही हालात गंभीर हों, लोग बदलाव ला सकते हैं और ला रहे हैं। बच्चों को सिखाएँ कि वे भी बदलाव ला सकते हैं। इसलिए, बच्चों को बताएँ कि क्या कारगर है, जैसे ऊर्जा की ज़रूरतों के लिए सौर ऊर्जा का इस्तेमाल बढ़ाना, पेड़ लगाने के बारे में जागरूकता बढ़ाना।

११. पृथ्वी की रक्षा:

इस सारी चर्चा से, आप समझ गए होंगे कि पृथ्वी की रक्षा करना सबकी ज़िम्मेदारी है और सिर्फ़ पृथ्वी को आपदाओं से बचाना ही काफ़ी नहीं है। इस ज़िम्मेदारी को निभाने के लिए परिपूर्ण प्रयास की ज़रूरत नहीं है। अपूर्ण प्रयासों के भी अपने प्रभाव होते हैं। अपने बच्चे को बताएँ कि पृथ्वी की रक्षा के लिए वह जो कर रहा है, वह बहुत कुछ है। आपका बच्चा पृथ्वी में बदलाव ला रहा है, पृथ्वी का निर्माण कर रहा है - प्रेम और आशा के साथ। पृथ्वी हमसे बस यही अपेक्षा करती है।

पुस्तक के बारे में:
यह पुस्तक हमें पर्यावरण संरक्षण के बारे में बहुत कुछ बताती है। लेखक का ध्यान पूर्णता पर ज़ोर देने के बजाय कार्रवाई पर है। पुस्तक में जगह-जगह प्रासंगिक उद्धरण हैं। भाषा बहुत सरल और आकर्षक है। पुस्तक पढ़ने में आसान है और आपको पता ही नहीं चलता कि आप इसे कब पढ़ना शुरू करते हैं और कब खत्म करते हैं। पुस्तक में दिए गए व्यावहारिक और नवीन सुझाव इसे एक गतिविधि या कार्यपुस्तिका जैसा बनाते हैं। यह पुस्तक प्रेरणादायक है और इसे संग्रह में रखने और उपहार के रूप में देने लायक है। यह पुस्तक माता-पिता और शिक्षकों के लिए अपने बच्चों को पर्यावरणीय मुद्दों पर मार्गदर्शन देने के लिए उपयोगी है।

पृष्ठों की संख्या: ९२

पुस्तक अमेज़न पर उपलब्ध है।

लेखक के बारे में:

                  श्री. पारितोष तिरोडकर 

इस पुस्तक के लेखक श्री परितोष तिरोडकर ने ऑस्ट्रेलिया से फायनान्स क्षेत्र  में मास्टर्स डिग्री  प्राप्त की है।

श्री. तिरोडकर को कनाडा, ऑस्ट्रेलिया, यूके और भारत में वित्त और लेखा परीक्षा क्षेत्रों में १२ वर्षों से अधिक का अनुभव है। श्री तिरोडकर ने टीडी बैंक, रॉयल बैंक ऑफ कनाडा, यूबीएस, ड्यूश बैंक और मॉर्गन स्टेनली जैसे प्रतिष्ठित संस्थानों के साथ काम किया है।

पर्यावरण श्री तिरोडकर के दिल के करीब का विषय है।

अस्वीकरण:

यह ब्लॉग पोस्ट श्री परितोष तिरोडकर द्वारा लिखित पुस्तक The world is melting-how to talk to kids about climate change  ' पर आधारित है। ब्लॉग के लेखक इस पुस्तक पर किसी भी कॉपीराइट का दावा नहीं करते हैं। कॉपीराइट लेखक/प्रकाशक के पास है। पुस्तक में सामग्री के संदर्भ और चर्चा केवल शैक्षिक और मनोरंजन के उद्देश्यों के लिए हैं।

-Blog post by Dr Hemant Junnarkar 
Blog post © Dr Hemant Junnarkar,
All rights reserved 








 








 











Wednesday, August 6, 2025

आपली पृथ्वी आणि आपण


आपण अलिकडे हवामानातील बदल, पर्यावरणाचे रक्षण वगैरे विषयांबद्दल बरेच वाचतो आणि ऐकतो. पर्यावरणाचे रक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करणे अतिशय गरजेचे आहे. परंतु हे मुलांना कसे समजावून सांगणार, असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

मग येथे श्री. पारितोष तिरोडकर तुमच्या मदतीला आले आहेत त्यांचे नवीन पुस्तक घेऊन. त्याचे नाव आहे The world is melting-how to talk to kids about climate change. काय सांगतात लेखक, चला आपण पाहू या.

१. तुमच्या मुलाला (किंवा मुलीला) हवामानातील बदलाबद्दल काय वाटते?

तुमचा मुलगा सर्व गोष्टींचे निरीक्षण करीत असतो.  हवामानातील बदल त्याच्या लक्षात येतात आणि तो प्रश्न विचारतो, 'अलिकडे एवढे गरम का होते? अजून पाऊस कसा आला नाही ?' 

२. सोप्या शब्दांत हवामान बदलाचे स्पष्टीकरण द्या

तुमचा मुलगा प्रश्न विचारतो आहे, याचा अर्थ तो या विषयावर विचार करतो आहे.

तेव्हा सर्वांत प्रथम मुलाचा  प्रश्न नीट ऐकून घ्या. म्हणजे त्याला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल.

मुलाला हवामान बदलाचे संपूर्ण विज्ञान माहित असणे आवश्यक नाही.तुमच्या मुलाचे वय असेल त्याप्रमाणे मुलाला स्पष्टीकरण द्या. 

मुलाचे वय जर ३-६ वर्षे असेल तर त्याला छानदार गोष्टीमधून स्पष्ट करा.  

मुलाचे वय ७-१० वर्षे असेल तर त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याला हवामान बदल कशामुळे होतो आहे, ते स्पष्ट करून सांगा. 

११-१४ वर्षे वयाच्या मुलाला या विषयावर अधिक खोलात जाऊन हवामान बदलाचा सर्व जगावर काय परिणाम होतो आहे ते तुम्हाला सांगता येईल. 

हवामान बदल हे संकट म्हणून नव्हे तर काळजीचे कारण म्हणून स्पष्ट करा. तुमचे उत्तर परिपूर्ण असणे आवश्यक नाही.  जास्त स्पष्टीकरण देऊ नका किंवा भयानक आकडेवारी देऊ नका.

मुलाला उगीच घाबरवून सोडू नका. ' आता आपले काही खरे नाही,' अशा स्वरूपाचे उत्तर टाळा. 'या परिस्थितीतून मार्ग काढण्यास पुष्कळ लोक काम करीत आहेत. आपल्यालासुद्धा काम करता येईल,' असे सांगा.

मुलगा अधिक प्रश्न विचारीत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या.

आता मुलगा आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय करता येईल असे विचारत असेल तर त्याला तुम्ही साधे सोपे उपाय सुचवू शकता.

३. पर्यावरणपूरक सवयी  

घरात चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे कारण मुले जे पाहतात त्यांचे ते अनुकरण करतात. साध्या सवयी म्हणजे ब्रश करताना नळ बंद करणे, खोलीतून बाहेर पडताना लाईट बंद करणे. 

मुलाला आणखी मोठेपणा दिलात की जसे, ' तू आजपासून लाइट चेकर, तू वॉटर मॅनेजर', तर तो आणखी प्रोत्साहित होईल. तुम्ही घरी काही उपक्रम राबवू शकता, जसे, इको संडे किंवा पर्यावरणस्नेही रविवार, कचरामुक्त मंगळवार. यामुळे घरात पर्यावरणस्नेही वातावरण तयार होईल. 

आपल्याकडे होळी, गणेशोत्सव, दिवाळी असे अनेक सण आहेत. अशा सणाच्या प्रसंगी  पर्यावरणपूरक रंग, गणेशमूर्ती इत्यादींचा वापर करा. 

अन्नाचा अपव्यय कमी करा, कंपोस्ट बिन सुरू करा, दिवे, पंखे आणि वापरात नसलेली उपकरणे बंद करा.

मुलाच्या  आवडीनिवडी पाहून नेचर जर्नलिंग, इमोशन कार्ड अशा गोष्टी मुलाला शिकवू शकता.  

उपदेश करणे, त्रास देणे किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करणे या सर्वांमुळे क्वचितच बदल घडून येतो. याऐवजी तुमचे वर्तन तुम्ही आदर्श ठेवा. म्हणून जेव्हा मुले  तुमचा मुलगा तुम्हाला जुन्या पिशव्या पुन्हा वापरताना,  स्थानिक वनस्पती-आधारित अन्न निवडताना पाहील,  तेव्हा तो तुम्हाला आदर्श मानून  तुमच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करील. 

४. निसर्ग आणि प्राण्यांचा आदर  

जेव्हा  तुमचा मुलगा फूल न तोडता केवळ निरीक्षणात आनंद मानतो किंवा  भटक्या प्राण्याला न घाबरता मदत करतो, तेव्हा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या.   

५. मोठ्या समस्या

प्रदूषण, जंगलतोड यांसारख्या समस्या अधिक मोठ्या आहेत.  त्यामुळे मुलाने त्याविषयी प्रश्न विचारल्यास तुमचे स्पष्टीकरण सोपे ठेवा. यावरसुद्धा उपाय आहे हे त्यांना पटवून द्या.  

६. व्यस्त, डिजिटल जगातही मुलाला पर्यावरणावर  विश्वास ठेवण्यास शिकवा 

आजच्या जलद, गोंगाटाच्या, निरनिराळ्या स्क्रीन्सनी व्यापलेल्या जगात मुलाला पर्यावरणावर विश्वास ठेवणे कसे शक्य आहे? तर मग असे करा या डिजिटल माध्यमांचाच उपयोग पर्यावरणाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी करा.  उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही कारमध्ये असता तेव्हा तुम्ही पर्यावरणाविषयी पॉडकास्ट ऐकू शकता किंवा पर्यावरणाविषयी गप्पा मारू शकता. तुम्ही पर्यावरण या विषयावरील डॉक्युमेंटरीज पाहू शकता, गेम्स खेळू शकता.

७. कथा, चित्रपट या माध्यमांचा, त्यांतील नायकांचा उपयोग करा  

मुलांना हीरो वर्शिप आवडते. ते स्वत:ला एखाद्या हीरोच्या ठिकाणी मानून जगत असतात.‌आता कॉमिक्समधून, चित्रपटांतून असे बरेच क्लायमेट हीरोज किंवा वॉरियर्स लोकप्रिय करण्यात आले आहेत. पर्यावरण या विषयावर बरेच चित्रपट आहेत. तेव्हा मुलांना असे साहित्य वाचण्यास द्या किंवा असे चित्रपट पहा.

८. शाळा, मित्र, अशा समूहाचे महत्त्व 

तुमच्या मुलाचे जग घरीच थांबत नाही. ते शाळेच्या हॉलवे, खेळाचे मैदान, वाढदिवसाच्या पार्ट्या आणि व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये पसरते. शाळांमध्ये तुम्ही हरित प्रकल्पांना प्रोत्साहन देऊ शकता. पर्यावरणपूरक कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर मित्रांसोबत एकत्र येऊ शकता. वाढदिवसाच्या पार्ट्या अशा ठेवा की त्यातून कमीत कमी कचरा तयार होईल. 

९. माझा मुलगा ऐकत नाही , मी काय करू?
तुम्हाला असे वाटत असेल की माझा मुलगा ऐकत नाही, तर भावनिक दृष्ट्या त्याच्याशी अधिक संबंध प्रस्थापित करणे तुम्हाला जरुरीचे आहे. तुम्ही मुलासाठी अधिक वेळ द्या. तो ज्या गोष्टी करतो आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करा, म्हणजे अधिक करण्याविषयी तो प्रोत्साहित होईल.

१०. हवामान आशावाद:

हवामान आशावाद हा असा विश्वास आहे की गोष्टी गंभीर असल्या तरी, लोक फरक करू शकतात आणि करत आहेत. मुलांना ते देखील फरक करू शकतात हे शिकवणे. म्हणून, मुलांना काय प्रभावी आहे ते अधोरेखित करा, जसे की उर्जेच्या गरजांसाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, झाडे लावण्याबद्दल जागरूकता.

११. पृथ्वीचे रक्षण:

या सर्व विवेचनावरून तुमच्या लक्षात आले असेल की पृथ्वीचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे आणि केवळ अरिष्टातून पृथ्वी वाचवणे त्यासाठी पुरेसे नाही. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी परिपूर्ण प्रयत्नाची गरज नाही. अपूर्ण प्रयत्नसुद्धा आपला परिणाम साधतोच.  तुमच्या मुलाला कळू द्या की पृथ्वीच्या रक्षणासाठी तो जे  करतो आहे,  ते खूप काही आहे. तुमचा मुलगा पृथ्वीमध्ये  फरक घडवत आहे,  पृथ्वीचे घडवत आहे - प्रेमाने आणि आशेने. पृथ्वीला आपल्याकडून एवढीच अपेक्षा  आहे.

पुस्तकाविषयी:
असे हे पुस्तक आपल्याला पर्यावरण रक्षण या विषयावर बरेच काही सांगून जाते. लेखकाचा सारा भर परिपूर्णतेचा आग्रह धरण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर आहे. पुस्तकात जागोजागी समर्पक अशी उद्धरणे (quotations) आहेत. भाषा अतिशय सोपी आणि मनाला भिडणारी आहे. पुस्तकाचा आकार सुटसुटीत असून तुम्ही केव्हा पुस्तक वाचण्यास सुरुवात करता आणि केव्हा संपवता ते कळत नाही. पुस्तकातील प्रॅक्टिकल आणि अभिनव टिप्समुळे पुस्तकाला ॲक्टिव्हिटी  किंवा वर्क बुक सारखे स्वरूप आले आहे. पुस्तक प्रेरणादायी असून संग्रहात ठेवण्यायोग्य आणि भेट देण्यायोग्य आहे. पुस्तक पालकांना तसेच शिक्षकांना मुलांना पर्यावरणविषयक मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
पृष्ठसंख्या: ९२.
पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे.

लेखकाविषयी:

                  श्री. पारितोष तिरोडकर 

या पुस्तकाचे लेखक श्री. पारितोष तिरोडकर यांनी ऑस्ट्रेलियामधून फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.  

श्री. तिरोडकर यांना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यू के आणि भारत या देशांमध्ये  फायनान्स आणि ऑडिट या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा १२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.श्री. तिरोडकर यांनी टीडी बँक, रॉयल बँक ऑफ कॅनडा, यूबीएस, ड्यूश बँक आणि मॉर्गन स्टॅनली अशा नामांकित संस्थांसोबत काम केले आहे. 

पर्यावरण हा श्री. तिरोडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

डिस्क्लेमर: 
श्री. पारितोष तिरोडकर  यांनी लिहिलेल्या ' द वर्ल्ड इज मेल्टिंग-हाऊ टू टॉक टू किड्स अबाऊट क्लायमेट चेंज'  या पुस्तकावर लिहिलेली ही ब्लॉग पोस्ट  आहे. ब्लॉगचा लेखक  पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशकाकडे आहे. पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील आशयाची चर्चा केवळ शिक्षण आणि मनोरंजनासाठी आहे. 

-Blog post by Dr Hemant Junnarkar 
Blog post © Dr Hemant Junnarkar,
All rights reserved